शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेच्या मालवाहतूक करणाऱ्या गाडीचे चाक घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 11:25 IST

कोकण रेल्वे मार्गावर वैभववाडी ते नांदगाव दरम्यान कोकण रेल्वेचा माल वाहतूक करणाऱ्या बीआरएन या गाडीचे एक चाक रूळावरून घसरल्याने मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देकोकण रेल्वेच्या मालवाहतूक करणाऱ्या गाडीचे चाक घसरलेवैभववाडी-नांदगावनजिक घटना : वाहतूक ३ तासांनी पूर्ववत

महेश सरनाईक सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे मार्गावर वैभववाडी ते नांदगाव दरम्यान कोकण रेल्वेचा माल वाहतूक करणाऱ्या बीआरएन या गाडीचे एक चाक रूळावरून घसरल्याने मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सकाळी ७.१0 मिनिटांनी पुन्हा चाक बदलून ती गाडी मार्गस्थ केल्यानंतर सकाळी ७.३0 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीहून मडगावकडे जाणारी पॅसेंजर गाडी पहिल्यांदा मार्गस्थ झाली. त्यानंतर सर्व वाहतूक पुर्ववत झाली.कोकण रेल्वे मार्गावर वैभववाडी आणि नांदगावच्या दरम्यान, शनिवारी सकाळी माल वाहतूक करणाऱ्या बीआरएन रेल्वेचे एक चाक रूळावरून घसरले. त्यामुळे संपूर्ण कोकण रेल्वे मार्ग बंद झाला. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाºया अनेक गाड्या वेगवेगळ्या ठिकाणच्या स्थानकांमध्ये थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.पहाटे ४.४५ च्या दरम्यान ही घटना घडली. घटना घडल्यानंतर कोकण रेल्वेच्या संबंधित यंत्रणेने आवश्यक ती काळजी घेत रूळावरून घसरलेले चाक अथक प्रयत्न करून सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास काम पूर्ण करून पुन्हा चाक बसविले आणि ती गाडी मार्गस्थ केली.यानंतर सकाळी ४.४५ पासून बंद असलेली कोकण रेल्वे ७.३५ वाजता पूर्वव्रत झाली. यावेळी रत्नागिरीकडून मडगावकडे जाणारी पॅसेंजर गाडी पहिल्यांदा या मार्गावरून धावली. त्यानंतर या मार्गावर तीन तास विविध स्थानकांमध्ये थांबवून ठेवण्यात आलेल्या गाड्या हळू-हळू मार्गस्थ करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.उत्तर आणि दक्षिण भारत जोडणारा महत्वाचा दूवाकोकण रेल्वे मार्गावर दक्षिणेकडील गोवा, कर्नाटक, केरळ, कन्याकुमारी, तामिळनाडू या राज्यातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी व मालवाहतूक होते. दरदिवशी लाखो प्रवाशी प्रवास करतात. तसेच उत्तर भारतात गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब ते दिल्ली पासून अगदी जम्मू-काश्मिरपर्यंत दक्षिण भारताला जोडणारा कोकण रेल्वे हा महत्वाचा दुवा आहे.

त्यामुळे कोकणातून मुंबईकडे धावणाऱ्या काही मोजक्या गाड्या वगळता उत्तर आणि दक्षिण भाग जोडणारा हा मार्ग भारतीय रेल्वेमध्ये महत्वाचा मार्ग समजला जातो. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर दुर्घटना घडली की भारताचे दोन भाग जोडणारी यंत्रणाच विस्कळीत होते. यावर्षी पावसाळ्यात तशी एकही दुर्घटना झाली नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाचे कौतुक होत आहे.पावसाळ्यातील पहिलाच खोळंबाकोकण रेल्वे मार्ग हा दऱ्या, खोऱ्यातून आणि मोठ-मोठ्या भोगद्यांमधून काढलेला आहे. या मार्गावर लहान-मोठे पूल आणि भोगदे यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोकणात पावसाळ्यात पडणाऱ्या संततधार पावसाने दरड कोसळून कोकण रेल्वे ठप्प होण्याच्या घटना यापूर्वी वारंवार होत होत्या. मात्र, यावर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही या मार्गावर कोठेही दरड किवा माती कोसळण्याची एकही घटना घडली नाही.

कारण धोकादायक ठिकाणांबाबतची आवश्यक काळजी यावेळी कोकण रेल्वेने घेतल्यामुळे आतापर्यंत झालेल्या पावसाळ्यात एकदाही कोकण रेल्वे ठप्प झाली नव्हती. माल वाहतूक करणाऱ्या बीआरएन या गाडीचे चाक रूळावरून घसरल्याने पहिल्यांदाच वाहतुकीत खोळंबा झाला.गणेशोत्सव तोंडावर, रेल्वेमार्ग सुरळीत ठेवण्याची गरजकोकणातील सर्वात मोठा आणि घरोघरी साजरा होणारा गणेशोत्सव अगदी तोंडावर आला आहे. कोकण रेल्वेने लाखो चाकरमानी गणेशोत्सवासाठी घरोघरी येणार आहे. पश्चिम रेल्वेने यासाठी मोठ्या प्रमाणावर जादा गाड्यांची सोयदेखील केली आहे. त्यामुळे आगामी महिनाभर कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांची वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे पूर्ण सप्टेंबर महिना रेल्वेमार्ग सुरळीत ठेवण्याची मोठी जबाबदारी यानिमित्ताने प्रशासनावर आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेsindhudurgसिंधुदुर्गRatnagiriरत्नागिरी