शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

कोण करतय भाजपमधील निष्ठावंतांची कोंडी ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 5:36 PM

भाजप आणि शिवसेनेत या आयारामांना मोठ्या आदराने सामावून घेतले गेले आहे. मात्र यामुळे पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांची परवड होण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून पक्षाकडून संधी मिळेल या आशेवर अनेक कार्यकर्ते आहेत. अशा वेळी बाहेरून आलेल्या व्यक्तीला संधी दिल्यास, गटबाजी होण्याची दाट शक्यता आहे.

मुंबई - भारतीय जनता पक्षाचा झंझावात आणि विरोधकांची झालेली वाताहत यामुळे अनेकांना विधानसभेत निवडून येण्याची भ्रांत आहे. ज्यांना निवडून येण्याची खात्री आहे, त्यांना मंत्रीपदाची ओढ आहे. तर काही नेत्यांना निर्माण केलेले साम्राज्य टिकून ठेवायचे आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांचा पक्षांतरावर जोर वाढला आहे. मात्र या पक्षांतरातून भाजप आणि शिवसेना यांच्यातील गटबाजी वाढण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत ३० हून अधिक नेते सत्ताधारी भाजप-शिवसेनेत दाखल झाले आहेत. भाजप आणि शिवसेनेत या आयारामांना मोठ्या आदराने सामावून घेतले गेले आहे. मात्र यामुळे पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांची परवड होण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून पक्षाकडून संधी मिळेल या आशेवर अनेक कार्यकर्ते आहेत. अशा वेळी बाहेरून आलेल्या व्यक्तीला संधी दिल्यास, गटबाजी होण्याची दाट शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी काही जागांवर भाजपने उमेदवार बदलले. त्यावेळी भाजपने नाराज नेत्यांची समजूत काढली तर अनेकांची बंडखोरी मोडीत काढली. विधानसभा पातळीवर मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले आहे. त्यामुळे बंडखोरीही मोठ्या प्रमाणात होणार आहे. कदाचित ही बंडखोरी मोडीत काढण्यात भाजपला यशही येईल. परंतु, पक्षांतर्गत गटबाजी रोखण्याचे आव्हान वाटते तेवढे सोपे नाही.

पक्षांतर करून भाजपमध्ये दाखल झालेल्या पूर्वाश्रमीच्या शत्रुच्या विजयासाठी निष्ठावान कार्यकर्त्यांना धडपड करावी लागणार आहे. निवडून आल्यानंतर या आयारामांचे मतदार संघात वर्चस्व वाढणार आहे. त्यामुळे या आयारामांना निवडून का आणायच, असा काहीसा प्रश्न कार्यकर्त्यांना पडू शकतो. हे रोखण्यासाठी कार्यकर्त्यांनी गटबाजी केल्यास, त्याचा फटका सहाजिकच पक्षाला बसणार आहे. त्यामुळे आयारामांची आणि पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची घडी भाजपला बसवावी लागणार आहे. अन्यथा आवक वाढीचा परिणाम गटबाजी वधारण्यावर होणार हे नक्की.