शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

तुम्ही काय हजामती करत होतात का?; जयंत पाटील नागपूर दंगलीवरून गृह विभागावर बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 18:34 IST

Jayant Patil Nagpur Riots: नागपूरमधील दंगल पूर्वनियोजित कट करून घडवण्यात आली अशी माहिती सरकारने विधानसभेत दिली. यावर बोट ठेवत आज जयंत पाटील यांनी गृह मंत्रालयावर हल्ला चढवला.

Jayant Patil Nagpur News:नागपूरमध्ये झालेल्या दंगलीच्या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी गृह मंत्रालयाला सुनावले. दंगल पूर्वनियोजित कट करून घडवण्यात आल्याच्या मुद्द्यावरून जयंत पाटील सरकार बरसले. पूर्व नियोजित कट होता, तर तुम्ही काय हजामती करत होतात का?, संतप्त सवाल पाटलांनी विधानसभेत केला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात झालेल्या दंगलींची आकडेवारी जयंत पाटलांनी सभागृहात सांगितली. २०२४ मध्ये देशात सर्वाधिक दंगली महाराष्ट्रात घडल्या आहेत, असे सांगत त्यांनी चिंता व्यक्त केली. 

हेही वाचा >> नागपूर दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खानवर 'योगी स्टाईल' कारवाई

जयंत पाटील म्हणाले, या दंगली का होतात? कशा होतात?

"२०२४ मध्ये देशात ५९ जातीय दंगली झाल्या. त्यातील १२ दंगली महाराष्ट्रात घडल्या आहेत. २०२२ पासून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात जातीय दंगलींमध्ये वाढ झाली. २०२४ मध्ये महाराष्ट्रात १२, गुजरात ५, मध्य प्रदेशात ५ आणि राजस्थानात तीन दंगली झाल्या. या दंगली का होतात? कशा होतात? या महाराष्ट्राचा आकडा एवढा वर जातोय. यातून किती अस्वस्थता आपण खाली तयार केली आहे, काम सरकारने करावं", असा सल्ला त्यांनी महायुती सरकारला दिला. 

कुठेतरी बसले असतील ना? पाटलांचा सवाल

नागपूरमध्ये घडलेल्या दंगलीबद्दल जयंत पाटील म्हणाले, "अमरावती परिसरात दंगल झाली. परवा नागपूरला दंगल झाली. आता नागपूरच्या दंगलीत असं सांगण्यात आलं की, हा पूर्वनियोजित कट होता. अरे पूर्वनियोजित कट होता, तर तुम्ही काय हजामती करत होतात का? पूर्व नियोजित कट म्हणजे नियोजन आहे. म्हणजे कुठेतरी बसून केला असेल. कुठेतरी बसले असतील ना?", असा सवाल करत तपास यंत्रणांच्या अपयशावर त्यांनी बोट ठेवलं.  

जयंत पाटील पुढे म्हणाले, "पोलीस खाते काय करत होते? पूर्व नियोजित कट जर आधी पकडता आला, तर ते पोलीस खाते. म्हणजे आपणच कबूल करतोय. अचानक झालेली दंगल आपण समजू शकतो. पूर्वनियोजित कट झाला आणि दंगल झाली. नागपूरसारख्या शहरामध्ये दंगल होणं म्हणजे... सगळ्यात शांत प्रवृत्तीची लोक त्या नागपूरमध्ये राहतात. तिथे दंगल घडवून आणली म्हणजे दंगल घडवून दाखवणाऱ्याचं कौतुक आहे", असा उपरोधिक टोला त्यांनी गृह मंत्रालय आणि सरकारला लगावला. 

सरकारला चालतंय असा मेसेज जातोय -जयंत पाटील

"सगळ्यात टॉप स्कील वापरलं. एका अर्थाने त्यांचा सत्कारच करायला पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने लोकांच्या भावनाशी खेळ केला म्हणून सरकारने अशा गोष्टींकडे ठामपणे बघितले पाहिजे. सरकारला चालतंय असा अप्रत्यक्ष मेसेज जात आहे. कारण सरकारमध्ये बसलेले लोक देखील वेगवेगळ्या भूमिका घेतात. लोकांना असं वाटायला लागतं की, आपल्याला याचं लायसन्स आहे. त्यामुळे किमान सरकारमध्ये बसणाऱ्यांनी त्याचं उदात्तीकरण करणे, त्याला प्रोत्साहन देणं ही भूमिका घेऊ नये, अशी माझी विनंती आहे", असे म्हणत त्यांनी वादग्रस्त विधाने करणाऱ्या मंत्र्यांनाही अप्रत्यक्षपणे सुनावले.   

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलnagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीNagpur Policeनागपूर पोलीसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस