शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

आमने-सामने : राजकारणात पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा आताच का आला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 12:26 IST

हिंदुत्वाच्या मुद्दयांवर भ्रम निर्माण केला जातो आहे. म्हणून उद्धव ठाकरे यांनी अतिशय चांगला शब्द वापरला तो म्हणजे नवहिंदुत्ववादी.

शिवसेनेचे बंडखाेर नेते एकनाथ शिंदे व त्यांच्यासाेबतच्या आमदारांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावरून राजकारण तापले आहे. 

अरविंद सावंत, खासदार, शिवसेना -बंडखोरांकडे कोणताही मुद्दा शिल्लक राहिला नाही म्हणून हिंदुत्वाचा मुद्दा आता आला. त्यातून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आली म्हणून डिवचण्यासाठी हे सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर ते दुसरा कोणताही आरोप करू शकत नाहीत. कारण ते सृजनशील, सौजन्यशील आणि सज्जन आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे बसले. त्यानंतर त्या माणसाने कोरोनाकाळात फोकस करून नागरिकांचे प्राण वाचविले. तुम्ही त्यांच्यावर टीका करणार. बंडखोरांच्या हाती मुद्दा नाही म्हणून भ्रम निर्माण केले जात आहेत. 

हिंदुत्वाच्या मुद्दयांवर भ्रम निर्माण केला जातो आहे. म्हणून उद्धव ठाकरे यांनी अतिशय चांगला शब्द वापरला तो म्हणजे नवहिंदुत्ववादी. बंडखोरांचा हा हिंदुत्ववाद नाही. कारण हिंदुत्ववादात द्वेष नाही; राष्ट्र आहे. राष्ट्रप्रेम आहे. त्या राष्ट्रामध्ये राष्ट्रातील माणसांबद्दलचे प्रेम आहे. सगळ्यांना एका धाग्यात ओवण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व आणले. हिंदुत्वाचे राजकीय जनक कोण असतील तर ते बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांनी कुणाचा द्वेष नाही सांगितला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेला अनुसरून उद्धव ठाकरे काम करत राहिले. हिंदुत्वाची भूमिका असेल तर ज्या हिंदुत्वाचा नुसता स्वीकार नाही तर ज्यांनी हिंदुत्व अंगीकारले अशा शिवसेनेचे खच्चीकरण केले जात आहे. 

अतुल भातखळकर, आमदार, भाजप सध्या शिवसेनेत जे काही चालू आहे, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्याशी भाजपचा कसलाच संबंध नाही; पण सध्या शिवसेनेच्या ४२ आमदारांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्याबरोबरचे मतभेद प्रकट केले आहेत. आतापर्यंत हिंदुत्वाच्या आधारे शिवसेनेची वाटचाल झाली होती; परंतु उद्धव ठाकरे यांनी जनमताचा विश्वासघात करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करून मुख्यमंत्रिपद मिळविले, तेव्हाच हिंदुत्वासोबत प्रतारणा झाली होती. काँग्रेसच्या मुखपत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केली जाते. 

उद्धव ठाकरे ते सत्तेसाठी सहन करतात. याउलट मणीशंकर अय्यर यांनी अंदमानातील सावरकरांच्या ओळी हटविल्या. तेव्हा त्या वयात बाळासाहेब ठाकरे बाहेर पडले आणि आंदोलनात सामील होत अय्यर यांच्या पुतळ्याला जोडे मारले. त्याच्या टोकाचा उलट व्यवहार उद्धव ठाकरे करत आहेत. भाजपने कधीच हिंदुत्वापासून फारकत घेतली नाही. तरीही भाजपलाच उलटसुलट प्रश्न करण्याचेच धोरण राबविले गेले; पण हे करताना स्वत:चा हिंदुत्वाचा वारसा आहे, त्याविरोधात वागतोय, याची तमा त्यांनी बाळगली नाही. एकीकडे शरद पवार आणि काँग्रेस आपली लांगूलचालनवादी धोरणे राबवत असताना उद्धव ठाकरे मात्र हिंदुत्वापासून फारकत घेत असल्याचे जनतेने पाहिले. त्यामुळे परंपरागत हिंदुत्ववादी कार्यकर्ते, सामान्य नागरिक दुरावणे सहज दिसत होते.  

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरArvind Sawantअरविंद सावंतShiv Senaशिवसेना