शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
2
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
4
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
5
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
6
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
7
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
8
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
9
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
10
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
11
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
12
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
13
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
14
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
15
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
16
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
17
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
18
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
19
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 16:08 IST

उतावीळपणे का होईना सत्ताधारी पक्षानेही मतदार यादीतील घोळ मान्य केला असंही मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी म्हटलं.

मुंबई - सत्याचा मोर्चा हा पारदर्शक मतदार यादीसाठी होता. जे या मोर्चाविरोधात बोलत होते, तेच त्यांच्याच मुखातून मतदार यादीतील दुबार वाचून दाखवत आहेत. या लोकांनी प्रश्न राज ठाकरेंना विचारले. पारदर्शक मतदार यादीसाठी मोर्चा निघाला असताना त्याला जातीचा, धर्माचा रंग देण्याचा केविळवाणा प्रयत्न भाजपाने केला. याचा कुठे दुरान्वये संबंध नाही. राज ठाकरे यांच्या हिंदुत्वावर तुम्ही प्रश्नचिन्ह उभे करता तेव्हा आम्हाला आठवण होते, जेव्हा रझा अकादमीने आझाद मैदानावर धुडगूस घातला होता. तेव्हा लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला होता तेव्हा भाजपावाले कुठे होते असा सवाल मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी विचारला आहे.

भाजपा नेते आशिष शेलार यांनी केलेल्या आरोपांवर मनसेने पलटवार केला. अभ्यंकर म्हणाले की, आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतोय, उत्तर भाजपा का देतेय, त्याचे कारण काय? निवडणूक आयोगाने २९ पानी पत्र काढले आहे. त्यात १२ राज्यांचा उल्लेख आहे. त्यात SIR बाबत कुठेही महाराष्ट्राचा उल्लेख नाही. याबाबत आम्ही विचारणा केली तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने SIR घेता येणार नाही असं राज्य निवडणूक आयोगाने म्हटलं. मुळात राज्यातील सर्वच पक्षाने मतदार यादीतील घोळ मान्य केला आहे. मूक मोर्चा काढला जातो आणि तिथे भाषणे केली जातात हा २०२५ चा विनोद आहे असा टोला त्यांनी भाजपाच्या मूक मोर्चाला लगावला. 

तसेच काही गोष्टी खरोखर कळत नाही. आम्ही मागणी स्पेशल समरी रिवीजनची आहे ती तुम्ही का करत नाही. जय पराजय कुणाचाही होईल. मतदार यादीतील घोळ सुधारा आणि निवडणूक घ्या ही आमची मागणी आहे. मुंबईत १० हजाराहून अधिक मतदार याद्या आहेत. निवडणूक आयोगाने BLO ची यादी पत्त्यासह जाहीर करावी. प्रत्येक पक्षाने बीएलए नेमलेले असतात. आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही असं निवडणूक आयोग सांगतो. निवडणूक कार्यक्रम जाहीर केला, इतकी घाई कशाला? उतावीळपणे का होईना सत्ताधारी पक्षानेही मतदार यादीतील घोळ मान्य केला असंही मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी म्हटलं.

दरम्यान, आमची मागणी मतदार याद्या शुद्ध करा आणि निवडणूक घ्या ही आहे. इतरांना मिरच्या झोंबण्याचं कारण नाही. सत्ताधाऱ्यांसकट सगळ्यांनी दुबार मतदार आहेत हे मान्य केले. आम्ही प्रश्न केले आहेत उत्तरे निवडणूक आयोगाने द्यावीत. भाजपा याला जातीधर्माचा रंग देतंय..मतदार यादी शुद्ध करा ही सगळ्यांची मागणी आहे. राज ठाकरेंना हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता नाही. सत्तेसाठी, खुर्चीसाठी राज ठाकरे दुसऱ्यांचा पक्ष फोडत नाही. जय-पराजय झाला तो त्याच पद्धतीने ते स्वीकारतात. महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरे यांनी स्वत:वर १०० हून अधिक गुन्हे घेतले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या आहेत. जेलमध्ये गेलेले आहेत. मतदार यादी शुद्ध करणे ही मागणी योग्य आहे ती चुकीची ते भाजपाने सांगावे. निवडणूक आयोगाचे हे काम आहे. उदाहरणासाठी काही नावे घेतली, त्यात मतदार यादीतील घोळ सांगितला. त्यात एका जातीची, धर्माची माणसे नाहीत. साडे नऊ कोटी मतदार आहेत त्यातील दुबार, पत्ता बदललेले, मृत झालेले, जे सापडत नाहीत ती नावे वगळण्यात यावीत हे सामान्य चौथी पास झालेल्या माणसालाही कळू शकेल. यात जातीचा पातीचा विषय येत नाही. निवडणूक आयोगाचे वकीलपत्र भाजपाने घेतले आहे. तुम्ही आयोगाचे प्रवक्ते आहात का असा प्रश्न मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी आशिष शेलार यांना विचारला. 

English
हिंदी सारांश
Web Title : MNS questions BJP's absence during Raj Thackeray's Raza Academy protest.

Web Summary : MNS criticizes BJP for questioning Raj Thackeray's Hindutva, recalling his protest against Raza Academy while questioning BJP's absence. MNS demands clean voter lists and accuses BJP of diverting attention with religious angles. They emphasize the need for electoral roll purification and question the BJP's defense of the Election Commission.
टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाHinduismहिंदुइझमAshish Shelarआशीष शेलार