शहरं
Join us  
Trending Stories
1
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
2
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
3
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
4
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
5
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
6
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
7
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
8
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
9
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
10
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
11
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
12
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
13
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
14
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा
15
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
16
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
19
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
20
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास

कुठे झालाय हागणदारीमुक्त महाराष्ट्र : रेल्वेमार्गावर शौच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 8:17 PM

पुणे, शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड, घोरपडी, हडपसर परिसरातील रेल्वे  मार्गावर जवळच्या वस्तीतील लोक शौचाला बसतात...

ठळक मुद्देरेल्वेमार्गावर शौच : प्रशासन म्हणतेय, प्रभावी अंमलबजावणी करा

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील वर्षी महाराष्ट्र राज्य हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा केली. पण रेल्वे प्रशासन मात्र रेल्वेमार्गावर शौचास बसणाऱ्यांमुळे हैराण झाले आहे. हागणदारी मुक्तीच्या घोषणेची प्रभावी अंमलबजावणी व उपाययोजना करण्याची खुप आवश्यकता असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. तसेच हे रोखण्यासाठी रेल्वेकडून गुडमार्निंग पथक नेमले असून संबंधितांची धरपकड सुरू केली आहे. उघड्यावर शौचास बसणाऱ्या १२५ जणांवर दंडात्मक कारवाईही केली आहे.रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे, शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड, घोरपडी, हडपसर परिसरातील रेल्वे  मार्गावर जवळच्या वस्तीतील लोक शौचाला बसतात. महापालिकेने सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी तेथील लोक रेल्वेमार्गावर येतात. कदाचित पालिकेने दिलेली सुविधा अपुरी असु शकते. मात्र, या प्रकारामुळे पुणे रेल्वे स्थानकातून जाणाºया गाड्यांमधील प्रवाशांमध्ये पुणे शहराविषयी वेगळी प्रतिमा निर्माण होत आहे. तसेच रेल्वेमागार्ची देखभाल-दुरूस्ती करताना रेल्वे कर्मचाºयांना खुप वाईट स्थिती काम करावे लागते. लोकांचा सततचा वावर असल्याने मार्गावरील खडी अस्ताव्यस्त होते. त्याचा परिणाम रेल्वेमार्गाच्या समतोलावर होत आहे. सिग्नल यंत्रणेतही अडचणी येत आहेत. नट-बोल्ट गंज लागल्याने त्याची दुरूस्ती करण्यात समस्या निर्माण  होत आहेत.या अडचणींमुळे रेल्वे प्रशासनाने थेट राज्य शासनाच्या हागणदारी मुक्तच्या घोषणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. राज्य हागणदारीमुक्त असले तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी व उपाययोजना करण्याची गरज असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. त्याचप्रमाणे पुणे महापालिकेच्या सुविधांबाबतही नाराजी व्यक्त केली आहे. .........रेल्वेचे गुडमॉर्निंग पथकरेल्वेमार्गावर शौचास बसणाºयांना प्रतिबंध करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तीन स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत. रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी काही दिवसांपुर्वी सकाळी ६ वाजता संगम ब्रीज ते शिवाजीनगर स्थानकापर्यंत पायी जात पाहणी केली होती. यादरम्यान जवळच्या वस्त्यांमधील लोकच शौचाला येत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पथके नेमून कारवाई सुरू केली. ही पथके सकाळी ६ ते ९ यावेळेत संगम ब्रीज ते शिवाजीनगर स्थानक, पिंपरी चिंचवड ते आकुर्डी दरम्यान ही पथके गस्त घालत घालून रेल्वेमार्गावर शौचास येणाºयांची धरपकड करत आहेत. याअंतर्गत दि. १७ आॅगस्टपासून १२५ जणांना पकडून त्यांच्याकडून ४२ हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे. ही कारवाई पुढेही सुरू राहणार आहे. यामध्ये प्रत्येकी पाच हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. 

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेGovernmentसरकार