मुंबई : मुंबईसह राज्यभरातील हवामान पालटण्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून, हवामानात होणाऱ्या बदलानुसार, शुक्रवारी रत्नागिरीला रेड, शनिवारी रायगडसह रत्नागिरीला तर रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी विदर्भासह कोकण व मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून, हवामानातील बदलामुळे विजांच्या कडकडाटासह वादळ, वादळी वारे ताशी ६० किमी वेगाने वाहतील. कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, असे हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. तर हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या मते आठवडाभर जोरदार पावसाची शक्यता आहे. गेल्या १५ दिवसांपासून थंडावलेला मान्सून सक्रिय होईल. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडमध्येही १९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
मुसळधार पावसाची शक्यता; रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 05:15 IST