शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
4
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
5
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
6
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
7
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
8
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
9
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
10
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
11
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
12
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
13
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
14
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
15
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
16
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
17
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
18
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
19
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
20
कोल्हापुरातील शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

....तर मला अटक का होत नाही : दिग्विजय सिंह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 14:18 IST

एकीकडे आतंकवादी व्यक्तीला भाजप उमेदवारी देते आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगासमोर जाऊन भारत आतंकवादाच्या विरोधात लढत आहेत असे सांगतात, ही कोणती लढाई आहे...

ठळक मुद्देपंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर पुण्यात पत्रकारांशी वार्तालाप ज्या पद्धतीने बाजारात सामान मिळते त्या पद्धतीने लोकप्रतिनिधींना खरेदी केले जात आहे.

पुणे : माझा मोबाईल क्रमांक राज्यसभेच्या वेबसाईटवर आहेत. तो कोणाकडेही असू शकतो. मात्र, पोलिसांना वाटत असेल की आतंकवाद्यांना मिळालेलो आहे तर ते मला अटक का करत नाही असा सवाल काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी पुण्यात केला.

    पुण्यात एल्गार परिषदेच्या तपास प्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे मिळालेल्या चिठ्ठीत दिग्विजय सिंह यांचा क्रमांक आढळला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पुण्यात पत्रकारांशी वार्तालाप केला. पुढे ते म्हणाले की, एकीकडे आतंकवादी व्यक्तीला भाजप उमेदवारी देते आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगासमोर जाऊन भारत आतंकवादाच्या विरोधात लढत आहेत असे सांगतात. ही कोणती लढाई आहे अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली. यावेळी त्यांनी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यावर उमेदवारीला यावेळी लक्ष केले.ती व्यक्ती नथुराम गोडसेला देशभक्त म्हणते. तुम्ही त्यांना दिलसे माफ नाही करत म्हणतात. पण 56 इंच छातीत किती मोठं हृदय आहे हा प्रश्न आहे. यापुढे ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे जे लोक खुलेपणाने समाजात गोंधळ माजवतात त्यांना ते सोशल मीडियावर फॉलो करतात.गोवा विधानसभेतील घडामोडींवर ते म्हणाले की, भाजपने नोटबंदीत इतका पैसा कमावला आहे, ज्या पद्धतीने बाजारात सामान मिळते त्या पद्धतीने लोकप्रतिनिधींना खरेदी केले जात आहे.त्यांनी सांगितले की, भाजपने उत्तर प्रदेशमध्ये 300 जागा मिळतील असे सांगितले होते तिथेही त्यांचा अंदाज बरोबर आला. 2019च्या लोकसभेबाबतही 300 जागांचा दावा केला होता जो बरोबर ठरला होता. अतिशय आश्चर्यकारक असे त्यांचे अनुमान आहे. जिथे सगळ्यात मोठी लोकशाही आहे, अशा देशात त्यांनी इतक्या बारकाईने भविष्यवाणी केली त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.

यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे-इच्छेने किंवा चुकून बजेटमध्ये तफावत,-बेरोजगाराची समस्या असताना त्याचाही अर्थसंकल्पात उल्लेख नाही.-नरेंद्र मोठी स्वप्नं दाखवतात. 2014साली नागरिकांच्या खात्यात 15 लाख रुपये येतील, बेरोजगारी-5 ट्रीलियन अर्थव्यवस्था करायची असताना विकासदर वाढवणे गरजेचे आहे मात्र स्थिती त्या उलट आहे. त्यामुळे 2024पर्यन्त देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रीलियन होईल असे वाटत नाही मात्र मोदींना स्वप्न विकता येतात.-पुलवामा हल्ल्यात साडेतीन क्विंटल विस्फोटक होते हे सरकारला कसे माहितीत? जर पूर्वसूचना होती तर सीआरपीएफच्या जवानांना पाठवून जोखीम का उचलली ? तरीही सरकारने कोणालाही जबाबदार धरले नाही.-श्रीलंकेत 44 जवान मारले गेले तेव्हा तिथे अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. भारतात मात्र गुप्तचर यंत्रणांचे अपयश असताना कोणालाही जबाबदार धरले जात नाही. जेव्हा हे आम्ही विचारतो तेव्हा आम्हाला देशद्रोही ठरवले जाते. 

टॅग्स :PuneपुणेDigvijaya Singhदिग्विजय सिंहSadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञाNarendra Modiनरेंद्र मोदीPoliceपोलिसTerrorismदहशतवाद