शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

एकनाथ शिंदे आमदारांसह सूरतला गेले हे खासदार श्रीकांत शिंदेंना कधी कळलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 09:27 IST

संघर्षातून एकनाथ शिंदे पुढे आलेत. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मला आले नाहीत अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला. 

ठाणे -  Shrikant Shinde Interview ( Marathi News ) मी ठाण्याला घरी होतो, मतदारसंघात फिरत होतो. सर्व शिवसैनिक, पदाधिकारी यांना विश्वास देण्याचं काम करत होतो. मूळात एकनाथ शिंदे जाणार हे मला माहिती नव्हते. १९ जूनला आमदारांसोबत साहेब गेले तेव्हा मलाही माहिती नव्हते असं सांगत खासदार श्रीकांत शिंदेंनी घटनाक्रम सांगितला. 

ठाण्यातील युवासेनेच्या कार्यक्रमात गायक अवधूत गुप्ते यांनी श्रीकांत शिंदे यांची मुलाखत घेतली. त्यात ते म्हणाले की, मी न्यूजमध्ये पाहिले तेव्हा घटनाक्रम कळाले. मला खासदार हेमंत गोडसेंचा फोन आला. एकनाथ शिंदे सूरतला गेलेत. मी म्हटलं कुठे चेष्टा करताय, मी कामात आहे. पण ते बोलले न्यूज बघा, मी न्यूज चॅनेल सुरू केला. तेव्हा हे कळाले. एकनाथ शिंदे प्लॅनिंग करून गेले नव्हते. त्यांच्यासोबत ज्या गोष्टी घडत होत्या. त्यामुळे त्यांनी तसा निर्णय घेतला आणि जो निर्णय घेतला त्याला शेवटापर्यंत घेऊन जाण्याचे काम केले असं त्यांनी म्हटलं. 

तसेच मी रोज भेटायचो, पण आम्हाला याबाबत काहीच माहिती नव्हते. एकनाथ शिंदे यांनी रिस्क घेतली होती. त्यांच्यावर विश्वास ठेऊन आमदार, मंत्री त्यांच्यासोबत गेले. हे जर घडले नाही तर पुढे काय होईल हे माहिती नव्हते. मुलगा म्हणून मला टेन्शन आलं होते. वडिलांची काळजी होती. कुटुंबातील लोक, सहकारी सगळ्यांना उद्या काय होणार हे कळत नव्हते. गेले अनेक वर्ष रिस्क घेऊन ते शिवसेना वाढवत होते. तशीच बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी शिंदेंनी रिस्क घेतली आणि आज आपण पाहतोय, मुख्यमंत्रिपदाला १०० टक्के न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत असं श्रीकांत शिंदेंनी सांगितले. 

दरम्यान, गेल्यावेळी एकाला मंत्री करण्यासाठी किती तडजोडी केल्या गेल्या. आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. राजा का बेटा राजा नही बनेगा. जो काबील होगा वही राजा बनेगा असं मी म्हणतो. सर्वोच्च पद हे कुणासाठी राखीव नसते. जो मेहनत करेल, पक्षाला वेळ देईल, लोकांचा विश्वास जिंकेल अशा युवकांना त्यापदावर पोहचवण्याचं काम आम्हाला करायचे आहे. पूर्वी सर्वोच्च पद २ जणांसाठी राखीव होती. आता ती परिस्थिती नाही.आज पक्षात कुठलेही पद राखीव नाही. पक्षात लाभाचे पद मी कधी घेणार नाही. आमच्यावर विश्वास ठेऊन जे आलेत त्यांना ती संधी आहे. वेगवेगळ्या युवकांना संधी मिळाली तर पक्ष घराघरात पोहचू शकतो असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर टीका केली. 

अपघाताने राजकारणात आलो

मी राजकारणात अपघाताने आलोय, मला राजकारणात रस नव्हता. पक्षाला गरज होती तेव्हा मी आलो. २०१४ मध्ये मला कल्याण लोकसभेतून उमेदवारी दिली. आज मी डॉक्टर आहे, राजकारणाच्या माध्यमातून मी फाऊंडेशनचं काम करतो. हजारो रुग्णांची सेवा करण्याचं काम केले जाते. कल्याणमध्ये आपला उमेदवार दुसऱ्या पक्षात गेला होता. त्यावेळी पक्षाने मला तिथे उभे केले. तिथे अडीच लाखाच्या फरकाने निवडून आलो. त्यानंतर कल्याण मतदारसंघात मी काम करत राहिलो. २०१९ ला ३ लाखांच्या फरकाने निवडून आलो असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलं. 

आदित्य ठाकरेंवर पलटवार

आव्हान कोणाचं स्वीकारायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पण आव्हान कोण करतंय हे पाहावे लागेल. प्रत्येकाचं आव्हान स्वीकारत बसले तर उत्तर देण्यात वेळ जाईल. एकनाथ शिंदे पुढे काम करत जातायेत, मागे कोण काय बोलतंय याकडे लक्ष देत नाही. जे टीका करतायेत, त्यांची योग्यता काय, बोलतोय काय हे कळत नाही. संघर्षातून एकनाथ शिंदे पुढे आलेत. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मला आले नाहीत अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला. 

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरे