शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

बाळासाहेबांच्या 'त्या' भूमिकेनं आम्हाला धक्काच बसला; शरद पवारांनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 11:54 IST

या सगळ्यांना सन्मानानं वागणूक देऊन एकत्र येण्याचा विचाराला त्यांनी हातभार लावला, दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसशी त्यांचा संघर्ष होता. पण तो संघर्ष कायमचा होता, असं मला वाटत नाही.

मुंबईः बाळासाहेबांची विचारधारा आणि कामाची पद्धत भाजपाच्या विचारांशी सुसंगत होती, असं मला कधीच वाटलं नाही. बाळासाहेबांची भूमिका आणि भाजपाच्या लोकांच्या कामाच्या पद्धतीत जमीन आस्मानचा फरक आहे, असं राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणाले आहेत.(Sharad Pawar Sanjay Raut Interview) संजय राऊतांनी सामनासाठी घेतलेल्या खास मुलाखत ते बोलत होते. बाळासाहेबांनी सन्मान केला तो काही व्यक्तींचा केला. त्यांनी अटल बिहारी वाजपेयींचा केला. त्यांनी अडवाणींचा केला. त्यांनी प्रमोद महाजन यांचा केला. या सगळ्यांना सन्मानानं वागणूक देऊन एकत्र येण्याचा विचाराला त्यांनी हातभार लावला, दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसशी त्यांचा संघर्ष होता. पण तो संघर्ष कायमचा होता, असं मला वाटत नाही.सेना ही काँग्रेसच्या कायमच विरोधात होती, असं वाटत नाही. कदाचित बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या देशातील एकमेव संघटना अशी असेल, की एखाद्या राष्ट्रीय प्रश्नावरून सत्ताधारी पक्षातील प्रमुख लोकांना स्वतःच्या पक्षाच्या भविष्याची काही स्थिती यत्किंचीत तमा न बाळगता पाठिंबा द्यायचा. ते शिवसेनेच्या नेत्यांनीच केलं. ज्या वेळेला इंदिरा गांधींच्या विरोधात अख्खा देश होता, त्यावेळी शिस्त आणणारं नेतृत्व म्हणून त्याच्याबरोबर बाळासाहेब उभे राहिले. नुसतेच उभे राहिले नाही, तर आम्हाला लोकांना त्यावेळी धक्काच बसला. तेव्हा बाळासाहेबांनी भूमिका घेतली की महाराष्ट्राच्या निवडणुकीला उमेदवारसुद्धा उभा करणार नाही, असंही पवारांनी सांगितलं आहे. (Sharad Pawar Sanjay Raut Interview)

गेली पाच वर्षं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायच्या आधी सेना आणि भाजपाचं सरकार होतं. पण सेनेच्या विचाराचा मतदार आणि सेनेचा कार्यकर्ता यांच्यात सरकारबद्दल अस्वस्थता होती. सेनेची काम करण्याची पद्धत ठोसपणानं गोष्ट राबवायची होती. भाजपाने त्यांना गप्प बसवण्याचा, बाजूला ठेवण्याची भूमिका सातत्यानं घेतली. महाराष्ट्रातल्या जनतेने जी पाच वर्षं पाहिली, ती भाजपाचं सरकार असल्याचीच होती. याच्याआधी असं नव्हतं. मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली युती सरकार होतं. नेतृत्व शिवसेनेकडे होते. बाळासाहेबांची भक्कम भूमिका होती. मागच्या पाच वर्षांत सेनेला जवळपास बाजूला केलं आणि भाजपा म्हणजे हेच खरे राज्यकर्ते आणि पुढच्या काळात भाजपाच्या विचारानेच चालणार ही भूमिका घेऊन पावलं टाकली. ही महाराष्ट्रातल्या जनतेला पटत नव्हती. दुसरं कुणी राजकारण करू शकत नाही, असं वाटत होतं, असं म्हणत पवारांनी भाजपावरही टीकास्त्र सोडलं आहे. 

मी येणार, मी येणार आणि मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला. कुठल्याही राज्यकर्त्याने मीच येणार ही भूमिका घेऊन जनतेला गृहित धरायचं नसतं. मीच येणार ही भूमिका घेऊन मतदाराला गृहित धरलं तर तो सहन करत नाही. त्यात थोडासा दर्प आहे आणि धडा शिकवला पाहिजे, असं जनतेनं ठरवलं.  कुठल्याही लोकशाहीतला नेता अमरपट्टा घेऊन आलोय, असा विचार करूच शकत नाही. इंदिरा गांधींनाही पराभव पाहावा लागला, अटलबिहारी वाजपेयींनाही पराभव पाहावा लागला. राजकारणातल्या लोकांपेक्षा मतदार शहाणा आहे. चाकोरीच्या बाहेर पाऊल टाकतोय असं दिसलं तर तो धडा शिकवतो, असंही पवार म्हणाले आहेत. 

हेही वाचा

भाजपाने सत्ता कशामुळे गमावली?; शरद पवारांनी 'मी पुन्हा येईन'ची गोष्ट सांगितली

'हा' आहे बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमधला महत्त्वाचा फरक; शरद पवारांचं निरीक्षण

"...म्हणून लॉकडाऊनच्या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण आली": शरद पवार

लॉकडाऊनवरून उद्धव ठाकरेंशी मतभेद?; शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत

कोरोनाबरोबर जगायची तयारी असावी; तो दैनंदिन जीवनाचाच एक भाग- शरद पवार

CoronaVirus: मुंबईतल्या धारावी मॉडेलची जगभरातून प्रशंसा; जागतिक आरोग्य संघटनेनंही केलं कौतुक

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊत