शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

१०० दिवसांत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले

By admin | Updated: February 10, 2015 00:07 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील युती सरकारने १०० दिवसांत लोकोपयोगी निर्णय घेतले. या निर्णयांची अंमलबजावणी येत्या काळात प्रभावीपणे केली जाईल, शिवाय भविष्यातही

युती सरकार क्रियाशील : भाजप नेत्यांचा दावानागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील युती सरकारने १०० दिवसांत लोकोपयोगी निर्णय घेतले. या निर्णयांची अंमलबजावणी येत्या काळात प्रभावीपणे केली जाईल, शिवाय भविष्यातही अशाच वेगाने सरकार निर्णय घेईल, असा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. युती सरकारने १०० दिवसात घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी भाजपतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेची धुरा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व भाजपचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांनी सांभाळली असली तरी महापौर, जि.प. अध्यक्ष यांच्यासह जवळपास सर्वच आमदार, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस दररोज १६ तास काम करतात. सर्व मंत्रीही पूर्णवेळ काम करीत आहेत. कुठल्याही सरकारचे मूल्यमापन करण्यासाठी १०० दिवसांचा कालावधी हा अत्यल्प आहे. मात्र, या कमी काळातही युती सरकारने लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत. सध्या ४० हजार गावांपैकी २४ हजार गावांमध्ये दुष्काळ आहे. सरकारने राज्यातील ९० लाख शेतकऱ्यांना लाभ पोहचविण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजले आहेत. डावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचा सन्मान मुख्यमंत्र्यांना मिळाला. यातून उद्योग व कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल. नगर विकास खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे सर्व विकास आराखड्यांना तातडीने मंजुरी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. महानगरांच्या विकासासाठी विकास समिती स्थापन केली जात असल्याचे बावनकुळे म्हणाले. यावेळी महापौर प्रवीण दटके, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, आ. विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, समीर मेघे, रमेश मानकर, प्रकाश टेकाडे, प्रमोद पेंडके आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)विदर्भात ३० लाख सदस्य नोंदणीचे लक्ष्यभाजप देशात १० कोटी सदस्य करणार आहे. यापैकी महाराष्ट्रात एक कोटी सदस्यांचे लक्ष्य निश्चित केले आहे. रविवारपर्यंत ५२ लाख ७० हजार ३२१ सदस्यांची आॅनलाईन नोंदणी झाली आहे. विदर्भात ३० लाख सदस्य नोंदणी होणार असून, ९.५० लाख सदस्यांची नोंदणी झाली आहे. ३१ मार्च २०१५ पर्यंत अभियान चालणार असून, १० व ११ फेब्रुवारी रोजी प्रत्येक बूथ स्तरावर हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे गिरीश व्यास यांनी सांगितले.