शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

ऐन हिवाळ्यात आणीबाणी; लातूरकरांना 10 दिवसांआड मिळणार पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 11:07 AM

अपुऱ्या पावासामुळे लातूरमध्ये भीषण पाणी टंचाई

लातूर: ऐन हिवाळ्यात लातूरमध्ये पाणी प्रश्नानं गंभीर स्वरुप धारण केलं आहे. अपुऱ्या पावसामुळे लातूरमधील पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनानं लातूर शहराला 10 दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लातूरकरांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार आहे. अपुऱ्या पावसामुळे लातूरमध्ये ऐन हिवाळ्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अद्याप उन्हाळ्याचे दिवस शिल्लक असल्यानं पाणी टंचाईच्या झळा आणखी दाहक होणार आहेत. त्यामुळेच महापालिका आयुक्तांनी दर 10 दिवसांनी शहराला पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय पाणी गळतीची समस्या कमी करण्यासाठीदेखील विशेष पावलं उचलण्यात येणार आहेत. 2016 मध्येही लातूरमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यावेळी या भागात ट्रेननं पाणी पुरवठा करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी लातूरच्या पाणी पुरवठ्याबद्दल स्थानिक खासदार सुनिल गायकवाड यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी आम्ही लातूरला विमानानंदेखील पाणी पुरवठा करू शकतो, असं विधान केलं होतं. '2016 मध्ये आम्ही रेल्वेनं लातूरला पाणी पुरवठा केला होता. आता आम्ही विमानानंदेखील लातूरमध्ये पाणी आणू शकतो. मात्र ती वेळ येणार नाही,' असं गायकवाड म्हणाले होते.  

टॅग्स :laturलातूरwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाई