शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 13:31 IST

Uddhav Thackeray News: शिवसेना-कम्युनिस्ट असा संघर्ष झालेला आहे. मग समजले की, आपण उगाचच भांडत राहिलो. आम्ही भाजपाबरोबर २५ ते ३० वर्ष फुकट घालवली, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray News: बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे नाते सर्वांना माहिती आहे. मतभेद टोकाचे आणि मैत्री तर त्या पलीकडची. म्हणजे थोडक्यात काय तर राजकारणात मतभेद आहेत, पण मतभेदाला मतभिन्नता म्हणतो. मतभिन्नता असू शकते. आता कोणी म्हणेल की, डाव्यांच्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे कसे? कारण शिवसेना आणि कम्युनिस्ट असाही संघर्ष झालेला आहे. मात्र, कालांतराने कळते की आपण ज्या कारणासाठी लढतो ते बाजूलाच राहते आणि आपण उगाचच भांडतो, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.

एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जनसुरक्षा कायदा किती वाईट आहे किंवा या कायद्याचा दुरुपयोग कसा केला जाईल किंवा दुरुपयोग केला जाऊ शकतो, हे जोपर्यंत आपण सर्वसामान्य माणसांना पटवून देऊ शकत नाहीत, तो पर्यंत या कायद्याच्या विरोधात जनसामान्यांमधून उठाव होणार नाही. आम्ही बोललो तर सत्ताधारी काय म्हणणार की तुम्ही विरोधक आहात तुम्ही विरोधात बोलणारच. हो आम्ही विरोधक आहोत, पण आम्ही तुमच्या सडलेल्या मानसिकतेच्या विरोधात आहोत. देशाच्या किंवा राज्याच्या विरोधात नाही. आम्ही भाजपाबरोबर २५ ते ३० वर्ष फुकट घालवली. तेव्हा आमच्या समोर काँग्रेस आणि शरद पवार होते, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी करून मविआत सामील का झालो?

राजकारणामध्ये व्यक्तिगत द्वेष, सूड असता कामा नये. शिवसेना, शरद पवार आणि काँग्रेस एकत्र का येऊ शकलो? तर आमच्या सर्वांमध्ये देशप्रेम हा एक समान धागा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच मला आता एक क्षणभर प्रश्न पडला की मी डावा की उजवा? अर्थात दोन्ही हात आपलेच असतात. त्यामुळे डावे आणि उजवे असे काही करण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही. मला जेव्हा या कार्यक्रमासाठी फोन आला तेव्हा मी कार्यक्रमासाठी हो सांगितले, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

दरम्यान, महायुती सरकारच्या जनसुरक्षा कायद्याला विरोध करण्यासाठी जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी या परिषदेला हजेरी लावत सक्रिय पाठिंबा दर्शविला. मंत्रालयाजवळील यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम झाला. प्रतिगामी शक्तींना दूर ठेवण्याची काळजी घेऊ आणि राज्य सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, असेही शरद पवार म्हणाले. जनसुरक्षा कायद्याला विधानसभेत अपेक्षित विरोध झाला नसल्याची खंत पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस