शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

२५ टक्के रिक्त जागा केव्हा भरणार ?

By admin | Updated: February 26, 2015 02:57 IST

परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी सुरू केलेल्या ‘दलालमुक्त परिवहन कार्यालये’ अभियानाला आरटीओ कर्मचा-यांनी पाठिंबा दिला आहे

मुंबई : परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी सुरू केलेल्या ‘दलालमुक्त परिवहन कार्यालये’ अभियानाला आरटीओ कर्मचा-यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र कर्मचा-यांकडून कामाची अपेक्षा करताना त्यांची सुरक्षा आणि सुमारे २५ टक्के रिक्त पदे भरण्याबाबतची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेने बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.५१ परिवहन कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचा आयुक्तांच्या अभियानाला पाठिंबा असून सर्वसामान्य नागरिकांना सुविधा पुरवण्यास कर्मचारी समर्थ असल्याचा दावा संघटनेचे सरचिटणीस बाबाजी हांडे यांनी केला आहे. हांडे यांनी सांगितले की, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबतही शासनाने भूमिका स्पष्ट करायला हवी. काहीच दिवसांपूर्वी ताडदेव आरटीओसह राज्यातील काही आरटीओंमध्ये कर्मचाऱ्यांना मारहाणीची प्रकरणे घडली होती. त्या वेळी संघटनेने राज्यभर काम बंद आंदोलन पुकारले होते. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना आखल्या आहेत, याबाबत शासनाला विचारणा करणार आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेंद्र सरतापे म्हणाले, की लायसन्स वितरण, वाहनांची नोंदणी आरटीओमध्ये चालते. रिक्त पदे भरल्यास अतिरिक्त कामासाठी कोणत्याही दलालाची गरज नाही. सध्या लिपिकवर्गीय पदांची २ हजार १०१ पदे मंजूर केलेली आहेत. मात्र त्यातील ५४० म्हणजेच सुमारे २५ टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. शिवाय २००७ सालापासून वाहन प्रणालीअंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र स्मार्ट कार्डच्या रूपात देण्याचे कंत्राट खाजगी कंपनीला दिले होते. मात्र ३१ डिसेंबर २०१४ रोजी कंत्राट संपल्याने राज्यात काम करणाऱ्या ७०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचा ताण शासकीय कर्मचाऱ्यांवर पडला आहे. चतुर्थ श्रेणी कामगारांबाबतही तीच अवस्था आहे. सध्या ४२७ मंजूर पदांपैकी १७२ पदे रिक्त आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे १९८४ साली मंजूर केलेल्या या पदांमध्ये एकाही पदाची वाढ अद्याप करण्यात आलेली नाही.