शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

विधानसभेला कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचे? मनोज जरांगेंनी अखेर गोंधळ संपवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 16:27 IST

Manoj Jarange Maharashtra Vidhan Sabha elections : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असून, मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उतरवण्याची घोषणा केली. यासंदर्भात आज जरांगेंनी महत्त्वाचे आवाहन समाजाला केले.

Maharashtra Vidhan Sabha elections, Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली आहे. अंतरवाली सराटीत झालेल्या बैठकीत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भातही महत्त्वाची माहिती दिली. 

पुढील काळात मतदारसंघनिहाय घोंगडी बैठका घेणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांना दिली. त्याचबरोबर भाजपचे उमेदवार पाडणार, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. 

विधानसभा निवडणुकीबद्दल मनोज जरांगे पाटील म्हणाले?

"आपल्या फक्त एकच उमेदवार द्यावा लागणार आहे. माझी फक्त एकच विनंती आहे. एकजूट आवश्य असलीच पाहिजे. शंभर टक्के प्रत्येकाने आशावादी असले पाहिजे आणि एकजूट असले पाहिजे. समाजाने एक दिला ना... आपली ती वाट आहे का, नाही. गोरगरिबांची लाट आली अठरापगड जातीची. एक उमेदवार द्या. दिला की, द्या एकदा निवडून त्याला. ७० वर्ष यांना दिले", असे जरांगेंनी बैठकीत सांगितले. 

मनोज जरांगेंनी कुणाला दिला इशारा?

"एक उमेदवार दिल्यानंतर मराठ्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला, तर त्याचा अर्थ असा समजायचा मराठ्यांनी हा समाजासाठी आणि आंदोलनासाठी आपल्यासोबत नव्हता, तर ही अवलाद स्वार्थासाठी होती. याला राजकारणात जायचे होते. याला आमदार व्हायचे होते", असा इशारा जरांगेंनी अपक्ष अर्ज भरण्याच्या तयारीत असलेल्यांना दिला. 

"एक दिला, तर अडचण काय? तुमचे आणि त्याचे नसेल पटत. त्याच्या तोंडाकडे बघू नका, पण त्याला जातीसाठी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडण्यासाठी द्या एकदा निवडून. नसेल पटत तरी द्या. त्यांच्याकडे तुम्ही जाऊ पण नका. तुमचे काम मला सांगा, मी त्याच्याकडून करून घेतो. तुम्ही काळजी करू नका", असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

छगन भुजबळांची उडवली खिल्ली

"तिकडे (विधानसभेत) एकटा छगन भुजबळ येतोय. ओरडून ओरडून त्याच्या नाकावर चष्मा येतोय, तरी आरक्षणाला विरोधच करतोय. बोटाने वर सुद्धा लोटत नाही. त्याला कपडे लटकवायचा चिमटा बसून देऊ आपण. म्हणजे वरच राहील असा. ते नीट चालत पण नाही. देवेंद्र फडणवीसांनी माकडे जमा केली आणि मराठा समाजाच्या मागे लावली", अशी टीका मनोज जरांगे पाटलांनी केली.  

देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र

"हे लय बेक्कार लोक आहेत. माझ्याजवळ काही नाही म्हणून धोरणाला लागलेय, नाहीत यांनी मला आतापर्यंत आत (तुरुंगात) टाकले असते. माझ्याजवळ तपासाला काय आहे? 13 पत्रे आहेत माझ्या घरावर सिमेंटचे. ते नेऊच शकत नाही. देवेंद्र फडणवीस नेईल म्हटल्यावर मी आता त्याला चौहीकडून भिंती बांधल्या आहेत", असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलPoliticsराजकारणMaratha Reservationमराठा आरक्षण