शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

इलेक्ट्रॉनिक मीडियाला काही बंधनं आहेत की नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2016 02:52 IST

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हल्ल्याची माहिती ज्या प्रकारे इलेक्ट्रॉनिक मीडियाने प्रसारित केली, त्यावर गंभीर आक्षेप घेतले होते. मीडियाला माहिती देण्याचा अधिकार

- कर्नल (निवृत्त) श्री खासगीवाले

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हल्ल्याची माहिती ज्या प्रकारे इलेक्ट्रॉनिक मीडियाने प्रसारित केली, त्यावर गंभीर आक्षेप घेतले होते. मीडियाला माहिती देण्याचा अधिकार जरी असला तरीही त्यावर युद्ध किंवा युद्धसदृष्य हालचाली होत असताना त्यांच्या हालचालींच्या लाइव्ह कव्हरेजला मनाई न्यायालयाने घातली होती. असे असूनही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वागण्यात बदल झालेला नाही, असे उरणच्या घटनेमुळे दिसून आले आहे.उरणला काही शाळकरी मुलांनी लष्करी वेशातील हत्यारे बाळगलेल्या काही संदिग्ध इसमांना अनोळखी भाषेत ‘शाळा’ व ‘ओएनजीसी’ विषयी बोलताना ऐकले. त्यांनी स्वत:हून ती माहिती लगेचच पोलिसांना दिली. सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत सर्व सरकारी यंत्रणेने माहितीच्या आधारे ताबडतोब हालचाली सुरू केल्या. नाकेबंदी, संदिग्ध जागांची झडती व सर्वसमावेशक चौकशी यासह एटीएस व फोर्स वनद्वारे तपासाचे काम सुरू झाले. हे होत असताना इलेक्ट्रॉनिक मीडियाला मात्र शाळकारी मुलांनी दाखवला, त्याच्या एक शतांशही समजुतदारपणा दाखवता आला नाही. ‘आम्ही सर्वात आधी ही माहिती तुमच्यापर्यंत आणली आहे’ हे वाक्य बोडक्यावर तासनतास हॅमर करत बसण्याच्या नादात ते दहशतवाद्यांना किती मदत करत आहेत, हे त्यांच्या लक्षात आले नाही का? दहशतवादी आल्याची बातमी माध्यमात दिसू लागताच ते आपल्या हालचाली अधिक सावधपणे करणार नाहीत का? हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. याच सर्वात पहिली चूक आहे पोलीस प्रशासनाची. जर साडेसात वाजता या मुलांना हे इसम दिसले असतील, तर त्यांनी ती माहिती आठ वाजण्याच्या आसपास दिली असेलच. या माहितीची पूर्ण शहानिशा झाली नसेल आणि ते करण्यासाठी आणखी मदत मागणे गरजेचे असेल तर त्यात काही वेळ नक्कीच लागतो. पण पोलिसांनी ही माहिती ब्रेकिंग न्यूजसारखी स्वत:च मीडियाला दिली आणि सकाळी साडेदहाच्या सुमारास त्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यांवर झळकायला लागल्या. माध्यमांना ही माहिती पोहोचवण्याची पोलिसांना का घाई झाली? या तपासाची माहिती माध्यमांना मिळाल्यावर त्यांच्याकडून पोलिसांना कुठली मदत मिळणार होती? माध्यमांना माहिती मिळताच, पोलिसांनी कुठल्या भागात किती संख्येने चौक्या कशा लावल्या आहेत, बंदोबस्त कसा आणि कुठे ठेवला आहे, याचे प्रसारण करणे म्हणजे दहशतवाद्यांना मदतच नव्हे का ? आपण आल्याची माहिती पोलिसांना समजली आहे, हे दहशतवाद्यांना माध्यमांतूनच कळले तर त्यांना त्याचा फायदा होतो, हेही माध्यमांनी लक्षात घ्यायचे नाही? अशा वेळी दहशतवादी वा संशयित पुढील हालचाली अधिक सावधगिरीने करू शकतात आणि योजनेत बदलही करू शकतात. पोलिसांनी ही माहिती काहीशी उशिरा इलेक्ट्रॉनिक माध्यमांना दिली नसती, तर संशयितांना पकडणे अधिक सोपे झाले नसते का? इलेक्ट्रॉनिक मीडियातून बातम्या दिसताच, आतंकवाद्यांना कुठला मार्ग टाळून सामानासकट वा सामानाशिवाय कसे पळायचे हे ठरवायला मदत होण्याची शक्यता असते, याचा विचार नको करायला?पोलिस व माध्यमांनाही इतक्या लवकर २६/११ चा विसर पडावा याचे नवल वाटते. प्रत्येक चुकीनंतर आपण सुधारायचा प्रयत्न करतो. पण इथे तर उलटेच. ना पोलीस संवेदनशील, ना इलेक्ट्रॉनिक मीडिया जबाबदार. यात सामान्य नागरिकांचेच मरण नाही का?