शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

शिवसेना-मनसे युती अडली कुठे?; याआधी २ वेळा दिला होता प्रस्ताव, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 10:31 IST

जनभावनेचा सन्मान केलाच पाहिजे. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं.

मुंबई – राज्यातील राजकारणात गेल्या ४ वर्षात तिसऱ्यांदा राजकीय भूकंप घडला आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादीचे ८ दिग्गज नेते सरकारमध्ये सहभागी झाले. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे पक्षात फूट पडली तशीच फूट आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडल्याचे चित्र समोर आले आहे. त्यात आता उद्धव ठाकरे आणि मनसे यांच्या समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना भवनासमोर एका कार्यकर्त्याने बॅनर लावून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना आतातरी एकत्र या असं आवाहन केले होते.

त्यात सोमवारी मनसे नेत्यांच्या बैठकीतही काही वरिष्ठांनी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना साथ देऊया असं विनंती केली. मात्र त्यावर राज ठाकरेंनी वेट अँन्ड वॉचची भूमिका घेतली. शिवसेना-मनसे युती नेमकी अडली कुठे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, मी कार्यकर्ता असून राज ठाकरे जे आदेश देतील तसे आम्ही काम करतो. २०१४ आणि २०१७ या दोन्ही वेळेला राज ठाकरेंनी युतीचा प्रस्ताव दिला होता त्यावर उद्धव ठाकरेंकडून सकारात्मक पाऊलं उचलले नाही. टाळाटाळ केली गेली. ऐन वेळी समोरून माघार घेतली. हा जुन्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. ही वस्तूस्थिती आहे. मनसे आणि उबाठा गटाचे शीर्ष नेतृत्व काय विचार करते त्यावर अवलंबून आहे. राज ठाकरे यांनी कालच्या बैठकीत छान विधान केले. राजकीय पक्ष म्हणून सत्ता काबीज करणे हे समजू शकतो पण सत्तापिपासू होणे गैर आहे. युती आणि आघाडी हे गरजेतून घडते असं त्यांनी सांगितले.

तसेच जनभावनेचा सन्मान केलाच पाहिजे. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे. युती होईल का नाही हे दोन्ही बाजूने ठरवले पाहिजे. राजकीय गणित कशी जुळवावी लागतात. भविष्यात काय होईल सांगता येत नाही. ठाकरे बंधु एकत्र येतील का हे काळच ठरवेल. जनता व्यक्त होत असते. पुढे काय होईल हे आगामी काळात कळेल असं सांगत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मनसे-उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर सूचक विधान केले आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसे