शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

...म्हणून गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं बाहुला-बाहुलीचं लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 19:06 IST

गावकऱ्यांचा अनोखा उपक्रम : वाजत-गाजत निघाली नवरदेवाची वरात

गिरड : पाऊस पडावा यासाठी बेडकांचे लग्न लावण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. पण दुष्काळामुळे बाहुला-बाहुलीचे लग्न लावण्याचा अनोखा प्रकार वर्ध्यामध्ये घडला आहे. पण बाहुला-बाहुलीचे लग्न नेमके कशासाठी? असा प्रश्न पडला असेल ना. चला पाहुया.

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील शिवणफळ या गावात गेल्या पन्नास वर्षांत कधीही दुष्काळ पडला नव्हता. मात्र, पहिल्यांदाच यंदा दुष्काळ पडला आहे. यामुळे शेतीवर परिणाम झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्नही कमालीचे घटले आहे. यामुळे यंदा गावातील 22 तरुण आणि 2 तरुणींचा विवाहसोहळा लांबणीवर पडला होता. मात्र, गावात यंदा एकही लग्न होणार नाही या कल्पनेनेच गावकऱी अस्वस्थ झाले होते. 

दुष्काळी परिस्थितीमुळे विवाह कार्य होऊ शकले नसल्याने गावकऱ्यांनी एकोप्यातून विवाहाच्या परंपरेनुसार बाहुला-बाहुलीचाही विवाह पार पाडला. वधू आणि वर मंडपी हिरवा मांडव टाकला तसेच हळद आणि अहेराचीही देवाण-घेवाण करण्यात आली. इतकेच नव्हे, तर पाच जोडप्यांची अंघोळ आणि चोरपाणी घालून सर्व सोपस्कार पार पाडले. गावातील हनुमान मंदिराच्या सभागृहात हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आल्याने वरपक्षाकडील मंडळी गावातून ढोल-ताशाच्या तालावर नाचत वधू मंडपी पोहोचली. यावेळी गावातील आबालवृद्धांचाही समावेश होता. 

पाहुण्यांचा मानपान करून विवाहस्थळी बाहुला-बाहुलीला आणले. त्यानंतर सनई चौघड्याच्या सूरात मंगलाष्टके म्हणून अक्षतांची उधळण करण्यात आली. या सोहळ्याला उपस्थित वऱ्हाड्यांच्या भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी आजुबाजुच्या गावातील सरपंचही उपस्थित होते. शिवणफळ गावातील नागरिकांनी शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी सामूहीक वर्गणीतून कमी खर्चात सर्वाच्या सहकार्याने एक आदर्श विवाह पार पाडता येतो, असा संदेश सर्वांना दिला. या अनोख्या विवाह सोहळ्याची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

 

टॅग्स :marriageलग्नdroughtदुष्काळRainपाऊस