शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अजित पवार गटासोबत बसून बाहेर पडल्यावर उलट्या होतात; शिंदेंच्या मंत्र्यांचे खळबळजनक वक्तव्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 22:08 IST

उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना अजित पवार हे आपल्या आमदारांना निधी देत नाहीत असा आरोप करून एकनाथ शिंदेंनी सत्ता उलथवून टाकत भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. परंतू, याच अजित पवारांसोबत सत्ता शेअर करावी लागली आहे.

महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही आलबेल नाहीय. भाजपा-शिवसेना हे पक्ष उघडपणे राष्ट्रवादीवर वेळोवेळी तोंडसुख घेत आहेत. शिंदे-फडणवीस जरी अजित पवार गट सोबत असल्याचे दाखवत असले तरी देखील तिन्ही पक्ष एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. आता नुकताच राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद उफाळून आला आहे. याचे पडसाद युतीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. 

एकनाथ शिंदे गटाचे धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवार राष्ट्रवादी गटाबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आपले आयुष्यभर पटले नाही, मांडीला मांडी लावून बसलो आहोत परंतू बाहेर आल्यावर उलट्या होतात, असे वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले आहे. 

यावरून राष्ट्रवादी भडकली असून अमोल मिटकरी यांनी महायुतीमध्ये असल्यामुळे त्यांना जर उलट्या होत असतील तर त्या कशामुळे होतात हे एकनाथ शिंदेच सांगू शकतील असे म्हटले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी शिंदे गटाचे मंत्री अशा पद्धतीचे बोलणार असतील तर हे ऐकून घेण्यापेक्षा बाहेर पडलेले बरे, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. महायुती झाली म्हणून आज तानाजी सावंत हे मंत्री झाले आहेत. आम्ही सत्तेसाठी लाचार नाही, राष्ट्रवादी महायुतीत तानाजी सावंतांमुळे आलेली नाही, असेही पाटील म्हणाले. 

महत्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना अजित पवार हे आपल्या आमदारांना निधी देत नाहीत असा आरोप करून एकनाथ शिंदेंनी सत्ता उलथवून टाकत भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. परंतू, याच अजित पवारांसोबत सत्ता शेअर करावी लागली आहे. आता सत्ता उपभोगून झाल्यानंतर विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी पुन्हा एकदा अजित पवारांवर टीका केली जाऊ लागली आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारTanaji Sawantतानाजी सावंतShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदे