शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही धर्मनिरपेक्ष विचारधारेशी तडजोड केली नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 22:22 IST

जे विरोधक आम्हाला धर्मनिरपेक्षतेबद्दल सांगतात. १९९५ मध्ये युतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले तेव्हा त्यांची धर्मनिरपेक्षता कुठे गेली होती असा सवाल सुनील तटकरेंनी विचारला.

नागपूर -  अजितदादा पवार व राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खा. प्रफुल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एनडीएमध्ये सहभागी होयचा निर्णय घेतला पण महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा, धर्मनिरपेक्ष विचारांशी तडजोड केली नाही अशी भूमिका अजित पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केली.

सुनील तटकरे म्हणाले की, सत्तेसाठी व केंद्रीय यंत्रणेच्या बचावासाठी सत्तेत सहभागी झाल्याचा आभास विरोधकांकडून निर्माण केला जातो. काँग्रेसशी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली. त्यावेळी स्वतंत्र निडणुका लढवल्या. त्यानंतर विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष सहभागी झाला. आपल्या देशात आघाडी सरकार स्थापन करण्याची अपरिहार्यता आहे. भिन्न विचारसरणींचे पक्ष सरकार गठित करण्यासाठी एकत्रित येतात असं त्यांनी सांगितले.

तसेच आम्ही जी भूमिका घेतली ती काही वेगळी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जो आपण निर्णय घेतला तो कोणत्याही यंत्रणेच्या भीतीपोटी घेतलेला नसून लोकशाहीच्या सिद्धांतावर विश्वास ठेवून तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व राज्याच्या विकासासाठी हा निर्णय घेतलेला आहे ही भूमिका आपण जनसामान्यांपर्यंत पोहचवायला हवी असं आवाहन सुनील तटकरेंनी केले.

दरम्यान, परिवर्तनशील महाराष्ट्र आहे. घड्याळाचे चिन्ह जुने तेच आहे पण आता वेळ नवी आली आहे. निर्धार नवपर्वाचा करत अजितपर्वाचा विचार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांना घेऊन जायचा आहे. जे विरोधक आम्हाला धर्मनिरपेक्षतेबद्दल सांगतात. १९९५ मध्ये युतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले तेव्हा त्यांची धर्मनिरपेक्षता कुठे गेली होती. युती सरकार जाते कळताच ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आले. त्यामुळे त्यांनी पक्ष निष्ठा, पक्षाची विचारधारा याबद्दल सांगू नये, असा थेट इशारा तटकरेंनी विरोधकांना दिला. त्याचसोबत विदर्भात आपल्या पक्षाची ताकद कमी आहे. आत्मकेंद्रित राजकारणामुळे नागपूरात संघटना वाढू शकली नाही. एवढे मोठे कॅबिनेट मंत्रीपद दिल्यानंतरही नागपुरात स्वतःची जागा सोडून इतर जागा निवडून आणू शकत नाही त्यांनी स्वतःची तुलना अजितदादांसोबत करू नये अशी टीका सुनील तटकरेंनी अनिल देशमुखांवर केली.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस