शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

आम्ही धर्मनिरपेक्ष विचारधारेशी तडजोड केली नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 22:22 IST

जे विरोधक आम्हाला धर्मनिरपेक्षतेबद्दल सांगतात. १९९५ मध्ये युतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले तेव्हा त्यांची धर्मनिरपेक्षता कुठे गेली होती असा सवाल सुनील तटकरेंनी विचारला.

नागपूर -  अजितदादा पवार व राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खा. प्रफुल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एनडीएमध्ये सहभागी होयचा निर्णय घेतला पण महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा, धर्मनिरपेक्ष विचारांशी तडजोड केली नाही अशी भूमिका अजित पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केली.

सुनील तटकरे म्हणाले की, सत्तेसाठी व केंद्रीय यंत्रणेच्या बचावासाठी सत्तेत सहभागी झाल्याचा आभास विरोधकांकडून निर्माण केला जातो. काँग्रेसशी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली. त्यावेळी स्वतंत्र निडणुका लढवल्या. त्यानंतर विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष सहभागी झाला. आपल्या देशात आघाडी सरकार स्थापन करण्याची अपरिहार्यता आहे. भिन्न विचारसरणींचे पक्ष सरकार गठित करण्यासाठी एकत्रित येतात असं त्यांनी सांगितले.

तसेच आम्ही जी भूमिका घेतली ती काही वेगळी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जो आपण निर्णय घेतला तो कोणत्याही यंत्रणेच्या भीतीपोटी घेतलेला नसून लोकशाहीच्या सिद्धांतावर विश्वास ठेवून तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व राज्याच्या विकासासाठी हा निर्णय घेतलेला आहे ही भूमिका आपण जनसामान्यांपर्यंत पोहचवायला हवी असं आवाहन सुनील तटकरेंनी केले.

दरम्यान, परिवर्तनशील महाराष्ट्र आहे. घड्याळाचे चिन्ह जुने तेच आहे पण आता वेळ नवी आली आहे. निर्धार नवपर्वाचा करत अजितपर्वाचा विचार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांना घेऊन जायचा आहे. जे विरोधक आम्हाला धर्मनिरपेक्षतेबद्दल सांगतात. १९९५ मध्ये युतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले तेव्हा त्यांची धर्मनिरपेक्षता कुठे गेली होती. युती सरकार जाते कळताच ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आले. त्यामुळे त्यांनी पक्ष निष्ठा, पक्षाची विचारधारा याबद्दल सांगू नये, असा थेट इशारा तटकरेंनी विरोधकांना दिला. त्याचसोबत विदर्भात आपल्या पक्षाची ताकद कमी आहे. आत्मकेंद्रित राजकारणामुळे नागपूरात संघटना वाढू शकली नाही. एवढे मोठे कॅबिनेट मंत्रीपद दिल्यानंतरही नागपुरात स्वतःची जागा सोडून इतर जागा निवडून आणू शकत नाही त्यांनी स्वतःची तुलना अजितदादांसोबत करू नये अशी टीका सुनील तटकरेंनी अनिल देशमुखांवर केली.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस