शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

बदलापुरातील उद्रेकावेळी सरकारनं काय-काय पावलं उचलली? खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगिलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 12:45 IST

बदलापुरमधील उद्रेकावेळी, सरकारकडून काय-काय पावले उचलण्यात आली? यासंदर्भात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.

बदलापूरमधील आदर्श विद्यालय शाळेत शिशू वर्गातील दोन विद्यार्थिंनीवरील कर्मचाऱ्याच्या कथित अत्याचाराच्या घटनेवरून मंगळवारी नागरिकांनी जोरदार आंदोलन केले. शाळेच्या प्रवेशद्वारापासून सुरू झालेले हे आंदोलन थेट बदलापूर रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचले. साधारणपणे 8-9 तास चाललेल्या या आंदोलनामुळे सायंकाळी जवळपास 6 वाजेपर्यंत रेल्वे वाहतूक ठप्प होती. बदलापुरमधील या उद्रेकावेळी, सरकारकडून काय-काय पावले उचलण्यात आली? यासंदर्भात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.  

मुख्यमंत्री शिंदे आज सातारा दौऱ्यावर आहेत. येवेळी माध्यमांसोबत बोलताना ते म्हणाले, "सरकारची भूमिका मी कालच स्पष्ट केली आहे. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे. एक बच्चू आहे. त्याच्या संदर्भात जे काही प्रकरण घडले आहे. ते दुर्दैनी आहे. त्यामुळे जे कुणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी. असे निर्देश मी कालच सीपींना दिले आहेत. त्याप्रमाणे त्यावर कामही सुरू आहे. त्याला (आरोपीला) अटकही झाली आहे. त्याच्यावर अटेम्प टू रेप, पोक्सो असे कठोरात कठोर कलमं लावण्याचे निर्देश आम्ही दिले आहेत. ही केस फास्ट्रॅकवर घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यासाठी एक स्पेशल पीपी आम्ही लावत आहोत. एसआयटी नेमण्यात आली आहे."

'त्या कुटुंबामागे सरकार पूर्णपणे उभे' -"लोकांनी म्हटले आहे की, पोलिसांनी दिरंगाई केली, तर पोलिसांवरही कारवाई करण्यात आली. तेथील स्थानिक वरिष्ठ पोलीस नीरिक्षक आणि इतर अधिकारी यांनाही निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे त्या कुटुंबामागे सरकार पूर्णपणे उभे आहे. सरकार त्या कुटुंबाला पूर्णपणे सहकार्य करेल. मी संस्थाचालकांवरही कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मुलींना हँडलिंग करण्यासाठी तेथे मुलीच असायला हव्यात, महिलाच असायला हव्यात. हे नियम जे कुणी संस्थाचालक पाळत नसतील त्यांच्यावरही कारवाई करण्याच्या सूचना मी शिक्षणमंत्री केसरकर यांना दिल्या आहेत. त्यांनीही त्या ठिकाणी जाऊन भेट दिली आहे. गिरिष महाजन यांनीही त्या ठिकाणी व्हिजिट केली," अशी माहितीही शिंदे यांनी दिली.

..आणि पुन्हा अशा प्रकारचे कृत्त करायला कुणी धजावणार नाही -"अशा प्रकारची दुर्घटना भविष्यात होऊ नये यासाठी, जे काही नियम आहेत, ते आणखी कडक करता येतील. ज्या ठिकाणी मुली शिक्षण घेत आहेत, तेथे जादाची काळजी घेण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत म्हणून, याला फास्ट्रॅक घेऊन, याच्यावर कठोर कारवाई, कठोर शिक्षा झाली की, एक संदेस जाईल आणि पुन्हा अशा प्रकारचे कृत्त करायला कुणी धजावणार नाही," असेही शिंदे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेbadlapurबदलापूरSchoolशाळाagitationआंदोलन