शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

मंत्रालयात बसलेला जनरल डायर कोण?; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस, अजितदादांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 13:34 IST

लाठीचार्ज हा पोलिसांचा दोष नाही. वरिष्ठांचा आदेश आल्याशिवाय हा निर्णय पोलीस घेऊ शकत नाही. हा संवेदनशील विषय आहे. पोलिसांना वरून आदेश आले असा आरोप संजय राऊतांनी केला.

मुंबई – आरक्षणासाठी बैठका होत असतात पण मंत्रालयात बसलेला जनरल डायर कोण आहे? जालनात मराठा आंदोलक शांततेने आंदोलन करत होते. त्यांच्यावर गोळी चालवण्याचा, लाठीचार्ज करण्याचा, अश्रूधूर फोडण्याचा आदेश कुणी दिला? गृहमंत्री काय करतात, केवळ राजकीय विरोधकांना दडपण्यासाठी, आवाज बंद करण्यासाठी यंत्रणेचा वापर केला जातो. अजित पवार कालपर्यंत मोर्चात सहभागी होत होते, आज कुठे आहेत? अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात जनरल डायरचं राज्य आहे. एक नव्हे तीन तीन जनरल डायर आहे. एक मुख्य जनरल डायर आणि २ डेप्युटी जनरल डायर आहे. जनरल डायरच्या मानसिकतेने राज्य सुरू आहे. जे विरोधात आहे त्यांच्यावर हल्ले करा, गोळ्या घाला किंवा पोलीस, तपास यंत्रणांचा वापर करून खोट्या गुन्ह्यात अडकवा. आमच्यासोबत जे आहेत त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्या. पोलिसांना आदेश देणारा तो फोन मुख्यमंत्री कार्यालय, गृहमंत्री कुणाचा होता? लाठीचार्ज हा पोलिसांचा दोष नाही. वरिष्ठांचा आदेश आल्याशिवाय हा निर्णय पोलीस घेऊ शकत नाही. हा संवेदनशील विषय आहे. पोलिसांना वरून आदेश आले, ही गोपनीयता पोलीस पाळतायेत. शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा अडथळा येऊ नये म्हणून मराठा आंदोलन चिरडून टाका, मैदान साफ करा असा आदेश पोलिसांना दिला असा आरोप त्यांनी केला.

त्याचसोबत दिल्लीचे अधिकार केंद्राच्या हातून जात होते, त्यासाठी संसदेत घटनादुरुस्ती विधेयक आणले. मग संसदेचे विशेष अधिवेशन बोलावलं आहे. त्यात मराठा आरक्षणासंदर्भात घटना दुरुस्ती करून न्याय मिळवून द्या. तुमच्या स्वार्थासाठी घटना दुरुस्ती करता. महाराष्ट्रात एक समाज रस्त्यावर उतरला आहे त्याच्यावर तुम्ही गोळ्या घालता, महिलांची डोकी फोडता मग या समाजाला घटना दुरुस्ती करून न्याय का देत नाही? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला.

ईडीग्रस्त लोकांना पद्म पुरस्कार देणार

ईडीने अजित पवारांबाबत काय केले? ते पाहा. कालपर्यंत ज्यांच्यावर धाडी घालत होता, गुन्हे दाखल करत होता. तपास सुरू होता. जरंडेश्वरवर जप्ती आली. आता गुन्हा मागे घेतला, जरंडेश्वर मोकळा झाला, चार्जशीटमधून नाव गायब झाले. हसन मुश्रीफ यांना ईडीवाले महात्मा पदवी देत आहेत. प्रफुल पटेल, हसन मुश्रीफ, किरीट सोमय्या, भावना गवळी, राहुल शेवाळे यांना २६ जानेवारीला पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्रिटीश काळात रावसाहेब पदवी द्यायचे. आता या सगळ्यांना ईडीग्रस्त जे आहेत जे भाजपात गेले. त्यांना पुरस्कार मिळू शकतो असा टोला संजय राऊतांनी लगावला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारMaratha Reservationमराठा आरक्षण