शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

...म्हणून संजय निरुपम यांनी शिवसेना सोडली; 'त्या' निवडणुकीत काय घडलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 17:10 IST

loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांची विशेष मुलाखत एका मराठी चॅनेलनं घेतली. त्या मुलाखतीत शिवसेना सोडण्यामागं नेमकं काय घडामोडी घडल्या त्याचा उलगडा केला आहे. 

मुंबई - Sanjay Nirupam on Shivsena ( Marathi News ) जर बाळासाहेबांनी मला मदत केली असती तर २००४ ची निवडणूक मी जिंकलो असतो, काँग्रेस उमेदवारासाठी बाळासाहेबांनी तडजोड केली. शिवसेनेसाठी इतकं झटूनही पक्षनेतृत्वानं तडजोड केल्याची खंत माझ्या मनात होती त्यामुळे मी शिवसेना सोडली असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे. निरुपम हे एकेकाळी शिवसेनेचे कडवट नेते होते. 

संजय निरुपम म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे हयात असताना मी शिवसेना सोडण्यामागे एक कारण होतं, २००४ ची लोकसभा निवडणूक मी लढलो होतो. सुनील दत्त काँग्रेसचे उमेदवार होते. तेव्हा मराठी भागात काहीतरी नकारात्मक प्रचार सुरू होता. तेव्हा मी बाळासाहेबांना या भागात तुम्ही प्रचारसभा घ्या म्हटलं, त्यांनी ठीक आहे घेतो बोलले आणि घेतली नाही. ज्या मतदारसंघात अडीच तीन लाख मतांनी सुनील दत्त निवडून येत होते. तिथे २००४ च्या निवडणुकीत केवळ ३८ हजार मतांनी जिंकले. जर साहेबांनी मदत केली असती तर ती जागा निवडून आलो असतो ती खंत माझ्या मनात होती असं त्यांनी सांगितले. एबीपी माझाच्या कार्यक्रमात निरुपम यांनी हा किस्सा सांगितला. 

तसेच त्यानंतरच्या काळात कुणीतरी मला सांगितलं, सुनील दत्त निवडणुकीपूर्वी बाळासाहेबांना भेटले होते, ही माझी शेवटची निवडणूक आहे, तुम्ही मदत करा असं त्यांनी बाळासाहेबांना पाय पकडून सांगितलं होतं. मग मला बळी का बनवलं? तेव्हा मी शिवसेनेत खूप जोरात लोकांच्या प्रश्नावर लढत होतो. शिवसेनेसाठी कष्ट घेत होतो. मग मी इतकं करताना पक्षाचे नेतृत्व तडजोड करतो त्याचा उपयोग काय आहे? मग काय करणार, त्यानंतर आणखी २-३ विषय घडले, एका प्रकरणात मला माफी मागायला सांगितली त्यामुळे आता खूप झालं, मी निघतो सांगत बाळासाहेबांकडे जावून त्यांच्या हातात राजीनामा दिला होता. कुणीही नेता मग ते राज ठाकरे, नारायण राणे, भुजबळ यांनी बाळासाहेबांच्या हातात राजीनामा दिला नव्हता हे माझं चॅलेंज आहे. मी बाळासाहेबांच्या हाती राजीनामा दिला तेव्हा बाजूला जगदंबेची मूर्ती होती. तेव्हा हे जगदंबा याला सुदबुद्धी दे, तू घरी जा, एक आठवड्यानंतर ये असं सांगितले. तेव्हा उद्धव ठाकरे अमेरिकेत होते असं निरुपम यांनी म्हटलं. 

काँग्रेस नेते संजय निरुपम हे गेल्या काही दिवसांपासून बरेच चर्चेत आहेत. महाविकास आघाडीने मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकरांना उमेदवारी दिली. त्यामुळे निरुपम नाराज असून त्यांनी ७ दिवसांत निर्णय घेऊ असं विधान केले आहे. त्यात निरुपम यांनी या मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केले.  

टॅग्स :Sanjay Nirupamसंजय निरुपमBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे