शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

...म्हणून संजय निरुपम यांनी शिवसेना सोडली; 'त्या' निवडणुकीत काय घडलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 17:10 IST

loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांची विशेष मुलाखत एका मराठी चॅनेलनं घेतली. त्या मुलाखतीत शिवसेना सोडण्यामागं नेमकं काय घडामोडी घडल्या त्याचा उलगडा केला आहे. 

मुंबई - Sanjay Nirupam on Shivsena ( Marathi News ) जर बाळासाहेबांनी मला मदत केली असती तर २००४ ची निवडणूक मी जिंकलो असतो, काँग्रेस उमेदवारासाठी बाळासाहेबांनी तडजोड केली. शिवसेनेसाठी इतकं झटूनही पक्षनेतृत्वानं तडजोड केल्याची खंत माझ्या मनात होती त्यामुळे मी शिवसेना सोडली असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे. निरुपम हे एकेकाळी शिवसेनेचे कडवट नेते होते. 

संजय निरुपम म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे हयात असताना मी शिवसेना सोडण्यामागे एक कारण होतं, २००४ ची लोकसभा निवडणूक मी लढलो होतो. सुनील दत्त काँग्रेसचे उमेदवार होते. तेव्हा मराठी भागात काहीतरी नकारात्मक प्रचार सुरू होता. तेव्हा मी बाळासाहेबांना या भागात तुम्ही प्रचारसभा घ्या म्हटलं, त्यांनी ठीक आहे घेतो बोलले आणि घेतली नाही. ज्या मतदारसंघात अडीच तीन लाख मतांनी सुनील दत्त निवडून येत होते. तिथे २००४ च्या निवडणुकीत केवळ ३८ हजार मतांनी जिंकले. जर साहेबांनी मदत केली असती तर ती जागा निवडून आलो असतो ती खंत माझ्या मनात होती असं त्यांनी सांगितले. एबीपी माझाच्या कार्यक्रमात निरुपम यांनी हा किस्सा सांगितला. 

तसेच त्यानंतरच्या काळात कुणीतरी मला सांगितलं, सुनील दत्त निवडणुकीपूर्वी बाळासाहेबांना भेटले होते, ही माझी शेवटची निवडणूक आहे, तुम्ही मदत करा असं त्यांनी बाळासाहेबांना पाय पकडून सांगितलं होतं. मग मला बळी का बनवलं? तेव्हा मी शिवसेनेत खूप जोरात लोकांच्या प्रश्नावर लढत होतो. शिवसेनेसाठी कष्ट घेत होतो. मग मी इतकं करताना पक्षाचे नेतृत्व तडजोड करतो त्याचा उपयोग काय आहे? मग काय करणार, त्यानंतर आणखी २-३ विषय घडले, एका प्रकरणात मला माफी मागायला सांगितली त्यामुळे आता खूप झालं, मी निघतो सांगत बाळासाहेबांकडे जावून त्यांच्या हातात राजीनामा दिला होता. कुणीही नेता मग ते राज ठाकरे, नारायण राणे, भुजबळ यांनी बाळासाहेबांच्या हातात राजीनामा दिला नव्हता हे माझं चॅलेंज आहे. मी बाळासाहेबांच्या हाती राजीनामा दिला तेव्हा बाजूला जगदंबेची मूर्ती होती. तेव्हा हे जगदंबा याला सुदबुद्धी दे, तू घरी जा, एक आठवड्यानंतर ये असं सांगितले. तेव्हा उद्धव ठाकरे अमेरिकेत होते असं निरुपम यांनी म्हटलं. 

काँग्रेस नेते संजय निरुपम हे गेल्या काही दिवसांपासून बरेच चर्चेत आहेत. महाविकास आघाडीने मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकरांना उमेदवारी दिली. त्यामुळे निरुपम नाराज असून त्यांनी ७ दिवसांत निर्णय घेऊ असं विधान केले आहे. त्यात निरुपम यांनी या मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केले.  

टॅग्स :Sanjay Nirupamसंजय निरुपमBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे