शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मोदींचं वादळ महाराष्ट्रात येईल, तेव्हा उद्धव ठाकरे उडून जातील - चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 10:45 IST

"उद्धव ठाकरे मुद्दाम अशा गोष्टी करत असतील तर...", भाजपाचा इशारा

Uddhav Thackeray v BJP: उद्धव ठाकरे हे कायम संभ्रमावस्थेत बोलत असतात. पंतप्रधान मोदी यांचा त्यांनी सभेत एकेरी उल्लेख केला. १५०च्या पेक्षा जास्त देशांनी ७८ टक्के पसंती मोदीजींच्या नेतृत्वाला दिली. अशा पंतप्रधान मोदींचा ठाकरे एकेरी उल्लेख करतात. त्यांनी थोडासा अभ्यास केला पाहिजे. पंतप्रधान मोदींचे वादळ जेव्हा महाराष्ट्रात येईल तेव्हा उद्धव ठाकरे उडून जातील, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. पाचोऱ्यातील सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपा, शिंदे गट आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेच तोफ डागली होती. या टीकेला आज बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिले.

"पंतप्रधान मोदींच्या वादळाला उद्धव ठाकरे घाबरतात. म्हणूनच ते त्यांचं नाव घेऊन टाइमपास करतात. मोदींचे नेतृत्व संपूर्ण जगाला मान्य आहे. तुमच्याजवळ साधे दोन लोक राहायला तयार नाहीत. तुम्ही २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांच्या बळावर निवडून आलात. भारताला सर्वोत्तम देश करण्याचा संकल्प त्यांनी केलाय आणि तुम्ही त्यांची खिल्ली उडवत आहात. याला बेईमानी म्हणतात. तुमची उंची काय? तुमच्या शिल्लक राहिलेली लोकंही मोदीजींच्या कृपेनेच निवडून आलेत. २०२४ला मोदीजींच्या वादळात तुमच्या मशाली विझतील," असा घणाघात त्यांनी केला.

"कुठे सूर्य आणि कुठे तुम्ही? मी मागे देखील बोललो होतो की उद्धव ठाकरेंनी सार्वजनिक ठिकाणी बोलत असताना तारतम्य पाळलं पाहिजे. वैयक्तिक टीका करून कुणाचाही अपमान करू नये असं मी मागेही म्हणालो होतो. ते मात्र वारंवार आमच्या नेतृत्वाचा अपमान करत आहेत. ते जर अशा गोष्टी मुद्दाम वारंवार करत असतील तर त्याचा स्फोट होऊ शकतो. मोदींचा एकेरी उल्लेख करणे या गोष्टीचा स्फोट होऊ शकतो. आमच्या पक्षाच्या नेतृत्वांवर बोलताना तारतम्य बाळगा असं मी सांगितले आहे. ते जाणीवपूर्वक त्याच त्याच गोष्टी करत आहेत. अशा वेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष भडकू शकतो," असा इशारा त्यांनी दिला.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा