शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

"वक्फ बोर्ड ही अतिक्रमण करण्यासाठीची संस्था"; आचार्य स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 21:25 IST

Waqf board news: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात येणार आहे. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Waqf Board Amendment bill 2024: संयुक्त संसदीय समितीकडून मंजूर होऊन आलेले वक्फ सुधारणा विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनात मांडले जाणार आहे. त्याला काही राजकीय पक्ष आणि अनेक संघटनांकडून विरोध होत आहे. तर दुसरीकडे वक्फ सुधारणा विधेयकाला समर्थनही मिळत आहे. विधेयकाच्या समर्थनाथ बोलताना जुन्या आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांनी मोठे विधान केले आहे. वक्फ बोर्ड ही अतिक्रमण करण्यासाठीची एक संस्था आहे, असे ते म्हणाले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

केंद्र सरकारकडून २०२४ मध्ये वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात आले होते. पण, हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याची मागणी झाली. त्यानंतर सरकारने हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले होते. हे विधेयक आता पुन्हा सरकारकडे पाठवण्यात आले आहे. 

हेही वाचा >>"...तर मुस्लीम तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत"; ओवेसी नितीश कुमार, चंद्राबाबूंवर का भडकले?

सुधारणा विधेयकामुळे वक्फ बोर्ड पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, याबद्दल बोलताना जुन्या आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराज म्हणाले की, वक्फ बोर्ड संवैधानिक नाहीये. 

अतिक्रमण करण्यासाठीची संस्था

"बघा, वक्फ बोर्डाबद्दल सांगायचं तर ती काही घटनात्मक संस्था नाहीये. तिचा संविधानात कोणताही उल्लेख नाहीये. अतिक्रमण करण्यासाठीची एक संस्था आहे. त्या संस्थेत जे लोक काम करताहेत विशेषतः मौलाना कोकब मुस्तफा, मोहम्मद इलियासी, हे उलेमा आहेत आणि मोठे मुस्लीम अभ्यासक आहेत, ते म्हणताहेत की ती असंवैधानिक संस्था आहे आणि अतिक्रमणासाठी आहे. तिचा काही अर्थही नाहीये", असे अवधेशानंद गिरी महाराज म्हणाले.  

'औरंगजेब भारतीयांचा आदर्श होऊ शकत नाही'

"राहिला भाग औरंगजेबाच्या कबरीचा तर औरंगजेब भारतासाठी आदर्श पुरुष होऊ शकत नाही. मुस्लिमांनासाठीही तो आदर्श नाही. त्याने आपल्या भावाची हत्या केली. आपल्या वडिलांना तुरुंगात डांबले. पाण्याच्या एका एका थेंबासाठी तडफडवलं. त्यामुळे तो व्यक्ती भारताचा आदर्श होऊ शकत नाही. हा विचार मुस्लीम स्वतः करत आहेत. तो बाहेरच्या लोकांचा आदर्श आहे, भारताच्या लोकांचा नाही", असे स्वामी अवधेशानंद गिरी महाराज म्हणाले. 

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डnagpurनागपूरParliamentसंसदlok sabhaलोकसभा