शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमाफीचे अर्ज आॅनलाइन तर शिष्यवृत्तीचे का नाही? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 16:45 IST

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या अफलातून कारभारामुळे यापूर्वी राज्यात शिष्यवृत्ती वाटपात हजारो कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. शिष्यवृत्ती घोटाळ्याचा कुठलाही बोध न घेता पुन्हा शासनाने ‘मॅन्युअली’ शिष्यवृत्ती वाटपाचा निर्णय घेतला आहे. एकीकडे शेतकरी कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज मागविले जात असताना, शिष्यवृत्तीचे का नाही, असा सवाल सर्वसामान्यांतून उपस्थित होत आहे.

- गणेश वासनिक 

अमरावती: सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या अफलातून कारभारामुळे यापूर्वी राज्यात शिष्यवृत्ती वाटपात हजारो कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. शिष्यवृत्ती घोटाळ्याचा कुठलाही बोध न घेता पुन्हा शासनाने ‘मॅन्युअली’ शिष्यवृत्ती वाटपाचा निर्णय घेतला आहे. एकीकडे शेतकरी कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज मागविले जात असताना, शिष्यवृत्तीचे का नाही, असा सवाल सर्वसामान्यांतून उपस्थित होत आहे. ‘मॅन्युअल’मुळे पुन्हा शिष्यवृत्तीत घोटाळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शासनाने अनुसूचित जाती, ओबीसी, एसबीसी व व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या मॅट्रिककोत्तर शिष्यवृत्तीचे सन २०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षाकरिता २४६८.८० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी १८६० कोटी रुपये १४ मार्च २०१८ पर्यंत वाटप झाले असून, ७७२.६१ कोटी रुपये अद्याप शिल्लक आहेत. उर्वरित शिष्यवृत्तीची ही रक्कम ३१ मार्चपर्यंत वाटप करणे गरजेचे आहे. मात्र, १५ दिवसांत ७७२.६१ कोटी रुपये ‘मॅन्युअली’ वाटप करणे ‘चॅलेजिंग’ आहे. त्यामुळे महाविद्यालयाकडून शिष्यवृत्तीसाठी आलेल्या प्रस्तावास मान्यता दिल्याशिवाय सामाजिक न्याय विभागापुढे पर्याय असणार नाही, हे वास्तव आहे. विशेषत: सन २०१६-२०१७ यावर्षी शिष्यवृत्तीसाठी ११ हजार ८४२ महाविद्यालयांची संख्या होती. सन २०१७-२०१८ या वर्षात ७ हजार १५३ महाविद्यालयांनीच शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे एका वर्षात ४ हजार ६८९ महाविद्यालये कुठे गेली, हीसुद्धा महत्त्वाची बाब ठरत आहे. गतवर्षी ‘एससी’ संवर्गातील ५ लाख १५ हजार ५०० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर केले होते. याशिवाय चालू अर्थसंकल्पात शिष्यवृत्तीसाठी हजारो कोटींची तरतूद केली आहे. दुसरीकडे शासन वेबसाइटवर विद्यार्थ्यांची अचूक संख्या नोंदविलेली नाही. अगोदरच हजारो कोटी रुपये शिष्यवृत्तीचे वाटप होणे बाकी असताना १५ दिवसांत खरेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळेल काय, हा संशोधनाचा विषय आहे. एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइन अर्ज मागविले आहेत. ओबीसी, सीबीसी व व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अजूनही वेबसाईट सुरू झालेली नाही. एकूणच सामाजिक न्याय विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा पुरता गोंधळ उडाला आहे.एससी विद्यार्थ्यांना केवळ सहा टक्के रक्कम वाटपसन २०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती प्रवर्गातील २० लाख ७४ हजार ३६० इतकी संख्या आहे. त्यापैकी ८२ हजार ६१७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क वाटप झाले. एससी प्रवर्गातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी ६९ हजार ५७४ असून, त्यापैकी १२ हजार ७९१ विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा झाली आहे. एकूण विद्यार्थिसंख्येनुसार ही आकडेवारी सहा टक्के इतकीच आहे. एससी प्रवर्गातील १३ हजार ४३ विद्यार्थी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्कधारक आहेत.

टॅग्स :educationशैक्षणिकAmravatiअमरावती