शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही धर्मनिरपेक्ष विचारधारेशी तडजोड केली नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 22:22 IST

जे विरोधक आम्हाला धर्मनिरपेक्षतेबद्दल सांगतात. १९९५ मध्ये युतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले तेव्हा त्यांची धर्मनिरपेक्षता कुठे गेली होती असा सवाल सुनील तटकरेंनी विचारला.

नागपूर -  अजितदादा पवार व राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खा. प्रफुल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एनडीएमध्ये सहभागी होयचा निर्णय घेतला पण महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा, धर्मनिरपेक्ष विचारांशी तडजोड केली नाही अशी भूमिका अजित पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केली.

सुनील तटकरे म्हणाले की, सत्तेसाठी व केंद्रीय यंत्रणेच्या बचावासाठी सत्तेत सहभागी झाल्याचा आभास विरोधकांकडून निर्माण केला जातो. काँग्रेसशी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली. त्यावेळी स्वतंत्र निडणुका लढवल्या. त्यानंतर विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष सहभागी झाला. आपल्या देशात आघाडी सरकार स्थापन करण्याची अपरिहार्यता आहे. भिन्न विचारसरणींचे पक्ष सरकार गठित करण्यासाठी एकत्रित येतात असं त्यांनी सांगितले.

तसेच आम्ही जी भूमिका घेतली ती काही वेगळी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जो आपण निर्णय घेतला तो कोणत्याही यंत्रणेच्या भीतीपोटी घेतलेला नसून लोकशाहीच्या सिद्धांतावर विश्वास ठेवून तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व राज्याच्या विकासासाठी हा निर्णय घेतलेला आहे ही भूमिका आपण जनसामान्यांपर्यंत पोहचवायला हवी असं आवाहन सुनील तटकरेंनी केले.

दरम्यान, परिवर्तनशील महाराष्ट्र आहे. घड्याळाचे चिन्ह जुने तेच आहे पण आता वेळ नवी आली आहे. निर्धार नवपर्वाचा करत अजितपर्वाचा विचार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांना घेऊन जायचा आहे. जे विरोधक आम्हाला धर्मनिरपेक्षतेबद्दल सांगतात. १९९५ मध्ये युतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले तेव्हा त्यांची धर्मनिरपेक्षता कुठे गेली होती. युती सरकार जाते कळताच ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आले. त्यामुळे त्यांनी पक्ष निष्ठा, पक्षाची विचारधारा याबद्दल सांगू नये, असा थेट इशारा तटकरेंनी विरोधकांना दिला. त्याचसोबत विदर्भात आपल्या पक्षाची ताकद कमी आहे. आत्मकेंद्रित राजकारणामुळे नागपूरात संघटना वाढू शकली नाही. एवढे मोठे कॅबिनेट मंत्रीपद दिल्यानंतरही नागपुरात स्वतःची जागा सोडून इतर जागा निवडून आणू शकत नाही त्यांनी स्वतःची तुलना अजितदादांसोबत करू नये अशी टीका सुनील तटकरेंनी अनिल देशमुखांवर केली.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस