शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

...शेतकऱ्यांना जेव्हा येतो मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा फोन.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 20:31 IST

निवडणुकीपुर्वी सातबारा कोरा करण्याची भाषा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी प्रत्यक्षात घुमजाव केल्याची शेतकरी वर्गाची तक्रार आहे.

ठळक मुद्देशुक्रवारी सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांना संपर्क कर्जखात्याला आधार लिंक करण्याचे आवाहन

इंदापूर ( शेटफळगढे ) : काही दिवसांपुर्वी ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे.मात्र, कर्जमाफी मिळविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेबाबत शेतकरी अनभिज्ञ आहे. मात्र, आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मोबाईलवर संपर्क  साधुन कर्जमाफी योजनेच्या दिलेल्या माहितीची सर्वत्र चर्चा रंगली. अर्थात मुख्यमंत्र्यांनी साधलेला हा संवाद त्यांचा व्हॉईस मेसेज होता.

निवडणुकीपुर्वी सातबारा कोरा करण्याची भाषा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी प्रत्यक्षात घुमजाव केल्याची शेतकरी वर्गाची तक्रार आहे. यामध्ये दोन लाखांपेक्षा अधिक कर्जाचा बोजा असणारे शेतकरी,नियमित कर्जफेड करणारे शेतकरी नाराज आहेत. निवडणुकीच्या काळातच बड्या नेत्यांचे अशा प्रकारे व्हॉईस मेसेज द्वारे कॉल येतात. मात्र, निवडणुक नसताना खुद्द मुख्यमंत्री ठाकरे यांनी साधलेला संवाद शेतकऱ्यांच्या  चचेर्चा विषय ठरला. ग्रामीणभागात अनेकांनी त्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांचा फोन आल्याचे एकमेंकांना सांगितले.व्हॉईस मेसेजचा प्रकार माहित नसणारे शेतकरी ठाकरे यांच्या व्हॉईस मेसेज कॉलने हरखुन गेल्याचे चित्र होते.     शुक्रवारी(दि ३) सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांना द्वारे संपर्क साधला. यावेळी ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कसे आहात, अशी चौकशी करुन योजनेची माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्ज शासन भरणार आहे. तसेच चिंतामुक्त करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  त्याचबरोबर येणाऱ्या काळातही शेतकऱ्यांनी चिंतामुक्त करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी वेगळे काहीकरण्याची गरज नाही. केवळ कर्जखात्याला आधार लिंक करण्याचे आवाहन  व्हॉईस कॉलमध्ये ठाकरे यांनी केले . मुख्यमंत्री स्वत: व्हॉइस कॉल द्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे व्हाईस कॉल शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.  प्रथमच शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती थेट मुख्यमंत्री या कॉल द्वारे सांगत असल्याचा शेतकऱ्यांचा पहिलाच अनुभव आहे.———————————

टॅग्स :IndapurइंदापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmerशेतकरीGovernmentसरकार