शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

प्रकल्प कुणामुळे गेला? आरोप-प्रत्यारोपांचे ‘उद्योग’, ‘एअरबस’वरून विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 09:07 IST

सप्टेंबर २०२१ मध्येच एअर बस प्रकल्पासाठीचा करार झाला होता, तेव्हा सरकार कोणाचे होते, असा सवाल भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केला.

मुंबई : नागपुरातील प्रस्तावित एअर बस प्रकल्प कुणामुळे गुजरातमध्ये गेला, यावर आता आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उठला आहे. गुजरातमध्ये एकामागून एक उद्योग पळविण्यासाठीच शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आणले गेले, असा आरोप माजी उद्योग मंत्री व शिवसेना (ठाकरे गट) नेते सुभाष देसाई यांनी केला. तर सप्टेंबर २०२१ मध्येच एअर बस प्रकल्पासाठीचा करार झाला होता, तेव्हा सरकार कोणाचे होते, असा सवाल भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केला. 

देसाई म्हणाले, की आमचे सरकार असताना टाटांच्या नागपुरातील एअरबस प्रकल्पासाठी बैठका झाल्या होत्या. मनुष्यबळ, सवलती देण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर पुढे ‘वर्षा’ बंगल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्यासोबत एक बैठक झाली. यामध्ये सेमीकंडक्टर, एअरबस आणि इतर प्रकल्पांबाबतही चर्चा झाली होती. पुढील टप्प्यात सह्याद्री अतिथिगृहावर बैठक झाली. त्याला मी मी, मंत्री आदित्य ठाकरे,  टाटा समूहाचे अध्यक्ष चंद्रशेखरन उपस्थित होते. हा प्रकल्प नवीन सरकारने पुढे न्यायला हवा होता. 

 उदय सामंत म्हणतात...मी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काहीच दिवसात मला टाटाच्या नागपुरातील या प्रकल्पाबाबत पत्रकारांनी विचारले असता मी विविध प्रकल्पांचा आम्ही पाठपुरावा करू असे म्हटले होते. नंतर मी माहिती घेतली असता नागपुरातील प्रकल्प मविआ सरकारच्या काळातच गुजरातेत गेला असल्याचे मला समजले. तो परत मिळावा यासाठी मी पत्रव्यवहार केला. 

असे काय घडले?मंत्री प्रकल्पाबाबत वेगवेगळी वक्तव्य करतात याचा अर्थ सरकारमध्ये ताळमेळ नाही किंवा लोकांची दिशाभूल करत आहेत. मेरीटवर प्रकल्प येत असताना असे काय घडले की तीनही प्रकल्प गेले, असा सवाल खा. सुप्रिया सुळे यांनी केला. पटोले यांचा सवालउद्योग, महत्त्वाच्या संस्था गुजरातला घेऊन जायच्या आणि मुंबई-महाराष्ट्राचे महत्त्व कमी करायचे हे आठ वर्षांपासून सुरू आहे. आता मुंबईही गुजरातला देतील. अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

तेव्हा झोपा काढत होते का?प्रसाद लाड म्हणाले की या प्रकल्पासाठी २१ सप्टेंबर २०२१ रोजी एमओयू झाला याची माहिती तत्कालीन मविआ सरकारला होती का? केंद्र सरकार, टाटा आणि एका फ्रेंच कंपनीदरम्यान तो करार झाला तेव्हा मविआ सरकार झोपा काढत होते का? आताच्या सरकारच्या काळात नाही तर मविआ सरकारच्या काळातच प्रकल्प तिकडे गेला. आता आमच्यावर खापर का फोडत आहात? 

राष्ट्रवादी करणार आंदोलनराज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये नेले जात असल्याच्या निषेधार्थ  राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे येत्या ३१ ऑक्टोबर रोजी राज्यभर सरकारविरोधात आंदोलन केले जाणार आहे. गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बघ्याच्या भूमिकेत आहेत. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :TataटाटाMaharashtraमहाराष्ट्रbusinessव्यवसाय