शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

कुठून आणता मासे....? येथून पुढे फक्त ‘उजनी’चे नका आणू : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 16:40 IST

उजनी धरणाचे पाणी विषारी झाले आहे.याबाबतची बातमी वाचुन आपण आश्चर्यचकित झालो...

ठळक मुद्देउजनीच्या प्रदुषित पाण्यातील माशांवर बिनधास्तपणे ताव मारणाऱ्या खवय्यांना अजित पवार यांचा सल्ला

बारामती : उजनी धरणाचे पाणी विषारी झाले आहे.याबाबतची बातमी वाचुन आपण आश्चर्यचकित झालो. या धरणातील मासे खाताना सावधानता बाळगा,नाहीतर व्हायच तिसरेच काहीतरी, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उजनी धरणातील पाणी प्रदुषणाबाबत चिंता व्यक्त केली. बारामती शहरातील मोतीबाग परिसरात काटेवाडी गावातील युवकाने सुरु केलेल्या हॉटेलचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले.यावेळी पवार यांनी मोतीबाग परिसरात मच्छी ढाबा चालविणाऱ्या काटेवाडीच्या युवकाला खास शैलीत सल्ला दिला. पवार म्हणाले, म्हणाले,परवा पेपरला वाचताना उजनी धरणाचे पाणी विषारी झाले आहे असी बातमी वाचण्यात आली.. त्यामुळे तुम्ही मासे कोठुन आणता, उजनी धरणातील मासे आणु नका.त्याऐवजी वीर भाटघर किंवा घोडनदीमधून मासे आणा. त्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. गेल्या अनेक वर्षांपासुन उजनी धरणाच्या प्रदुषणाचा प्रश्न धुमसतो आहे. सोलापूर विद्यापीठानं हे पाणी सतत प्यायल्याने कॅन्सरचा धोका होण्याची शक्यता वर्तवली आहे.याबाबत माध्यमांनी वृत्त देखील प्रसिध्द केले आहेत.जलतज्ञ,संशोधकांनी उजनी धरणातले पाणी विषारी असल्याचे निष्कर्ष मांडले आहेत. विद्यापीठाने वर्तविलेल्या शक्यतेवरुन पुन्हा एकदा उजनी धरणाच्या प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आला  आहे. यावर आज पवार यांनी देखील चिंता व्यक्त केल्याने हा प्रदुषणाचा प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला आहे. पवार यांनी बारामती येथील कार्यक्रमात उजनी धरणातील मासे मच्छी ढाबा चालविणाऱ्या आणून एका व्यावसायिकाला कानपिचक्या दिल्या. पवार यांनी उजनीचं पाणी आणि मासे खाताना सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला. यावेळी बोलताना त्यांनी एका हॉटेल व्यावसायिकाला मासे कुठून आणतो अशीही विचारणा केली. उजनीचे मासे आणू नका, असा सल्ला पवार यांनी दिला. पवार यांनी दिलेल्या सल्यानंतर मासे खाणाऱ्या खवय्यांच्या भुवया उंचावल्या. उजनीच्या प्रदुषित पाण्यातील माशांवर बिनधास्तपणे ताव मारणाऱ्या खवय्यांना पवार यांचा सल्ला चांगलाच रुचल्याचे यावेळी चर्चेतून दिसुन आले.————————

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेAjit Pawarअजित पवारUjine Damउजनी धरण