शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

जालन्यातील सीड्स पार्कला मुहूर्त कधी?, तेलंगणा, आंध्रकडून मात्र रेड कार्पेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 05:24 IST

Seeds Park : जालन्यातील बियाणे उद्योगाची मुहूर्तमेढ प्रसिद्ध उद्योजक बद्रीनारायण बारवाले यांनी साधारपणे १९६७ मध्ये महिको कंपनीच्या माध्यमातून रोवली.

- संजय देशमुख 

जालना : बियाणांची राजधानी म्हणून ओळख असलेल्या जालना शहरात छोट्या कंपन्यांसह शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून चार वर्षांपूर्वी सीड्स पार्क उभारणीची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. परंतु नंतर यावर केवळ बैठकांचे सत्र सुरू असून, यावर अद्यापही अंतिम निर्णय न झाल्याने राज्यातील अनेक उद्योजक हे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील सीड्स पार्ककडे वळत आहेत. तेथे त्यांना रेडकार्पेट अंथरले जात आहे. जालन्यातील बियाणे उद्योगाची मुहूर्तमेढ प्रसिद्ध उद्योजक बद्रीनारायण बारवाले यांनी साधारपणे १९६७ मध्ये महिको कंपनीच्या माध्यमातून रोवली. काळाची पावले ओळखून बद्रीनारायण बारवाले यांनी पिकांच्या संशोधनात वेगवेगळे बदल करून जैव तंत्रज्ञानाची कास धरली. त्यांच्या कंपनीने अमेरिकेतील तत्कालीन मॉन्सेटो कंपनीसोबत करार करून साधारणपणे २००० मध्ये बीटी तंत्रज्ञान आणले होते. या तंत्रज्ञानाने भारताला कापूस उत्पादनात जगातील पहिल्या पाच देशांच्या रांगेत आणून ठेवले. जैव तंत्रज्ञानामुळे बोंड अळीचे उच्चाटन झाल्याचा दावा केला जात आहे. एकूणच एवढा वारसा असतानाही जालन्यातील सीड्स पार्कचे काम हे केवळ बैठका घेण्यावर अडून बसले आहे. मध्यंतरी नोडल एजन्सी म्हणून महाबीज तसेच एमआयडीसीला नेमले होते. तत्पूर्वी एका खासगी सल्लागार एजन्सीकडून त्याचा प्राथमिक आराखडा तयार केला होता. त्यानुसार सीड्स पार्क उभारणीसाठी जालना तालुक्यातील पानशेंद्रा येथे शंभर एकरपेक्षा अधिकची जमीनही संपादित केली. परंतु तेथेही अद्याप काहीच हालचाली नाहीत. 

पार्कचा उद्देश काय?महिकोप्रमाणेच शेजारच्या विदर्भातील अनेक शेतकरी हे बिजोत्पादन करतात. त्यांना अद्ययावत प्रयोगशाळा  उपलब्ध व्हावी या हेतूने येथे प्रयोगशाळा उभारण्यात येणार असून मोठे कोल्ड स्टोअरेज बांधण्याचे नियोजन आहे. माती परीक्षण प्रयोगशाळा उभारणी करणे यासह शेती आणि संबंंधित शेतकऱ्यांना तज्ज्ञ कृषी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून मेळावे घेणे ही कामे करण्यात येणार होती. 

बीटी पार्कची अशीच गत २००३ मध्ये त्यावेळी आणि आता आमदार असलेले कैलास गोरंट्याल यांनी जालन्यातील एमआयडीसीत बीटी पार्क अर्थात जैव तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीसाठी जवळपास ६० एकर जागा राखून ठेवली होती. त्यासाठी महिकोसोबत सामंजस्य करार करण्यात आला. अनेक बी-बियाणे कंपन्या, उद्योजकांनी तेथे जागाही संपादित केल्या. परंतु तेथे ना प्रयोगशाळा उभी राहिली ना बीटी पार्कशी संबंधित कंपन्या आल्या. आज या बीटी पार्कवर मोठी हॉटेल्स, शोरूम उभे राहिल्याचे वास्तव आहे. यासाठी एमआयडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून जागेचा ‘पर्पज’ बदलून घेतल्यानेच बीटी पार्क बारगळल्याचे सांगण्यात आले.

उद्योजकांचा तेलंगणाकडे ओढा बीटी पार्क, सीड्स पार्क लांबणीवर पडले असतानाच तिकडे आंध्र प्रदेश तसेच तेलंगणामध्ये सीड्स पार्क विकसित झाले आहेत. तेथे येणाऱ्या उद्योजकांना पाच वर्षांच्या वीजबिलात सवलत, कुठलाही कर नाही, यासह अन्य सुविधांमुळे जालन्यासह राज्यातील उद्योजक गुंतणवूक व संशोधनाशी संबंधित प्रयोगशाळा तेथे उभारत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Jalanaजालनाagricultureशेती