शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

मराठा मोर्चेकऱ्यांवर ड्रोन ठेवणार वॉच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 18:45 IST

राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज व्याक्त केला जात आहे. मुंबईत होणाऱ्या या ना भूतो ना भविष्यति मोर्चाची सर्व तयारी झाली आहे.

ठळक मुद्दे9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज.मुंबईतील वाहतूक सुरळित रहावी तसेच अन्य विपरीत गोष्टी होऊ नयेत म्हणून पोलिसांनीही आपली कंबर कसली आहे. 

मुंबई, दि. 8 - मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज व्याक्त केला जात आहे. मुंबईत होणाऱ्या या ना भूतो ना भविष्यति मोर्चाची सर्व तयारी झाली आहे.  

मोर्चादरम्यान मुंबईतील वाहतूक सुरळित रहावी तसेच अन्य विपरीत गोष्टी होऊ नयेत म्हणून पोलिसांनीही आपली कंबर कसली आहे. जागोजागी CCTV कॅमेरे आणि ड्रोनद्वारे मोर्चेकऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच वाहतूक मार्गांत तात्पुरत्या स्वरूपाचे बदल कऱण्याच आले आहेत. उद्या सकाळी 9 ते दुपारी 5 वाजेपर्यंत असतील. मोर्चाच्या दिवशी मुंबईकरांचे हाल होऊ नयेत, म्हणून वाहतुकीबाबतच्या सर्व सूचना ट्विटर आणि रेडिओवर देण्यात येणार आहेत, अशी माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली आहे. 

यासाठी 35 हजारांवर पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार असून, या दिवशी पोलिसांची साप्ताहिक सुट्टी, रजा रद्द करण्यात आल्या आहेत. स्थानिक पोलिसासह राज्य राखीव दल, क्यूआरटीसह विविध पथके तैनात असतील. आयुक्त दत्ता पडसलगीकर हे बंदोबस्ताचे नियोजन करीत असून, त्यासाठी सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिका-यांची सुकाणू समिती बनविण्यात आलेली आहे. शहर व उपनगरातील अपर आयुक्त व उपायुक्तांवर आपापल्या कार्यक्षेत्रातील बंदोबस्ताची जबाबदारी असणार आहे.

मोर्चादरम्यान उपस्थितांना सेवा-सुविधा द्याव्यात, यासाठी पोलीस उपायुक्त मनोज कुमार शर्मा यांनी मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांना विनंती केली आहे. महात्मा गांधी रोडवरील दुभाजकावर ओ. सी. एस. वाहतूक चौक जंक्शन ते मेट्रो सिनेमा जंक्शनपर्यंत बॅरिकेट्स उभारावे. आझाद मैदान परिसरात मोबाइल टॉयलेटची व्यवस्था करावी. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या गवतात एखादी घातपाती वस्तू ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, मैदानावरील गवताची कापणी करावी, अशी मागणी मनोज कुमार शर्मा यांनी अजय मेहता यांच्याकडे केली आहे.

अशी आहे आचारसंहिता -- मुंबई मराठा क्रांती मोर्चा मूक असून, कोणताही आंदोलक घोषणा देणार नाही.- मोर्चात अधिकृत बॅनरशिवाय कोणतेही राजकीय, वैयक्तिक संस्था व संघटनांचे बॅनर्स चालणार नाहीत.- कोणत्याही जाती किंवा धर्माविरोधातील घोषणा किंवा मागण्यांचे बॅनर झळकविण्यास मनाई असेल.- मोर्चात स्वयंशिस्त पाळताना पोलिसांना सहकार्य केले जाईल.- व्यसन केलेल्या आंदोलकांना मोर्चात सामील होता येणार नाही.- घाई गडबड न करता, महिला, लहान मुले व वृद्धांना पुढे जाऊ दिले जाईल.- मोर्चादरम्यान जमा होणाºया पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, पाऊच आणि कचरा गोळा करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.- मोर्चात संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास, त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.- मोर्चात कुणीही आंदोलक वाट चुकल्यास, मराठा स्वयंसेवक किंवा पोलिसांशी संपर्क साधावा. 

दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी

मराठा मोर्चामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.  मोर्चामुळे शालेय वाहतुकीस यामुळे अडचण निर्माण झाल्यास विद्यार्थी वाहतूक कोंडीमध्ये अडकण्याची शक्यता आहे, असे सांगत शिक्षण विभागानं बुधवारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण मुंबईतील सरकारी शाळांसहीत खासगी शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे.  

अफवांवर विश्वास ठेवू नकामराठा क्रांती मोर्चा काही कारणांमुळे विस्कळीत व्हावा, या हेतूने अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. गाडीवर स्टीकर नसेल तर मुंबईत प्रवेश मिळणार नाही, ट्रॅफिक जाम आहे, अशा प्रकारचे विविध संदेश सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. तरी मराठा बांधवांनी या अफवांला बळी न पडता मुंबई गाठायची आहे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबई समितीने केले आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा