शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांत भीषण पाणीटंचाई, नऊ मोठ्या प्रकल्पांत केवळ १५.९० टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 20:17 IST

पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत सद्यस्थितीत सरासरी फक्त १५.९० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

अमरावती - पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत सद्यस्थितीत सरासरी फक्त १५.९० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अमरावती शहरालाही एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याअनुषंगाने आता जलसंपदा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला किमान एक महिना काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा या मोठ्या प्रकल्पांत १६.१५ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात २४.७९ टक्के, अरुणावती प्रकल्पात ११.२८ टक्के, बेंबळा प्रकल्पात २१.०६ टक्के, तर अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात १३.१६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वान प्रकल्पात सर्वाधिक ३४.०६ टक्के पाणीसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांची पाणीसाठ्याची स्थिती भीषण असून, नळगंगा प्रकल्पात फक्त ८.०९ टक्के, तर पेनटाकळी व खडकपूर्णा प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा असल्याची नोंद जलसंपदा विभागाच्या पाणीसाठा साप्ताहिक अहवालात नमूद आहे. नऊ प्रकल्पांचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा १५१८.६४ दलघमी आहे, तर आजचा उपयुक्त पाणीसाठा हा फक्त २४१.४४ दलघमी शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. इतर जिल्ह्यांचीही हीच स्थिती आहे.  २४ मध्यम प्रकल्पांत १८.२१ टक्के पाणीसाठा पश्चिम विदर्भातील मध्यम प्रकल्पांचीसुद्धा यंदा बिकट स्थिती आहे. २४ मध्यम प्रकल्पांत सरासरी १८.२१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहेत. अमरावती जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पांत ३५.५९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्पांत २२.०७ टक्के, अकोला जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पांत ४.९१ टक्के, वाशिम जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्पांत ८.१३ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांत ९.२१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळVidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्रAmravatiअमरावती