शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 12:33 IST

Uddhav Thackeray Hindi GR Cancelled: राज्य सरकारने त्रिभाषा सूत्र सक्तीचा करण्याचा निर्णय रद्द केला. या निर्णयानंतर आज उद्धव ठाकरेंनी त्यांची सविस्तर भूमिका मांडली. 

Hindi GR Cancelled Uddhav Thackeray: त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारने घेतलेले दोन्ही निर्णय रद्द केले. प्रचंड विरोध झाल्यानंतर सरकारने शासन निर्णय रद्द करत नवीन समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. पण, भविष्यातही अशा पद्धतीची हिंदी सक्ती होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

विधानभवनाच्या आवारात माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जय महाराष्ट्रचा नारा पुन्हा बुलंद झाला. हा नारा बुलंद करण्यात शिवसेना, शिवसैनिक तर आघाडीवर होतेच, पण शिवसेनेसोबत ज्या-ज्या राजकीय पक्षांनी, ज्या ज्या मराठी भाषिकांनी आपापले पक्षभेद विसरून सहभाग घेतला, त्या सगळ्यांना धन्यवाद देतो." 

मातृभाषेचं प्रेम हे पक्षाच्या पलिकडे

"सरकारला शहाणपण सुचले आहे की नाही, हे येत्या काही दिवसात कळेल; पण तूर्त त्यांनी हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द केला. त्यांनी जर रद्द केला नसता, तर ५ तारखेच्या मोर्च्यात भाजप, एसंशिं गटातले, अजित पवार गटातील अनेक मराठी प्रेमी हे सहभागी होणार होते, आणि होणार आहेत. त्यांना सुद्धा मी खास धन्यवाद देतो. मातृभाषेचं प्रेम हे पक्षाच्या पलीकडे असले पाहिजे", असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.  

वाचा >>मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं

"सरकार एक केविलवाणा प्रयत्न केलाय, तरीसुद्धा त्याला आम्ही धन्यवाद देतोय. आता नवीन एक समिती नेमली आहे. त्या समितीमध्ये नरेंद्र जाधव यांच्या पांडित्याचा किंवा बुद्धिमत्तेचा पूर्ण आदर राखून मी सरकारला सांगतोय की, तुम्ही अशी थट्टा करू नका. कारण हा शिक्षणाचा विषय आहे. शिक्षणाच्या विषयात तुम्ही अर्थतज्ज्ञांची समिती नेमली आहे", असा चिमटा उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला काढला. 

कोणाचीही समिती बसवली तरी हिंदी सक्ती नाही

उद्धव ठाकरे म्हणाले, "समिती कोणतीही असू दे. त्यांनी काही अहवाल देऊ दे. पण, सक्ती विषय आता संपलेला आहे. त्यामुळे कोणाचीही समिती त्यांनी बसवली तरी महाराष्ट्रावर हिंदी सक्ती होऊ शकत नाही, हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिलं आहे. मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतोय. ५ तारखेला विजय मेळावा किंवा विजय मोर्चा हा एक-दोन दिवसात, काय आणि कुठे हे जाहीर होईल."

"मला सगळ्यांना सांगायचं आहे की, आपण विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठीद्रोही हे डोकं वर काढतात. काल यांचं डोकं चेपलेलं आहे. फणा वर येऊ नये असे वाटत असेल, तर ही एकजूट आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजूटचीच दर्शन आम्ही ५ तारखेला घडवू", असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेhindiहिंदीMahayutiमहायुतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारRaj Thackerayराज ठाकरे