शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

उद्योग बंद करायचेत? ४५ दिवसांचा पगार द्या; राज्य सरकार करणार कामगार कायद्यात सुधारणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 13:50 IST

बंद होत असलेल्या उद्योगांकडून कामगार/कर्मचाऱ्यांना योग्य देणी दिली जात आहेत की नाही यावर सरकारचे नियंत्रण असेल. 

मुंबई : तीनशेपर्यंत कर्मचारी असलेला उद्योग बंद करण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरज असणार नाही, तसेच सर्वच प्रकारच्या उद्योगांना वर्षाकाठी ४५ दिवसांचा पगार भरपाई म्हणून द्यावा लागेल अशा सुधारणा राज्य सरकारने कामगार कायद्यात प्रस्तावित केल्या आहेत. 

कायद्यातील सुधारणांसाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्याला राज्य सरकार मान्यता देणार की नाही यावरच या सुधारणांचे भवितव्य अवलंबून असेल. १०० वा त्यापेक्षा कमी कर्मचारी असलेले उद्योग बंद करायचे असतील तर यापूर्वी सरकारच्या परवानगीची गरज नसायची. मात्र आता ३०० पर्यंत कर्मचारी असलेला उद्योग बंद करायचा असेल तरी सरकारची परवानगी घ्यावी लागणार नाही अशी सुधारणा प्रस्तावित आहे. परवानगी घ्यायची नसली तरी सरकारला त्या बाबतची माहिती द्यावीच लागेल. बंद होत असलेल्या उद्योगांकडून कामगार/कर्मचाऱ्यांना योग्य देणी दिली जात आहेत की नाही यावर सरकारचे नियंत्रण असेल. 

यापूर्वी उद्योग बंद करताना नुकसान भरपाई म्हणून कर्मचाऱ्यांना वर्षाकाठी १५ दिवसाच्या पगार द्यावा लागत असे. मात्र आता वर्षाकाठी ४५ दिवसांचा पगार द्यावा लागणार आहे. एखादा कर्मचारी कंपनीत पाच वर्षे असेल तर त्याला २२५ दिवसांचा पगार द्यावा लागणार आहे. 

किमान वेतनाचा पॅटर्नही बदलणारकामगार/कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाचा पॅटर्न बदलण्याचेही प्रस्तावित आहे. आतापर्यंत ७६ प्रकारच्या वर्गवारी निश्चित करून त्यानुसार किमान वेतन निश्चित केले जात असे. मात्र आता कुशल कामगार, अर्धकुशल आणि अकुशल कामगार अशी वर्गवारी करून किमान वेतन निश्चित केले जाणार आहे.

उद्योगांच्या ग्रामीण, शहरी, विकसित, अविकसित झोनचा विचार करूनही किमान वेतन निश्चित केले जाईल. 

टॅग्स :Employeeकर्मचारीState Governmentराज्य सरकार