शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

प्रकल्प कुणामुळे गेला? आरोप-प्रत्यारोपांचे ‘उद्योग’, ‘एअरबस’वरून विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 09:07 IST

सप्टेंबर २०२१ मध्येच एअर बस प्रकल्पासाठीचा करार झाला होता, तेव्हा सरकार कोणाचे होते, असा सवाल भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केला.

मुंबई : नागपुरातील प्रस्तावित एअर बस प्रकल्प कुणामुळे गुजरातमध्ये गेला, यावर आता आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उठला आहे. गुजरातमध्ये एकामागून एक उद्योग पळविण्यासाठीच शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आणले गेले, असा आरोप माजी उद्योग मंत्री व शिवसेना (ठाकरे गट) नेते सुभाष देसाई यांनी केला. तर सप्टेंबर २०२१ मध्येच एअर बस प्रकल्पासाठीचा करार झाला होता, तेव्हा सरकार कोणाचे होते, असा सवाल भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केला. 

देसाई म्हणाले, की आमचे सरकार असताना टाटांच्या नागपुरातील एअरबस प्रकल्पासाठी बैठका झाल्या होत्या. मनुष्यबळ, सवलती देण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर पुढे ‘वर्षा’ बंगल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्यासोबत एक बैठक झाली. यामध्ये सेमीकंडक्टर, एअरबस आणि इतर प्रकल्पांबाबतही चर्चा झाली होती. पुढील टप्प्यात सह्याद्री अतिथिगृहावर बैठक झाली. त्याला मी मी, मंत्री आदित्य ठाकरे,  टाटा समूहाचे अध्यक्ष चंद्रशेखरन उपस्थित होते. हा प्रकल्प नवीन सरकारने पुढे न्यायला हवा होता. 

 उदय सामंत म्हणतात...मी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काहीच दिवसात मला टाटाच्या नागपुरातील या प्रकल्पाबाबत पत्रकारांनी विचारले असता मी विविध प्रकल्पांचा आम्ही पाठपुरावा करू असे म्हटले होते. नंतर मी माहिती घेतली असता नागपुरातील प्रकल्प मविआ सरकारच्या काळातच गुजरातेत गेला असल्याचे मला समजले. तो परत मिळावा यासाठी मी पत्रव्यवहार केला. 

असे काय घडले?मंत्री प्रकल्पाबाबत वेगवेगळी वक्तव्य करतात याचा अर्थ सरकारमध्ये ताळमेळ नाही किंवा लोकांची दिशाभूल करत आहेत. मेरीटवर प्रकल्प येत असताना असे काय घडले की तीनही प्रकल्प गेले, असा सवाल खा. सुप्रिया सुळे यांनी केला. पटोले यांचा सवालउद्योग, महत्त्वाच्या संस्था गुजरातला घेऊन जायच्या आणि मुंबई-महाराष्ट्राचे महत्त्व कमी करायचे हे आठ वर्षांपासून सुरू आहे. आता मुंबईही गुजरातला देतील. अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

तेव्हा झोपा काढत होते का?प्रसाद लाड म्हणाले की या प्रकल्पासाठी २१ सप्टेंबर २०२१ रोजी एमओयू झाला याची माहिती तत्कालीन मविआ सरकारला होती का? केंद्र सरकार, टाटा आणि एका फ्रेंच कंपनीदरम्यान तो करार झाला तेव्हा मविआ सरकार झोपा काढत होते का? आताच्या सरकारच्या काळात नाही तर मविआ सरकारच्या काळातच प्रकल्प तिकडे गेला. आता आमच्यावर खापर का फोडत आहात? 

राष्ट्रवादी करणार आंदोलनराज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये नेले जात असल्याच्या निषेधार्थ  राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे येत्या ३१ ऑक्टोबर रोजी राज्यभर सरकारविरोधात आंदोलन केले जाणार आहे. गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बघ्याच्या भूमिकेत आहेत. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :TataटाटाMaharashtraमहाराष्ट्रbusinessव्यवसाय