शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांत भीषण पाणीटंचाई, नऊ मोठ्या प्रकल्पांत केवळ १५.९० टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 20:17 IST

पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत सद्यस्थितीत सरासरी फक्त १५.९० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

अमरावती - पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत सद्यस्थितीत सरासरी फक्त १५.९० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अमरावती शहरालाही एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याअनुषंगाने आता जलसंपदा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला किमान एक महिना काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा या मोठ्या प्रकल्पांत १६.१५ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात २४.७९ टक्के, अरुणावती प्रकल्पात ११.२८ टक्के, बेंबळा प्रकल्पात २१.०६ टक्के, तर अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात १३.१६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वान प्रकल्पात सर्वाधिक ३४.०६ टक्के पाणीसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांची पाणीसाठ्याची स्थिती भीषण असून, नळगंगा प्रकल्पात फक्त ८.०९ टक्के, तर पेनटाकळी व खडकपूर्णा प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा असल्याची नोंद जलसंपदा विभागाच्या पाणीसाठा साप्ताहिक अहवालात नमूद आहे. नऊ प्रकल्पांचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा १५१८.६४ दलघमी आहे, तर आजचा उपयुक्त पाणीसाठा हा फक्त २४१.४४ दलघमी शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. इतर जिल्ह्यांचीही हीच स्थिती आहे.  २४ मध्यम प्रकल्पांत १८.२१ टक्के पाणीसाठा पश्चिम विदर्भातील मध्यम प्रकल्पांचीसुद्धा यंदा बिकट स्थिती आहे. २४ मध्यम प्रकल्पांत सरासरी १८.२१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहेत. अमरावती जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पांत ३५.५९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्पांत २२.०७ टक्के, अकोला जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पांत ४.९१ टक्के, वाशिम जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्पांत ८.१३ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांत ९.२१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळVidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्रAmravatiअमरावती