शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

समस्यांच्या रावणाचे दहन करून नवा महाराष्ट्र घडवायचाय - आदित्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 5:52 AM

मुंबई : महायुतीसमोर कोणत्याच पक्षाचे आव्हान नाही; मात्र सर्वांत मोठे आव्हान हे समस्यांचे आहे. सत्तेत आल्यावर समस्यांच्या १० तोंडी ...

मुंबई : महायुतीसमोर कोणत्याच पक्षाचे आव्हान नाही; मात्र सर्वांत मोठे आव्हान हे समस्यांचे आहे. सत्तेत आल्यावर समस्यांच्या १० तोंडी रावणाचे दहन करून मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, असे मत आदित्य ठाकरे यांनी मांडले. भांडुप येथे शिवसेना उमेदवार रमेश कोरगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, वरळीतून मी उभा असलो तरी ही निवडणूक मी स्वत:साठी नाही, तर नवा महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढवत आहे. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान महाराष्ट्रातले २०० मतदारसंघ फिरलो. जिथून माझा ताफा जायचा तिथे विविध निवेदने लोक मला देत. त्या निवेदनांमध्ये लोक विविध समस्या घेऊन येत होते. अनेक निवेदनांमधून टीकादेखील होत असे. माझ्याकडून लोकांच्या अनेक अपेक्षा आहेत म्हणून लोक मला निवेदने देत होते. या दौऱ्यादरम्यान मला काँग्रेस व राष्ट्रवादीची ताकद कुठेच दिसली नाही, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

शिवसेना व भाजप यांनी एकत्र वचननामा काढला असता तर तो मोठा ग्रंथ झाला असता म्हणूनच दोघांनी वेगळे वचननामे काढले. मागची पाच वर्षे ही काँग्रेस, राष्ट्रवादीची पापे पुसण्यात गेली. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीची सत्ता येणार असून महाराष्ट्र बेरोजगारीमुक्त, दुष्काळमुक्त व भ्रष्टाचारमुक्त करायचा आहे, त्यासाठीच महायुतीचे सगळे आमदार निवडून येणे गरजेचे आहे. महानगरपालिका, विधानसभा व लोकसभा यांमध्ये एकाच पक्षाची सत्ता असल्यावर काम करणे सोपे होते, असे ते म्हणाले.

बेस्टच्या भाडेकपातीमुळे १० लाख प्रवासी वाढले. यामुळे पुढील ३ वर्षांत ३ हजार बस वाढवणार असल्याचे ते म्हणाले. मुंबईत प्रतिदिन १० हजार मेट्रिक टन कचरा उचलला जायचा; परंतु सुका कचरा व ओला कचरा यांच्या वर्गीकरणास मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याने आज प्रतिदिन कचºयाचे प्रमाण साडेसहा हजार मेट्रिक टन एवढे कमी झाले आहे. मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयांत एकूण १७,४५६ खाटा आहेत. मुंबईसारखी आरोग्य सेवा देशात कुठेच उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये व्हर्चुअल क्लासरूमबनवून सगळीकडे शिक्षणाचा दर्जा समान करायचा आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात महिला बचत गट निर्माण करून १० रुपयांत थाळी या योजनेंतर्गत त्या महिलांच्या हाती काम देणार असल्याचे आदित्य यांनी सांगितले. बर्गरच्यादुकानात आॅफर असल्यावर महागडा बर्गर २० रुपयांना विकला जातो; मग आम्ही गरजू लोकांना १० रुपयांत थाळी दिल्यावर विरोधकांच्या पोटात का दुखते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या वेळी अयोध्येत राम मंदिर होणारच, अशी घोषणाही आदित्य यांनी केली.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेworli-acवरळीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019