शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची नवी खेळी! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
2
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
3
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
4
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
5
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
6
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
7
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
8
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
9
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
10
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
11
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
12
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
14
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
15
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
16
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
17
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
18
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
19
२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
20
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी

फडणवीस, शिंदे, पवार, यांची पुस्तके कधी येणार?

By अतुल कुलकर्णी | Updated: May 18, 2025 09:58 IST

...मात्र त्यासाठी बसावे लागते... वेळ मिळाला की तुम्ही आमच्याकडे किंवा आम्हाला तुमच्याकडे बोलवा... पण बसणे महत्त्वाचे. आपल्याला पुस्तक लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा! 

अतुल कुलकर्णी -

सर्व नेत्यांना नमस्कार. उद्धव ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी त्यांचे परमप्रिय शरद पवार यांच्याकडून आदर्श घेत पुस्तक लिहिले आहे. आता बाकी नेत्यांनी वेळ घेऊ नये. त्यामुळे मराठी वाचकांवर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक लिहिले आहे. तेव्हा इतरांनी लगेच ‘आपापल्या पक्षातील स्वर्ग’ अशी पुस्तके न लिहिता वेगळ्या वाटा निवडाव्या. कोणत्या विषयावरची पुस्तके, कोणी लिहावीत याची आम्ही कार्यशाळा आयोजित करण्याचा गंभीर विचार करत आहोत. त्यासाठी ‘बाबुरावांची लेखन कार्यशाळा’ येथे संपर्क साधू शकता..!

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ‘सह्याद्रीचे वारे’ हे आत्मचरित्र लिहिले. शरद पवार यांच्या पुस्तकाचे नाव ‘लोक माझे सांगाती’ होते. तर त्यांच्या जवळच्याच सांगली जिल्ह्यातले संपतराव पवार यांनी शेतकऱ्यांनी स्वकष्टाने, स्वखर्चाने देशातले पहिले धरण कसे बांधले, त्याला ‘बळीराजा धरण’ नाव कसे दिले त्याची गोष्ट सांगणारे आत्मचरित्र ‘मी लोकांचा सांगाती’ या नावाने लिहिले. ‘लोक माझे सांगाती’ आणि ‘मी लोकांचा सांगाती’ यात कोणते नाव योग्य, हा ज्याच्या त्याच्या विचारसरणीचा भाग आहे.

एकनाथ आव्हाड माजलगाव तालुक्यातले. त्यांनी ‘जग बदल, घालुनी घाव’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले. आव्हाड यांनी त्यांची संघर्ष गाथा यात मांडली होती. सोलापूर जिल्ह्यातल्या नरसय्या आडम मास्तर यांनी ‘संघर्षाची मशाल हाती’ हे आत्मचरित्र लिहिले. त्याशिवाय काकासाहेब गाडगीळ यांनी ‘पथिक’, शोभाताई फडणवीस यांनी ‘प्रत्यंचा’ आत्मचरित्र लिहिले. नाशिक येथे सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या शांताबाई दाणी यांनी आपल्या अफाट कार्यशक्तीच्या जोरावर त्या काळी देशातील क्रमांक चारचा पक्ष असलेल्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे नेतृत्व केले होते. त्यांनी ‘रात्रंदिना आम्हा’ हे आत्मचरित्र लिहिले.

यातल्या अनेकांनी इंग्रज सरकारविरुद्ध, आपल्या परिस्थितीविरुद्ध संघर्ष केला. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सहन करावे लागलेले अनुभव शब्दबद्ध केले. आता काळ बदलला आहे. आता व्यक्तिगत दुःख, वेदना, हाल, झालेला छळ या गोष्टी पुस्तक रूपाने मांडण्याचे दिवस आहेत. ‘डायरी ऑफ होम मिनिस्टर’ हे अनिल देशमुख यांचे पुस्तक आठवून बघा. संजय राऊत यांना ईडीच्या प्रकरणात अटक झाली. शंभर दिवस ते आर्थर रोड तुरुंगात होते. तेथे आलेले अनुभव त्यांनी पुस्तक रूपाने मांडताना कोणी, कोणावर, कसे, कधी व किती उपकार केले, याच्या कहाण्या लिहिल्या आहेत. राऊत यांचे पुस्तक आणि त्यावर चर्चा होणार नाही असे कसे..? पुस्तक किती विकले जाईल माहिती नाही, चर्चा मात्र खूप होईल हे नक्की.विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण बालसाहित्य वाचत नाही, असे सांगितले. ते कोणत्या पुस्तकाबद्दल बोलले माहिती नाही. जर राऊत यांचे पुस्तक बालसाहित्यात मोडत असेल, तर त्यांनी प्रौढांसाठीचे लिहिल्यास त्यात काय काय लिहितील..? हा गंभीर चिंतनाचा विषय आहे. काहीही असो. महाराष्ट्राचे राजकारण आता एकमेकांवर अभिजात भाषेत टीकाटिप्पणी करण्याच्या पलीकडे गेले आहे. आता आपले नेते एकमेकांवर पुस्तक लिहून वार करतील. (अत्यंत महत्त्वाचे : लिहिलेले पुस्तक फेकून वार करणे अपेक्षित नाही.) 

कोणी कोणत्या विषयावर पुस्तक लिहावे यासाठी ‘बाबुरावांची लेखन कार्यशाळा’ने काही विषय काढले आहेत. शरद पवार यांचे ‘लोक माझे सांगाती’ पुस्तक आहे तर  उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘सत्ता माझी सांगाती’ असे पुस्तक लिहिता येईल. शरद पवार यांनी देखील गेल्या १० वर्षांत झालेल्या राजकीय घडामोडींवर ‘नेहरू सेंटर ते उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रिपद’ असे दुसरे पुस्तक लिहायला हरकत नाही. उद्धव ठाकरे यांनी ‘युतीत सडलेली २५ वर्ष आणि खोके बोके’ यावर पुस्तक लिहावे. राज ठाकरे यांनी ‘एकही आमदार, खासदार नसताना शिवतीर्थाची ताकद’ हा विषय पुस्तकासाठी घ्यावा. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘गोवाहाटी फाईल्स’ हा प्रवास लिहिला तर त्यावर हॉलिवुडमधील अनेक दिग्दर्शक सिनेमा काढायला तयार होतील. ते मुख्यमंत्री होण्याच्या आधी जे आमदार गोव्याला गेले होते, त्यांनी ‘गोव्यातली मंतरलेली रात्र’, ‘गोव्यातला टेबलवरचा डान्स’, अशा छोट्या कथा लिहायला हरकत नाही. प्रत्येकाने कादंबरीच लिहिली पाहिजे, असे नाही. संजय शिरसाट यांनी ‘७२ व्या मजल्यावरून मुंबईचे शूटिंग कसे करावे?’ यावर इन्स्टासाठी रीळा बनवणाऱ्यांना मार्गदर्शन कथा लिहावी. देवेंद्र फडणवीस यांना ‘पहाटेचे शपथविधी अयशस्वी का ठरतात?’ यावर चिंतनात्मक पुस्तक लिहिता येईल. भविष्यात मुख्यमंत्री होऊ इच्छिणाऱ्यांना आणि राज्यपालपदी विराजमान होणाऱ्यांना त्यातून मार्गदर्शन मिळेल. रामदास आठवले यांनी ‘माझ्या शीघ्र कवितांचे गमक’ हा विषय घ्यायला हरकत नाही. नीलमताई गोऱ्हे यांनी ‘मर्सिडीजचे रहस्य’ लिहिले तर त्यावर मालिका होईल. यामुळे मराठी साहित्यात नवचैतन्य निर्माण होईल. अभिजात भाषेचा मिळालेला दर्जा सार्थकी लागेल. यापुढचे सगळे ज्ञानपीठ आणि साहित्य पुरस्कार महाराष्ट्रालाच मिळतील... केवढी मोठी क्रांती होईल... नुसत्या कल्पनेनेच आमच्या अंगात प्रचंड काहीतरी होत आहे.

तसे आम्ही सगळ्यांनाच विषय पुरवू शकतो. मात्र त्यासाठी बसावे लागते... वेळ मिळाला की तुम्ही आमच्याकडे किंवा आम्हाला तुमच्याकडे बोलवा... पण बसणे महत्त्वाचे. आपल्याला पुस्तक लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा! - तुमचाच बाबूराव

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे