शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मविआचं पहिल्या बैठकीत जागावाटपाबद्दल काय ठरलं? राऊतांनी दिली महत्त्वाची अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 11:14 IST

Maharashtra Vidhan Sabha elections 2024: महाविकास आघाडीने विधानसभेच्या जागावाटपाची चर्चा सुरू केली आहे. यासंदर्भात पहिली बैठक २४ ऑगस्ट रोजी झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल संजय राऊतांनी माहिती दिली.

Maha Vikas Aghadi Vidhan Sabha Elections 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीने जागावाटपावर लक्ष्य केंद्रित केल्याचे दिसत असून, पहिली बैठक मुंबईत पार पडली. मविआच्या पहिल्या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा झाली आणि राज्यातील जागावाटपाबद्दल काय ठरले, याबद्दल संजय राऊतांनी महत्त्वाची माहिती दिली.  

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. विधानसभा जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीचे काय ठरले, याबद्दलही संजय राऊतांनी यावेळी भाष्य केले. 

मविआची कोणत्या जागांबद्दल झाली चर्चा?

खासदार राऊत म्हणाले, "महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही बाबतीत मतभेद नाहीत. आमची काल (२४ ऑगस्ट) जागावाटपासंदर्भात पहिली बैठक झाली. या बैठकीत मुंबईतील जागांबद्दल तिन्ही पक्षांनी चर्चा केली. सहमतीने जवळपास ९९ टक्के जागांवर आमचे एकमत झाले आहे."

"महाविकास आघाडीमध्ये ना मुख्यमंत्रि‍पदावरून मतभेद आहेत, ना इतर कोणत्या पदावरून. जागावाटपासंदर्भातही आमच्यात मतभेद नाहीत. सगळे काही व्यवस्थित होईल. महाविकास आघाडी सरकार बनवत आहे", असा दावा संजय राऊतांनी केला. 

आमच्या सहकाऱ्यांबद्दल मी बोलणार नाही -राऊत

"आमचे सहकारी काय सांगताहेत, त्याबद्दल मी आता काहीच बोलणार नाही. कालच्या बैठकीला तिन्ही पक्षांचे प्रमुख उपस्थित होते. सुरळीत चर्चा झाली. मुंबई हा मोठा प्रदेश आहे. महाराष्ट्राची राजधानी आहे. इथे कायम शिवसेनेचे आणि मराठी माणसाचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक जागावाटप होईल", असे संजय राऊत यांनी सांगितले. 

"मुंबई तोडण्याचे कारस्थान दिल्लीतून सुरू आहे. त्याला शह देण्यासाठी मुंबई आमच्या सगळ्यांच्या ताब्यात असणे गरजेचे आहे. त्यापद्धतीनेच हे जागावाटप आम्ही सगळे करतो आहोत. मविआ म्हणून ही लढाई होईल", असे खासदार राऊत म्हणाले.

राज्यातील जागावाटपावर चर्चा कधी? 

याच मुद्द्यावर पुढे बोलताना राऊत यांनी सांगितले की, "संपूर्ण महाराष्ट्रात समतोल पद्धतीने जागावाटप होईल. ते बंद दाराआड होईल. त्यासंदर्भात कोणी बाहेर येऊन काही सांगणार नाही. मीही सांगणार नाही. मुंबईचा विषय संपत आलेला आहे. २७ ऑगस्टपासून उर्वरित महाराष्ट्राची चर्चा सुरू होईल", अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sanjay Rautसंजय राऊतMumbaiमुंबई