शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

महाराष्ट्रातील हिंसाचाराचा खरा सूत्रधार कोण ? पोलिसांनी गृह मंत्रालयाला सादर केलेल्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 2:26 PM

पोलिसांनी गृह मंत्रालयाला सादर केलेल्या अहवालात काही मुस्लिम संघटना आणि राजकीय पक्षांशी संबंधित लोकांची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुंबई: महाराष्ट्र पोलिसांनी मालेगाव, अमरावती, नांदेड आणि महाराष्ट्रातील इतर भागात 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी झालेल्या हिंसाचाराची रिपोर्ट गृह मंत्रालयाला सादर केला आहे. या रिपोर्टमधील काही माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, हिंसाचाराची संपूर्ण प्लॅनिंग फार पूर्वीच करण्यात आली होती. महाराष्ट्र पोलिसांच्या तपासात आतापर्यंत सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेल्या अशा 60-70 पोस्ट आढळून आल्या आहेत, ज्यांनी हिंसाचार भडकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर त्रिपुरामध्ये 7 मशिदी पाडण्यात आल्याची बनावट पोस्ट करण्यात आली होती. यानंतर, व्हॉट्सअ‍ॅपवर हजारोंच्या संख्येने अनेक पोस्ट फॉरवर्ड करण्यात आल्या. याचा हेतू अधिकाधिक लोक या तथाकथित सुनियोजित दंगलीत जाणूनबुजून किंवा नकळत सहभागी व्हावे, असा होता. गृह मंत्रालयाला सादर केलेल्या अहवालात अशा 36 सोशल मीडिया पोस्टचा उल्लेख आहे.

अशी होती दंगलीची टाइमलाइन29 ऑक्टोबर रोजी पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे सदस्य त्रिपुरातील कथित घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जातात. 1 नोव्हेंबर रोजी जय संविधान संघटनेनंही जिल्हाधिकार्‍यांकडे निषेध नोंदविला. 6 नोव्हेंबर रोजी सरताज नावाच्या व्यक्तीचा एक ऑडिओ मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात आला. या ऑडिओद्वारे कथित चिथावणीखोर पद्धतीने म्हटले होते की, त्रिपुरातील अनेक मशिदी पाडण्यात आल्या असून हीच वेळ एकत्र येण्याची आहे. 

7 ते 11 नोव्हेंबरपर्यंत रझा अकादमीने त्रिपुरातील घटनांबाबत राज्यव्यापी बंदची हाक दिली होती. तसेच सोशल मीडियावर अनेक मेसेज फॉरवर्ड करण्यात आले. 12 नोव्हेंबर रोजी मालेगाव, अमरावती, नांदेड आणि काही भागात बंदला सुरुवात करण्यात आली आणि दुकाने बंद न करणाऱ्यांवर हिंसाचार करण्यात आला. 12 नोव्हेंबरच्या संध्याकाळी काही राजकीय कार्यकर्त्यांकडून दिवसभर झालेल्या हिंसाचाराच्या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवण्यात आले आणि त्याच्या निषेधार्थ दुसऱ्या दिवशी पुन्हा बंदचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :PoliceपोलिसTripuraत्रिपुराAmravatiअमरावतीNandedनांदेडMalegaonमालेगांवHome Ministryगृह मंत्रालय