शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उद्योग बंद करायचेत? ४५ दिवसांचा पगार द्या; राज्य सरकार करणार कामगार कायद्यात सुधारणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 13:50 IST

बंद होत असलेल्या उद्योगांकडून कामगार/कर्मचाऱ्यांना योग्य देणी दिली जात आहेत की नाही यावर सरकारचे नियंत्रण असेल. 

मुंबई : तीनशेपर्यंत कर्मचारी असलेला उद्योग बंद करण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरज असणार नाही, तसेच सर्वच प्रकारच्या उद्योगांना वर्षाकाठी ४५ दिवसांचा पगार भरपाई म्हणून द्यावा लागेल अशा सुधारणा राज्य सरकारने कामगार कायद्यात प्रस्तावित केल्या आहेत. 

कायद्यातील सुधारणांसाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्याला राज्य सरकार मान्यता देणार की नाही यावरच या सुधारणांचे भवितव्य अवलंबून असेल. १०० वा त्यापेक्षा कमी कर्मचारी असलेले उद्योग बंद करायचे असतील तर यापूर्वी सरकारच्या परवानगीची गरज नसायची. मात्र आता ३०० पर्यंत कर्मचारी असलेला उद्योग बंद करायचा असेल तरी सरकारची परवानगी घ्यावी लागणार नाही अशी सुधारणा प्रस्तावित आहे. परवानगी घ्यायची नसली तरी सरकारला त्या बाबतची माहिती द्यावीच लागेल. बंद होत असलेल्या उद्योगांकडून कामगार/कर्मचाऱ्यांना योग्य देणी दिली जात आहेत की नाही यावर सरकारचे नियंत्रण असेल. 

यापूर्वी उद्योग बंद करताना नुकसान भरपाई म्हणून कर्मचाऱ्यांना वर्षाकाठी १५ दिवसाच्या पगार द्यावा लागत असे. मात्र आता वर्षाकाठी ४५ दिवसांचा पगार द्यावा लागणार आहे. एखादा कर्मचारी कंपनीत पाच वर्षे असेल तर त्याला २२५ दिवसांचा पगार द्यावा लागणार आहे. 

किमान वेतनाचा पॅटर्नही बदलणारकामगार/कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाचा पॅटर्न बदलण्याचेही प्रस्तावित आहे. आतापर्यंत ७६ प्रकारच्या वर्गवारी निश्चित करून त्यानुसार किमान वेतन निश्चित केले जात असे. मात्र आता कुशल कामगार, अर्धकुशल आणि अकुशल कामगार अशी वर्गवारी करून किमान वेतन निश्चित केले जाणार आहे.

उद्योगांच्या ग्रामीण, शहरी, विकसित, अविकसित झोनचा विचार करूनही किमान वेतन निश्चित केले जाईल. 

टॅग्स :Employeeकर्मचारीState Governmentराज्य सरकार