शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

त्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कांचे उल्लंघन; मानवी हक्क आयोगाची मुख्य सचिवांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 10:44 IST

पनवेल तालुक्यातील साई गावातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याची महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.

मुंबई : पनवेल तालुक्यातील साई गावातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याची महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांंनी राज्याचे मुख्य सचिव, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेणच्या प्रकल्प अधिकाऱ्यांसह आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांना नोटीस बजावली आहे. आयोगाने संबंधितांना आठ आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मानवी हक्क आयोगाचे सदस्य संजयकुमार, प्रबंधक विजय केदार, सहायक प्रबंधक नूतन भोसले यांच्या शिष्टमंडळाने आश्रमशाळेला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. आश्रमशाळेचे कार्य, व्यवस्थापन आणि तिथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्थितीचे निरीक्षण करून अध्यक्षांना अहवाल सादर केला होता. त्यात आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२  सप्टेंबर रोजी होईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.  

आयोगाची निरीक्षणे शाळा अत्यंत असुरक्षित, जीर्ण, धोकादायक व अस्वच्छ इमारतीत आहे. शाळेला संरक्षक भिंत नाही. निवासी भागात समोरच्या वीटभट्टीच्या धुराचा त्रास विद्यार्थ्यांना होतो. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था नाही. वर्ग, निवास, जेवण व मनोरंजनासाठी एकाच खोलीचा वापर होतो. विद्यार्थ्यांना पलंग, गादी दिलेली नाही. १३६ मुलींसाठी केवळ २ शौचालये आहेत. स्वयंपाकघर लहान व अंधाऱ्या खोलीत आहे. सर्वांना भांडी शाळेबाहेर किंवा शौचालयात धुवावी लागतात. पहिलीपासून १०वीपर्यंतच्या वर्गात फर्निचर नाही. विद्यार्थ्यांना जमिनीवर बसावे लागते. शासकीय लाभ दिले जातात. पण, त्यात कपात झाली आहे. शाळा उघड्या जागेत असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आहे. शैक्षणिक गुणवत्ता अत्यंत खालावलेली आहे. २१ वर्षांपासून शाळा तशीच असून, बदल झालेला नाही.

टॅग्स :panvelपनवेलStudentविद्यार्थीSchoolशाळा