शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रोहित पवार बोलले ते बरोबरच; मनसे आमदार राजू पाटलांनी सांगितलं भाजपाचं 'राजकारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 13:22 IST

कल्याण लोकसभा पूर्वीपासून भाजपाची होती. भाजपाचं इथं काय चालत नव्हते तेव्हा आनंद दिघेंनी हा मतदारसंघ खेचून घेतला. परंतु आता भाजपा वरचढ होताना दिसतेय असं मनसेने म्हटलं.

कल्याण – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली आहे. त्यात कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचे डोळे लागले आहे. याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे खासदार आहेत. परंतु मतदारसंघात भाजपानेही आढावा बैठक घेतल्या आहेत. त्यावरून राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी भाजपावर टीका केली. त्याला मनसेनेही दुजोरात भाजपाचे राजकारण सांगितले.

आमदार रोहित पवार म्हणाले की, श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात तुमची युती असेल तर तुम्ही तिथे बैठका घेण्याचे, चाचपणी करण्याचे काय? भाजपाला केवळ त्यांचा पक्ष, चिन्ह समजते बाकी कुठलेही नेते आणि लोकांचे प्रश्न कळत नाही. अनुराग ठाकूर यांना या मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. कारण इथं मुख्यमंत्र्यांचा मुलगा खासदार आहे. त्यामुळे मोठ्या नेत्यांनाच इथली जबाबदारी दिली आहे इतकेच नाही तर मंत्री रविंद्र चव्हाण यांना कदाचित भाजपाकडून इथली लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते असं दबक्या आवाजात बोलले जाते असंही त्यांनी म्हटलं.

तर कल्याण लोकसभा पूर्वीपासून भाजपाची होती. भाजपाचं इथं काय चालत नव्हते तेव्हा आनंद दिघेंनी हा मतदारसंघ खेचून घेतला. परंतु आता भाजपा वरचढ होताना दिसतेय. त्यामुळे ही संधी भाजपा सोडेल असं वाटत नाही. भाजपाची एक पद्धत राहिली आहे. रोहित पवार बोलले ते बरोबर बोललेत. भाजपा नेहमी समोरच्या पक्षाला छोटा करायला बघतो, दाबायला बघतो. त्यांचे म्हणणे रास्त आहे असं समर्थन मनसे आमदार राजू पाटील यांनी रोहित पवारांच्या विधानाला केले. दरम्यान, कल्याण लोकसभेतील वाटाघाटी बघता भाजपा उमेदवाराच्या दिशेने ही वाटचाल होताना दिसतेय असंही पाटील म्हणाले.

रविंद्र चव्हाण-श्रीकांत शिंदे यांच्यात वाद

काही महिन्यांपूर्वी श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या एका विधानामुळे भाजपा-शिवसेना यांच्यातील वाद उफाळून आल्याचे चित्र होते. नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत, लोकसभेला एकत्रित काम करायला हवे. पण, डोंबिवलीतील काही व्यक्ती युतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम करीत आहेत, मी कल्याणची खासदारकी सोडायला तयार आहे. पण मग त्या जागी तुम्ही तुमचा चांगला उमेदवार सुचवा. मी युतीचे काम करण्यास तयार आहे, अशी आक्रमक भूमिका घेत कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाजपा नेत्यांना टोला लगावला होता. त्यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थीने हा वाद शमविण्यात यश आले होते.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलRohit Pawarरोहित पवारShrikant Shindeश्रीकांत शिंदेBJPभाजपा