शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

...शेतकऱ्यांना जेव्हा येतो मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा फोन.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 20:31 IST

निवडणुकीपुर्वी सातबारा कोरा करण्याची भाषा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी प्रत्यक्षात घुमजाव केल्याची शेतकरी वर्गाची तक्रार आहे.

ठळक मुद्देशुक्रवारी सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांना संपर्क कर्जखात्याला आधार लिंक करण्याचे आवाहन

इंदापूर ( शेटफळगढे ) : काही दिवसांपुर्वी ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे.मात्र, कर्जमाफी मिळविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेबाबत शेतकरी अनभिज्ञ आहे. मात्र, आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मोबाईलवर संपर्क  साधुन कर्जमाफी योजनेच्या दिलेल्या माहितीची सर्वत्र चर्चा रंगली. अर्थात मुख्यमंत्र्यांनी साधलेला हा संवाद त्यांचा व्हॉईस मेसेज होता.

निवडणुकीपुर्वी सातबारा कोरा करण्याची भाषा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी प्रत्यक्षात घुमजाव केल्याची शेतकरी वर्गाची तक्रार आहे. यामध्ये दोन लाखांपेक्षा अधिक कर्जाचा बोजा असणारे शेतकरी,नियमित कर्जफेड करणारे शेतकरी नाराज आहेत. निवडणुकीच्या काळातच बड्या नेत्यांचे अशा प्रकारे व्हॉईस मेसेज द्वारे कॉल येतात. मात्र, निवडणुक नसताना खुद्द मुख्यमंत्री ठाकरे यांनी साधलेला संवाद शेतकऱ्यांच्या  चचेर्चा विषय ठरला. ग्रामीणभागात अनेकांनी त्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांचा फोन आल्याचे एकमेंकांना सांगितले.व्हॉईस मेसेजचा प्रकार माहित नसणारे शेतकरी ठाकरे यांच्या व्हॉईस मेसेज कॉलने हरखुन गेल्याचे चित्र होते.     शुक्रवारी(दि ३) सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांना द्वारे संपर्क साधला. यावेळी ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कसे आहात, अशी चौकशी करुन योजनेची माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्ज शासन भरणार आहे. तसेच चिंतामुक्त करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  त्याचबरोबर येणाऱ्या काळातही शेतकऱ्यांनी चिंतामुक्त करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी वेगळे काहीकरण्याची गरज नाही. केवळ कर्जखात्याला आधार लिंक करण्याचे आवाहन  व्हॉईस कॉलमध्ये ठाकरे यांनी केले . मुख्यमंत्री स्वत: व्हॉइस कॉल द्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे व्हाईस कॉल शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.  प्रथमच शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती थेट मुख्यमंत्री या कॉल द्वारे सांगत असल्याचा शेतकऱ्यांचा पहिलाच अनुभव आहे.———————————

टॅग्स :IndapurइंदापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmerशेतकरीGovernmentसरकार