शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

...तर सरकारला खाली खेचण्याची ताकद ओबीसीत आहे; प्रकाश शेंडगेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 7:40 PM

संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलाय, परतु मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा अशी मागणी त्यांनी केली नाही असं शेंडगे म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर - जालना इथं ओबीसींची ऐतिहासिक सभा पार पडली. यामुळे आता यापुढे सामाजिक न्यायासाठी गरीब समाजाला नाही म्हणण्याची हिंमत कुणाची होत नाही. ही सभा झाकी है, अभी और भी बाकी है. हिंगोलीतील सभा अंबडपेक्षाही मोठा होईल. याठिकाणी ओबीसींचे सगळे नेते येतील. कुठल्याही परिस्थितीत ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर सरकारला खाली खेचण्याची ताकद आमच्यात आहे असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. 

प्रकाश शेंडगे म्हणाले की, या सरकारने ओबीसी समाजाचा निधीही रखडून ठेवला आहे. आम्ही महाराष्ट्राचे नागरीक आहे की नाही? राज्यातला ओबीसी एकसंघपणे पुढे आलाय. मराठा आरक्षण हे ५० टक्क्यांच्या वर वेगळे आरक्षण करून द्या. आता मराठा समाजाची जी आंदोलने सुरू आहेत ती ओबीसी समाजावर अन्याय करणारी आहेत. मराठा समाजाने ५० टक्क्यांच्यावर ६५ टक्के आरक्षण मर्यादा करावी यासाठी आंदोलन करावे. आम्हीदेखील तुमच्यासोबत राहू. ओबीसीत शिरकाव करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्व राजकीय नेत्यांनी ओबीसीला धक्का लागणार नाही असं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टात जे आरक्षण गेलंय ते टिकवण्याचं सरकार प्रयत्न करतंय. परंतु मराठा समाज त्यांची मागणी सोडायला तयार नाही. त्यामुळे मराठा आणि ओबीसी असे जे वातावरण तयार झालंय ते आम्ही केलेले नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच आमचे एल्गार मेळावे, मोर्चे सुरू आहे. प्रत्येक तालुक्यात आमचे मेळावे होतील. ओबीसी समाजाचा पहिला मेळावा रत्नागिरीत झाला होता. त्याचठिकाणी आता दुसरा मेळावा मोठ्या संख्येने होईल. कोकणातील कुणबी समाज मोठ्या ताकदीने या मागणीला विरोध केल्याशिवाय शांत बसणार नाही. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलाय, परतु मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा अशी मागणी त्यांनी केली नाही. त्यामुळे सामाजिक न्याय, ते गादीचे वारसदार आहेत, त्यामुळे विचारांचा वारसा अद्याप त्यांनी सोडला नाही. मराठा नेते भुजबळांवर टीका करत होते तेव्हा संभाजीराजेंनी बोलणं आवश्यक होते. ओबीसी नेत्याने काही भूमिका मांडली असेल तर त्यावर संभाजीराजेंनी वाईट वाटू घेऊ नये असं आवाहन प्रकाश शेंडगे यांनी केले. 

दरम्यान, बीडच्या दंगलीत कुणी कुणाची घरे जाळली, दगडफेक केली हे राज्याने पाहिले आहे. भुजबळांनी असं कुठलेही भडकाऊ विधान केले नाही. याउलट जे हिंसक आंदोलन होतंय ते मराठा समाजाकडून झाले आहे. मराठा आंदोलनाच्या माध्यमातून दहशत निर्माण केली जातेय. ओबीसींचा एल्गार मेळावा हा सर्व पक्षातील नेत्यांचा होता, कुणी एक नेता उपस्थित नसला म्हणून चळवळ थांबणार नाही असंही शेंडगे यांनी स्पष्ट सांगितले. 

टॅग्स :Prakash Shendgeप्रकाश शेंडगेOBCअन्य मागासवर्गीय जातीMaratha Reservationमराठा आरक्षणChhagan Bhujbalछगन भुजबळ