शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

बाजार समित्यांमध्ये शेतमालाची नासाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 10:35 IST

बाजार समितीत होणाऱ्या शेतमालाच्या नासाडीचा विषय किती गंभीर आहे, हे समजू शकते.

डॉ. परशराम पाटील, सदस्य, अभ्यास गट (एफएओ)

देशभरातील बाजार समित्या आणि वाहतूक व्यवस्थेत दरवर्षी साधारण १.५३ लाख कोटी मूल्याचे अन्नधान्य, फळे, भाजीपाल्याची नासाडी अर्थात नुकसान होते, असे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या अहवालात गेल्या वर्षी नमूद करण्यात आले होते. त्यात केवळ वाहतुकीदरम्यान नाशवंत पिकांचे ५ ते १० टक्के नुकसान होते, असे नाबार्डच्या अभ्यासात दिसून आले होते. भारतासह गरीब, विकसनशील देशांमधील बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आलेल्या फळे- भाजीपाल्यांची ३० ते ४० टक्के आणि अन्नधान्यांची सुमारे १० टक्के नासाडी होते. यावरून बाजार समितीत होणाऱ्या शेतमालाच्या नासाडीचा विषय किती गंभीर आहे, हे समजू शकते.

देशभरातील बाजार समित्यांमधील शेतमालाची नासाडी रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) नुकतीच एका अभ्यास गटाची स्थापना केली आहे. पाच जणांचा हा अभ्यास गट नासाडी टाळण्यासाठी उपाययोजना सुचविणार आहे. वास्तविक केंद्र सरकारने हा प्रकल्प हाती घेण्याची गरज होती. 

देशातील बाजार समित्यांमध्ये होणारी अन्नधान्याची नासाडी रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) बँकॉकच्या प्रादेशिक कार्यालयातील अधिकारी मिता पंजाबी यांच्या अध्यक्षतेखाली फूड लॉस ॲण्ड वेस्ट मॅनेजमेंट ऑफ होलसेल मार्केट्स ऑफ इंडिया, या अभ्यास गटाची स्थापना केली आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ मार्केटिंग फेडरेशनचे (कोसाम) कार्यकारी अधिकारी जे. एम. यादव अभ्यास गटाचे समन्वयक आहेत. हवामान बदलाचे अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ भरत नागर, अन्न शास्त्रज्ञ डॉ. रावसाहेब मोहिते व माझा सदस्य म्हणून समावेश केला आहे.

शेतमालाची उपलब्धता कमी झाल्याने एकीकडे ग्राहकांना चढ्या दराने खरेदी करावी लागते. दुसरीकडे शेतमाल उत्पादनावर खर्च झालेले जमिनीतील पोषक घटक, पाणी, खते, औषधे, मनुष्यबळ, भांडवल वाया जाते.

एकीकडे वाढत्या तापमानामुळे शेतीवर गंभीर संकट आलेले असताना उच्च पोषणमूल्य असलेल्या अन्नाची नासाडी होणे भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशाला परवडणारे नाही. कारण यातून अर्थव्यवस्थेवर आणि अन्न सुरक्षेवर मोठा ताण येत आहे. ७४ दशलक्ष टन एवढे दरवर्षी नुकसान भारतातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये अन्नधान्य, फळे आणि भाजीपाल्याचे होते. ते देशाच्या एकूण अन्नधान्य आणि बागायती पिकांच्या उत्पादनाच्या १०% टक्के आहे. 

मुंबई बाजार समितीत दररोज २०० टन शेतमालाची नासाडी

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज सुमारे २०० टन शेतमालाची नासाडी होते. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज भाजीपाला, फळे, फुले, धान्यांची नासाडी होऊन ५० ते ६० टन कचरा निर्माण होतो. 

साधारण १० ते १५ टन कचऱ्यातून एक टन मिथेन वायू (एक टन मिथेन : १३९६.६ क्युबिक मीटर) निर्माण होतो. एक टन मिथेन वायू हा २३ टन कार्बन डायऑक्साईड इतका घातक आहे. मिथेन वायू हवेतील उष्णता शोषून घेत असल्यामुळे तापमान वाढीला कारणीभूत ठरतो. त्यामुळे जगभरात मिथेन वायूचे उत्सर्जन कमी करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी कृषी कचऱ्यापासून सेंद्रिय खत, बायोगॅस निर्मितीस प्राधान्य देणे गरजेचे आहे.

पिकांच्या नासाडीची कारणे 

योग्य साठवणूक सुविधांचा अभाववाहतुकीसह इतर अपुऱ्या पायाभूत सुविधाअकार्यक्षम पुरवठा साखळीकापणीनंतरची अयोग्य हाताळणी

कांदे, बटाटे आणि टोमॅटो यांसारख्या फळभाज्यांचेही मोठे नुकसान होते. ५,१५६ कोटी मूल्याचा कांदा आणि ५,९२१ कोटी मूल्याच्या टोमॅटो पिकाची नासाडी होेते. सर्वाधिक नुकसानकेळी, आंबा आणि लिंबूवर्गीय फळांचे सर्वाधिक अनुक्रमे  ५,७७७ कोटी, १०,५८१ कोटी, ४,३४७ कोटी 

अन्नधान्याची नासाडी, शेतमालाचा प्रकार नुकसान (कोटी रु.) 

तांदूळ, गहू, मका २६,०००

डाळी, तेलबियांचे १८,०००

फळे, भाजीपाला  ५७,०००

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र