शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

"मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला तरच..."; पंतप्रधान मोदींच्या माफीनाम्यावर वडेट्टीवारांचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 17:56 IST

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी माफी मागितल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.

Vijay Wadettiwar on PM Modi Apology : मालवणच्या राजकोट किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळ्याची दुर्दैवी घटना काही दिवसांपूर्वी घडली. नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. मात्र एका वर्षाच्या आतच हा पुतळा कोसळल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरलं आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनेवर पहिल्यांदाच व्यक्त झाले आहेत. पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी माफी मागितली आहे. मात्र निवडणुकांमुळे ही माफी मागितल्याचा संशय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.

नौदल दिनाचे औचित्य साधून राजकोट किल्ल्यावरील २८ फुटी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलं होतं. मात्र आठच महिन्यात पुतळा कोसळला. पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आली असून एकाला अटक करण्यात आलीय. अशातच महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी एका कार्यक्रमात जाहीर माफी मागितली आहे. मात्र आता या माफीनाम्यावरुन विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.

"छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला, त्यानंतर पाच दिवसांनी महाराष्ट्रात दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान यांनी आज शिवप्रेमींची माफी मागितली. पण पुतळा कोसल्यावर राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले ताशी ४५ किमी वेगाने वारे वाहत होते म्हणून पुतळा कोसळला. ज्याने पुतळा बनवला तो शिल्पकार फरार आहे, कारवाई नाही. मंत्री केसरकर म्हणाले काही तरी चांगले व्हायचे असेल म्हणून पुतळा कोसळला असेल. सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी असताना पुतळा प्रकरणी बोटं नौदल कडे दाखवले! पंतप्रधान यांनी माफी मागितल्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा घेतला असता तर त्या माफीवर विश्वास बसला असता. पण कृतीत काहीच नाही, फक्त पोकळ शब्द आहेत! त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुका समोर ठेवून फक्त माफी मागितली का हा संशय येतोय," असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा माफीनामा

"काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये जे काही घडलं, ते अत्यंत दुख:द आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर ते आमचे आराध्य दैवत आहेत. मी आज नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो. तसेच जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य मानतात, या घटनेमुळे त्यांच्या मनालाही जे वेदना झाल्या आहेत. मी त्यांच्यापुढेही नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो. मी महाराष्ट्राच्या भूमीत येऊन सर्वात आधी छत्रपती शिवरायांची माफी मागितली आहे," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारNarendra Modiनरेंद्र मोदीEknath Shindeएकनाथ शिंदे