शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

महाराष्ट्राच्या यादीची प्रतीक्षाच; युती अन् आघाडीत जागा वाटप निश्चित होत नसल्याने पेच

By यदू जोशी | Updated: March 9, 2024 06:32 IST

महायुतीमध्ये भाजप ३४ ते ३५ जागा लढणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ खासदार असताना त्याहीपेक्षा कमी जागा त्यांना मिळणार असल्याचे जे चित्र समोर आल्यामुळे चलबिचल आहे.

मुंबई : लोकसभेसाठी राज्यातील सत्तारूढ महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडीला अद्याप एकही उमेदवाराच्या नावाची घोषणा करता आलेली नाही. त्यासाठी आणखी किमान दोन दिवस लागतील अशी शक्यता आहे. दोघेही एकमेकांच्या नावांचा अंदाज घेत आहेत. जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होत नसल्याने घोडे अडले आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते रात्री दिल्लीत पोहोचले असून रात्री उशिरा फॉर्म्युला ठरेल व दोन दिवसांत घोषणा केली जाईल, असे म्हटले जात आहे. 

महायुतीमध्ये भाजप ३४ ते ३५ जागा लढणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ खासदार असताना त्याहीपेक्षा कमी जागा त्यांना मिळणार असल्याचे जे चित्र समोर आल्यामुळे चलबिचल आहे. मविआमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला २० हून अधिक जागा मिळणार असल्याचे चित्र असताना शिंदेंच्या शिवसेनेला महायुतीत त्याहून निम्म्याही जागा मिळणार नसतील तर भाजपसोबत जाण्याचा फायदा काय, असा सवाल आता शिंदे यांचे समर्थक आमदार, खासदार करीत आहेत. त्याचवेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला महाविकास आघाडीत मिळणार असलेल्या जागांपेक्षा दोन तरी अधिक जागा महायुतीत आपण घ्यायला हव्यात, असा दबाव राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर वाढविला आहे.  

मविआचे जागा वाटपाचे घोडे वेगवेगळ्या कारणांनी अडले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी त्यांच्यासोबत जाणार की नाही हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिवच्या जागांबाबत आधी घेतलेला जागा वाटपाचा निर्णय महाविकास आघाडीला बदलावा लागत आहे. 

भाजपचीही कसरत- भाजपला स्वत:चे चार ते पाच उमेदवार ठरविताना बरीच कसरत करावी लागत आहे. पक्षात काही धक्कादायक बदल असू शकतात. महाविकास आघाडीतील एकदोन बडी नावे कमळ हातात घेऊ शकतात. - मुंबईत तिन्ही खासदारांना संधी नाकारली जाण्याची शक्यता आहे आणि याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने आधीच दिले होते. उत्तर महाराष्ट्रातही अत्यंत महत्त्वाचे आणि अचंबित करणारे बदल घडू शकतात. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस