शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
3
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
4
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
5
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
6
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
7
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
8
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
9
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
10
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
11
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
12
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
13
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
14
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
15
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
16
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
17
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
18
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
19
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
20
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग बंद करायचेत? ४५ दिवसांचा पगार द्या; राज्य सरकार करणार कामगार कायद्यात सुधारणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 13:50 IST

बंद होत असलेल्या उद्योगांकडून कामगार/कर्मचाऱ्यांना योग्य देणी दिली जात आहेत की नाही यावर सरकारचे नियंत्रण असेल. 

मुंबई : तीनशेपर्यंत कर्मचारी असलेला उद्योग बंद करण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरज असणार नाही, तसेच सर्वच प्रकारच्या उद्योगांना वर्षाकाठी ४५ दिवसांचा पगार भरपाई म्हणून द्यावा लागेल अशा सुधारणा राज्य सरकारने कामगार कायद्यात प्रस्तावित केल्या आहेत. 

कायद्यातील सुधारणांसाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्याला राज्य सरकार मान्यता देणार की नाही यावरच या सुधारणांचे भवितव्य अवलंबून असेल. १०० वा त्यापेक्षा कमी कर्मचारी असलेले उद्योग बंद करायचे असतील तर यापूर्वी सरकारच्या परवानगीची गरज नसायची. मात्र आता ३०० पर्यंत कर्मचारी असलेला उद्योग बंद करायचा असेल तरी सरकारची परवानगी घ्यावी लागणार नाही अशी सुधारणा प्रस्तावित आहे. परवानगी घ्यायची नसली तरी सरकारला त्या बाबतची माहिती द्यावीच लागेल. बंद होत असलेल्या उद्योगांकडून कामगार/कर्मचाऱ्यांना योग्य देणी दिली जात आहेत की नाही यावर सरकारचे नियंत्रण असेल. 

यापूर्वी उद्योग बंद करताना नुकसान भरपाई म्हणून कर्मचाऱ्यांना वर्षाकाठी १५ दिवसाच्या पगार द्यावा लागत असे. मात्र आता वर्षाकाठी ४५ दिवसांचा पगार द्यावा लागणार आहे. एखादा कर्मचारी कंपनीत पाच वर्षे असेल तर त्याला २२५ दिवसांचा पगार द्यावा लागणार आहे. 

किमान वेतनाचा पॅटर्नही बदलणारकामगार/कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाचा पॅटर्न बदलण्याचेही प्रस्तावित आहे. आतापर्यंत ७६ प्रकारच्या वर्गवारी निश्चित करून त्यानुसार किमान वेतन निश्चित केले जात असे. मात्र आता कुशल कामगार, अर्धकुशल आणि अकुशल कामगार अशी वर्गवारी करून किमान वेतन निश्चित केले जाणार आहे.

उद्योगांच्या ग्रामीण, शहरी, विकसित, अविकसित झोनचा विचार करूनही किमान वेतन निश्चित केले जाईल. 

टॅग्स :Employeeकर्मचारीState Governmentराज्य सरकार