शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

फडणवीस सरकारच्या काळात चारा छावण्यांमध्ये घोटाळा; वडेट्टीवारांनी केली चौकशीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 11:58 AM

विशेष म्हणजे याआधी राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार यांनी सुद्धा फडणवीस सरकारच्या काळात घोटाळे झाले असल्याचे आरोप केले होत.

मुंबई : गेल्यावेळीच्या सरकारमध्ये टँकर आणि जलयुक्त शिवार योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप होत असतानाच आता, फडणवीस सरकारच्या काळात सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यांमध्ये सुद्धा घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हा आरोप केला असून चौकशीची मागणी सुद्धा केली आहे.

गेल्यावेळी असलेल्या भाजप सरकाराच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर घोटाळा झाला आहे. तर बीड, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात फडणवीस सरकारने सुरु केलेल्या चारा छावण्यांमध्ये जनावरांची संख्या खोटी दाखविण्यात आली. तसेच खोटी संख्या दाखवून तत्कालीन फडणवीस सरकारने 2018-19 या वर्षात आर्थिक घोटाळा केला असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून एका महिन्यात अहवाल सादर करण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्याचे सुद्धा ते म्हणाले.

विशेष म्हणजे याआधी राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार यांनी सुद्धा फडणवीस सरकारच्या काळात घोटाळे झाले असल्याचे आरोप केले होत. दुष्काळाच्या काळात अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर टँकर घोटाळा झाला आहे. तर चारा छावण्यातही घोटाळा झाला असून तत्कालीन राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना राबवली त्यातही घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता.