शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

मराठवाड्याची ५२५ कोटींची मदत देणार कुठे-कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 06:41 IST

पहिल्या टप्प्यातील दुष्काळनिधी; नियोजनाचा अभाव; निवडणुकीनंतर दुसरा हप्ता

औरंगाबाद : मराठवाड्यात कमी पावसाअभावी यंदाचा खरीप हंगाम वाया गेला असून, विभागात प्रचंड दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शासनाने २,५६४ कोटी ९१ लाख रुपयांची एकूण तरतूद बाधित शेतकऱ्यांसाठी केली आहे. त्यातून ५२५ कोटी रुपयांचा पहिला टप्पा मिळणार आहे. या मदतीचे वाटप कशी व कुठे करायची याचे नियोजन नसल्यामुळे त्याचे वितरित कसे करणार हा प्रश्न आहे.लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत दुष्काळ मदत निधी अडकला तर आचारसंहितेनंतरच दुसरा हप्ता येण्याचा मार्ग मोकळा होण्याचे प्रशासकीय संकेत आहेत.ही मदत थेट शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असून, यातून बँकेने कुठलीही वसुली करू नये, असे २५ जानेवारीच्या शासन अध्यादेशात म्हटले आहे. शेती पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना दोन हप्त्यात मदत करण्यात यावी. प्रथम हप्ता ६ हजार ८०० रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे ५० टक्के म्हणजेच ३४०० रुपये प्रतिहेक्टर रक्कम शेती पिकांच्या नुकसानीच्या अनुषंगाने प्रथम देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात बीडमध्ये १२६ कोटी तर औरंगाबादमध्ये १११ कोटी रुपयांचे वाटप करावे लागणार आहेत. त्याखालोखाल जालन्यात ९७ कोटींचे वाटप होईल.जवळपास सर्व बाधित शेतकºयांपर्यंत ही मदत पोहोचेल. मंडळनिहाय, गावनिहाय कामांचा आढावा घेऊन मदत निधी वाटप होईल. निधी वाटपाला विलंब होऊ नये, अशा सूचना विभागीय पातळीवर दिल्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले.लातूर, नांदेडला सर्वात कमी निधीमराठवाड्यात लातूर, नांदेडला सर्वाधिक कमी निधी मिळाला आहे. लातूरसाठी ६ कोटी ६३ लाख रुपये मंजूर झाले असून, ३ कोटी ३१ लाख पहिल्या टप्प्यात मिळणार आहेत.नांदेड जिल्ह्यासाठीही ५१.५१ कोटी मंजूर झाले असून, त्याचा पहिला टप्पा २५.७५ कोटींचा राहणार आहे.लातूर जिल्ह्यात खरिपाचे शेकडो कोटींचे नुकसान झाले असताना केवळ ६ कोटी रुपये मदत शासनाकडून जाहीर झाली. ही बाब दुजाभाव करणारी असल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे म्हणाले.

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडा