शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एवढे अगतिक का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 06:24 IST

गडकरी यांना अशा असहाय्य स्थितीत जनतेने कधी पाहिले नाही. बिनधास्त स्वभावाचा, मनात येईल ते स्पष्टपणे बोलून दाखवणारा नेता अशी त्यांची ओळख आहे.

- दिनकर रायकरमुंबई : धडाकेबाज कामांसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची गेल्या काही दिवसांतील विधाने ऐकली तर ती काहीशी खचलेल्या मनाची वाटू लागली आहेत. देशभर मी रस्ते बांधणीचे काम हाती घेतले आहे. पण खासदार, आमदार त्यात अडथळे आणत आहेत. बऱ्याच ठिकाणचे कंत्राटदार त्यांच्या अशा वागणुकीमुळे पळून तरी जात आहेत किंवा त्यांना हाकलले तरी जात आहे. अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी ‘आमचे काय’ किंवा ‘आम्हाला काय’ हा प्रश्न विचारून ठेकेदारांना त्रस्त करत आहेत. या अशा वागण्याने कामे होणार कशी, अशीही खंत जाहीरपणे अनेक कार्यक्रमातून गडकरी यांनी बोलून दाखवली आहे.आपण आतापर्यंत २७ लाख कोटी रुपयांची कामे केली आहेत. पण एकही ठेकेदार मला कधी भेटला नाही किंवा मी त्याला कधी बोलावले नाही. एवढी पारदर्शक कामे मी गेली काही वर्षे सातत्याने करत आलो. आम्ही काही पाप करत नाहीत, देशाचा विकास करत आहोत. पण त्यात या अशा अडचणींनी मोठे अडसर निर्माण करणे सुरू केले आहे, असेही गडकरी म्हणाले.गडकरी यांना अशा असहाय्य स्थितीत जनतेने कधी पाहिले नाही. बिनधास्त स्वभावाचा, मनात येईल ते स्पष्टपणे बोलून दाखवणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी कधी कोणाची भीडभाड ठेवलेली नाही. राज्यात युती सरकारमध्ये बांधकाममंत्री असतानाही त्यांनी हा स्वभाव बदलला नव्हता. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मुंबई पुणे एक्स्प्रेसवे धीरूभाई अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला करायचा होता. त्यासाठी त्यांनी तत्कालिन मंत्री प्रमोद महाजन यांच्यामार्फत आग्रह धरला होता. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गडकरी गेले. राज्य सरकारमधील अधिकारी कमी खर्चामध्ये हा महामार्ग करण्यास सक्षम आहेत, हे त्यांना पटवून दिले. त्यातून किती पैसे वाचतील हेही त्यांनी सांगितले, मी ठराविक मुदतीत हे काम केले नाही तर तुम्ही मला मंत्रिमंडळातून काढून टाका, असेही ठणकावून सांगितले. बाळासाहेब ठाकरे त्यामुळे गडकरींच्या बाजूने उभे राहिले. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वेळेआधीच पूर्ण झाल्यावर बाळासाहेबच नव्हे, तर धीरुभाई अंबानी यांनीही गडकरी यांच्या कर्तुत्वाचे कौतुक केले होते.हेच गडकरी आता एकदम हताश व निराश दिसत आहेत. आपल्या विभागाची काम करण्याची खूप इच्छा आहे. पण आमदार, खासदार अडथळे आणतात, असा सूर गडकरींना शोभत नाही. त्यांनी स्वभावानुसार कामाच्या आड येणाºया आमदार, खासदारांची नावे सीबीआयला द्यावीत वा त्यांच्या अशा नेत्यांची जाहीर खरडपट्टी काढावी. अवघा देश त्यांच्या या स्वभावाचे कौतुकच करेल.अशा नेत्यांवर कारवाई करा असे सीबीआयला सांगून हा प्रश्न सुटणार नाही आणि गडकरींचा तो स्वभाव नाही. हे झाले गडकरींच्या बाजूने. मात्र ज्या आमदार, खासदारांविषयी गडकरी यांनी आक्षेप घेतले, त्यापैकी एकही नेता या आक्षेपाबद्दल ब्र शब्द काढायला तयार नाही. त्यांना गडकरींच्या विधानाचे काहीही वाईट वाटलेले दिसत नाही. याचा अर्थच गडकरी जे बोलत आहेत, त्यात तथ्य आहे. हे जर खरे असेल, तर ती जास्त गंभीर बाब आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीGovernmentसरकारBJPभाजपाPoliticsराजकारण