शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राचे वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 06:45 IST

विदर्भाला आठ, तर मराठवाड्याला मिळाली सात मंत्रिपदे

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील दहा मंत्री असणार आहेत. विदर्भाच्या वाट्याला सात कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद तर मुंबईतील सहा जणांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या वाट्याला प्रत्येकी ७ मंत्रीपदं आली आहेत. तर कोकणाला चार मंत्रीपदं मिळाली आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्राला विशेष प्राधान्य दिल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील आणि दत्तात्रय भरणे अशा सहा जणांना संधी दिली आहे, तर शिवसेनेकडून शंभुराज देसाई आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांना संधी मिळाली आहे. शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांचे नाव मंत्रीपदासाठी चर्चेत होते. मात्र त्यांना संधी मिळू शकली नाही. हे दोघेही तसे नवखे आहेत. काँग्रेसने विश्वजीत कदम आणि सतेज उर्फ बंटी पाटील या दोन युवा नेत्यांचा समावेश केला आहे.मराठवाड्याच्या वाट्याला सात मंत्रीपदं मिळाली आहेत. पैकी अशोक चव्हाण, अमित देशमुख या दोघांचा समावेश मंत्रमंडळात केला आहे. तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे, राजेश टोपे आणि संजय बनसोडे यांना संधी देण्यात आली आहे. पैकी संजय बनसोडे हे पहिल्यांदाच निवडून आले असून त्यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. ते उदगीर या राखीव मतदारसंघातून निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. तर शिवसेनेचे पैठणचे ज्येष्ठ आमदार संदीपान भुमरे यांना संधी मिळाली आहे.काँग्रेसने विदर्भाला विशेष न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि सुनील केदार असे चार कॅबिनेट मंत्री दिले आहेत. तर शिवसेनेने संजय राठोड यांना राज्यमंत्रीपदावरून बढती देत कॅबिनेट मंत्री केले असून प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांना मंत्रीपद देऊन एका लढाऊ नेतृत्वाला संधी दिली आहे.विदर्भाला झुकते मापफडणवीस यांच्या मंत्रीमंडळात सहा कॅबिनेट आणि चार राज्यमंत्री असे एकूण दहा मंत्री विदर्भातील होते. शिवाय, स्वत: फडणवीस विदर्भातील होते. ठाकरे मंत्रीमंडळात विदर्भातील सात कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री असतील. शिवाय, विधानसभेचे अध्यक्षपद विदर्भातील नेते नाना पटोले यांच्याकडे आहे.मुंबईला मिळाले सहा मंत्रीमहाविकास आघाडी सरकारमध्ये मुंबईला सहा मंत्री मिळाले असून शिवसेनेने सुभाष देसाई, अनिल परब आणि आदित्य ठाकरे असे तीन कॅबिनेट मंत्री दिले आहेत. काँग्रेसने वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांना संधी दिली असून राष्टÑवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन सामाजिक संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. कोकणातून एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड (ठाणे), आदिती तटकरे (रायगड) व उदय सामंत (रत्नागिरी) अशा चौघांना संधी मिळाली आहे.पुण्याला मिळाले तीन मंत्रीपुणे जिल्ह्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दिलीप वळसे-पाटील व दत्तात्रय भरणे अशा तिघांना राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून मंत्रीपद मिळाले आहे.विभाग                  शिवसेना        राष्ट्रवादी             काँग्रेस                     आमदार  मंत्री   आमदार  मंत्री    आमदार मंत्रीकोकण              १५        २           ५         २            ०       ०मराठवाडा         १२        २           ८         ३            ८       २मुंबई                  १४       ४           १          १            ४       २उ. महाराष्ट्र         ६         ३          १३        २            ७       २विदर्भ                 ४         २           ६        २           १५       ४प. महाराष्ट्र         ५         २          २१        ६           १०       २एकूण               ५६       १५         ५४      १६          ४४      १२

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस