शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-मनसे युती अडली कुठे?; याआधी २ वेळा दिला होता प्रस्ताव, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 10:31 IST

जनभावनेचा सन्मान केलाच पाहिजे. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं.

मुंबई – राज्यातील राजकारणात गेल्या ४ वर्षात तिसऱ्यांदा राजकीय भूकंप घडला आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादीचे ८ दिग्गज नेते सरकारमध्ये सहभागी झाले. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे पक्षात फूट पडली तशीच फूट आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडल्याचे चित्र समोर आले आहे. त्यात आता उद्धव ठाकरे आणि मनसे यांच्या समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना भवनासमोर एका कार्यकर्त्याने बॅनर लावून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना आतातरी एकत्र या असं आवाहन केले होते.

त्यात सोमवारी मनसे नेत्यांच्या बैठकीतही काही वरिष्ठांनी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना साथ देऊया असं विनंती केली. मात्र त्यावर राज ठाकरेंनी वेट अँन्ड वॉचची भूमिका घेतली. शिवसेना-मनसे युती नेमकी अडली कुठे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, मी कार्यकर्ता असून राज ठाकरे जे आदेश देतील तसे आम्ही काम करतो. २०१४ आणि २०१७ या दोन्ही वेळेला राज ठाकरेंनी युतीचा प्रस्ताव दिला होता त्यावर उद्धव ठाकरेंकडून सकारात्मक पाऊलं उचलले नाही. टाळाटाळ केली गेली. ऐन वेळी समोरून माघार घेतली. हा जुन्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. ही वस्तूस्थिती आहे. मनसे आणि उबाठा गटाचे शीर्ष नेतृत्व काय विचार करते त्यावर अवलंबून आहे. राज ठाकरे यांनी कालच्या बैठकीत छान विधान केले. राजकीय पक्ष म्हणून सत्ता काबीज करणे हे समजू शकतो पण सत्तापिपासू होणे गैर आहे. युती आणि आघाडी हे गरजेतून घडते असं त्यांनी सांगितले.

तसेच जनभावनेचा सन्मान केलाच पाहिजे. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे. युती होईल का नाही हे दोन्ही बाजूने ठरवले पाहिजे. राजकीय गणित कशी जुळवावी लागतात. भविष्यात काय होईल सांगता येत नाही. ठाकरे बंधु एकत्र येतील का हे काळच ठरवेल. जनता व्यक्त होत असते. पुढे काय होईल हे आगामी काळात कळेल असं सांगत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मनसे-उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर सूचक विधान केले आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसे