शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आम्ही धर्मनिरपेक्ष विचारधारेशी तडजोड केली नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 22:22 IST

जे विरोधक आम्हाला धर्मनिरपेक्षतेबद्दल सांगतात. १९९५ मध्ये युतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले तेव्हा त्यांची धर्मनिरपेक्षता कुठे गेली होती असा सवाल सुनील तटकरेंनी विचारला.

नागपूर -  अजितदादा पवार व राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खा. प्रफुल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एनडीएमध्ये सहभागी होयचा निर्णय घेतला पण महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा, धर्मनिरपेक्ष विचारांशी तडजोड केली नाही अशी भूमिका अजित पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केली.

सुनील तटकरे म्हणाले की, सत्तेसाठी व केंद्रीय यंत्रणेच्या बचावासाठी सत्तेत सहभागी झाल्याचा आभास विरोधकांकडून निर्माण केला जातो. काँग्रेसशी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली. त्यावेळी स्वतंत्र निडणुका लढवल्या. त्यानंतर विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष सहभागी झाला. आपल्या देशात आघाडी सरकार स्थापन करण्याची अपरिहार्यता आहे. भिन्न विचारसरणींचे पक्ष सरकार गठित करण्यासाठी एकत्रित येतात असं त्यांनी सांगितले.

तसेच आम्ही जी भूमिका घेतली ती काही वेगळी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जो आपण निर्णय घेतला तो कोणत्याही यंत्रणेच्या भीतीपोटी घेतलेला नसून लोकशाहीच्या सिद्धांतावर विश्वास ठेवून तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व राज्याच्या विकासासाठी हा निर्णय घेतलेला आहे ही भूमिका आपण जनसामान्यांपर्यंत पोहचवायला हवी असं आवाहन सुनील तटकरेंनी केले.

दरम्यान, परिवर्तनशील महाराष्ट्र आहे. घड्याळाचे चिन्ह जुने तेच आहे पण आता वेळ नवी आली आहे. निर्धार नवपर्वाचा करत अजितपर्वाचा विचार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांना घेऊन जायचा आहे. जे विरोधक आम्हाला धर्मनिरपेक्षतेबद्दल सांगतात. १९९५ मध्ये युतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले तेव्हा त्यांची धर्मनिरपेक्षता कुठे गेली होती. युती सरकार जाते कळताच ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आले. त्यामुळे त्यांनी पक्ष निष्ठा, पक्षाची विचारधारा याबद्दल सांगू नये, असा थेट इशारा तटकरेंनी विरोधकांना दिला. त्याचसोबत विदर्भात आपल्या पक्षाची ताकद कमी आहे. आत्मकेंद्रित राजकारणामुळे नागपूरात संघटना वाढू शकली नाही. एवढे मोठे कॅबिनेट मंत्रीपद दिल्यानंतरही नागपुरात स्वतःची जागा सोडून इतर जागा निवडून आणू शकत नाही त्यांनी स्वतःची तुलना अजितदादांसोबत करू नये अशी टीका सुनील तटकरेंनी अनिल देशमुखांवर केली.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस