शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दगड कुणी मारले? पेटवापेटवी करण्यामागे कुणाचा हात?; नितेश राणेंचा ठाकरेंवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 16:07 IST

अंबादास दानवे यांचा निकटवर्तीय तो आहे का? रघुनाथ शिंदे आणि अंबादास दानवे यांच्यात गेल्या २ दिवसांपासून काय बोलणे झाले आहे का? असा सवाल नितेश राणेंनी केला.

मुंबई – जालनातील मराठा आंदोलन शांततेत सुरू होते, त्याठिकाणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक प्रशासन त्यांच्याशी संपर्कात होते. मग त्यावेळी दगडी नेमकी कुणी मारली? मराठा समाजाचे ५८ मोर्चे निघाले, पण कधीही कुणालाही त्रास न देता मोर्चे काढले गेले. रुग्णवाहिकेलाही मोर्चातून वाट दिली जायची. शिस्तप्रिय आणि शांततेने मोर्चा काढणारा आमचा मराठा समाज पोलिसांवर दगडफेक करेल हे मला वाटत नाही. मग ही दगडफेक कुणी केली? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी लावली आहे. त्यात सगळे बाहेर येणारच असा इशारा दिला आहे.

आमदार नितेश राणे म्हणाले की, मराठा समाजाला कुणाला बदनाम करायचे आहे? मराठा आरक्षण हे राणे समितीने दिले. त्याला ताकदीने टिकवण्याचे काम कोर्टात आणि विविध स्तरावर देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठा समाजाला याची जाणीव आहे. विरोधक फडणवीसांना घेरण्याचा प्रयत्न करतायेत. हे विरोधक जेव्हा मविआच्या काळात सरकारमध्ये होते. तेव्हा आरक्षणाची वाट लावण्याचे काम उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारने केले होते. व्यवस्थित वकील द्यायचे नाहीत, प्रेझेंटेशन द्यायचे नाही. मराठा आरक्षणाची केस नाजूक कशी होईल यासाठी उद्धव ठाकरे सरकारने ताकद लावली होती. आज हे आमच्यावर आरोप करत आहेत अशी टीका नितेश राणेंनी महाविकास आघाडीवर केली.

तसेच सामना वृत्तपत्रात मराठा समाजातील माताभगिनींना हिणवण्याचे काम झाले, मूक मोर्चाचे मुका मोर्चा कार्टून छापले ते आमच्यावर टीका करतायेत. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजावर बोलू नये. मराठा आणि ओबीसी समाजात वाद कसा पेटवायचा हे काम मंत्री म्हणून वडेट्टीवार यांनी केले होते. दंगली कुणी पेटवल्या? कुणाल्या दंगली हव्यात? उद्धव ठाकरे, संजय राऊत हे बोलत आहेत. मग जालन्यात झालेल्या दंगलीबाबत तुम्ही बोलत होता का? छत्रपती संभाजीनगरमध्ये काही बसेस पेटवण्यात आल्या. ती माणसे कुणाची होती? रघुनाथ शिंदे कुणाचा माणूस आहे? अंबादास दानवे यांचा निकटवर्तीय तो आहे का? रघुनाथ शिंदे आणि अंबादास दानवे यांच्यात गेल्या २ दिवसांपासून काय बोलणे झाले आहे का? या बसेस पेटल्या त्यामागे अंबादास दानवेंचा हात आहे का याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी नितेश राणेंनी सरकारकडे केली आहे.

दरम्यान, एकाबाजूला सरकारवर टीका करायची दुसरीकडे पेटवापेटवी करायची. महाराष्ट्रातला हिंदू समाज जो एकत्र आलाय तो यांना बघवत नाही. औरंग्याला बाप समजणाऱ्यांची दुकाने बंद व्हायला लागलीत. मुघलांनी हिंदूच्या जातीजातीत भांडणे लावण्याचा प्रयत्न केला. तोच प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करतायेत. जिहादींच्या दाढी कुरवळणे हे यांचे धंदे आहेत. मराठा, ओबीसी समाजात वाद निर्माण होईल यासाठी प्रयत्न सुरू आहे. कलेक्टर, पोलीस आंदोलनकर्त्यांच्या संपर्कात होते. आंदोलन काल संपणार होते मग दगडी कुणी मारली? आज जे नेते तिथे चाललेत, ज्या मराठा आंदोलकांवर केसेस होतील त्यांच्यामागे उभे राहणार का? ज्यांची चूक नाही त्यांच्यावर केस नाही. मी आंदोलनकर्त्यांशी बोलणार आहोत. मराठा आरक्षणासाठी वर्षोनुवर्षे आम्ही लढतोय. मराठा समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन हिंदू समाजाला टार्गेट केले जात असेल तर महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नाही असा इशाराही आमदार नितेश राणेंनी दिला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणNitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरे