शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांत भीषण पाणीटंचाई, नऊ मोठ्या प्रकल्पांत केवळ १५.९० टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 20:17 IST

पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत सद्यस्थितीत सरासरी फक्त १५.९० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

अमरावती - पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत सद्यस्थितीत सरासरी फक्त १५.९० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अमरावती शहरालाही एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याअनुषंगाने आता जलसंपदा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला किमान एक महिना काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा या मोठ्या प्रकल्पांत १६.१५ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात २४.७९ टक्के, अरुणावती प्रकल्पात ११.२८ टक्के, बेंबळा प्रकल्पात २१.०६ टक्के, तर अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात १३.१६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वान प्रकल्पात सर्वाधिक ३४.०६ टक्के पाणीसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांची पाणीसाठ्याची स्थिती भीषण असून, नळगंगा प्रकल्पात फक्त ८.०९ टक्के, तर पेनटाकळी व खडकपूर्णा प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा असल्याची नोंद जलसंपदा विभागाच्या पाणीसाठा साप्ताहिक अहवालात नमूद आहे. नऊ प्रकल्पांचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा १५१८.६४ दलघमी आहे, तर आजचा उपयुक्त पाणीसाठा हा फक्त २४१.४४ दलघमी शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. इतर जिल्ह्यांचीही हीच स्थिती आहे.  २४ मध्यम प्रकल्पांत १८.२१ टक्के पाणीसाठा पश्चिम विदर्भातील मध्यम प्रकल्पांचीसुद्धा यंदा बिकट स्थिती आहे. २४ मध्यम प्रकल्पांत सरासरी १८.२१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहेत. अमरावती जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पांत ३५.५९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्पांत २२.०७ टक्के, अकोला जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पांत ४.९१ टक्के, वाशिम जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्पांत ८.१३ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांत ९.२१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळVidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्रAmravatiअमरावती