शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

Vidhan Sabha 2019: पक्ष आंबेडकरी, अन् हाती कमळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 12:31 AM

रामदास यांनी स्वत:च्या पक्षाचे अस्तित्वच मिटवून टाकले आहे.

- संजीव साबडे 

नामांतराच्या लढ्यात सहभागी असलेले, रिपब्लिकन ऐक्यासाठी एके काळी प्रयत्न करणारे रामदास आठवले यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सोडून भाजप-शिवसेना युतीत प्रवेश केला, याला आता पाच वर्षे झाली. पण त्यांनी आतापर्यंत स्वत:च्या पक्षाचे अस्तित्व कायम ठेवले होते. आघाडी असो वा युती, त्यांचे उमेदवार स्वत:च्या पक्षाच्या निवडणूक चिन्हावरच लढले. तरीही त्यांचे उमेदवार कायमच पराभूत झाले. पण रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे स्वतंत्र अस्तित्व आठवले यांनी कायमच ठेवले. आम्ही भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नाही, असे ते सतत सांगत होते. या रामदास आठवलेंनी आता अचानक भाजपचे कमळच हाती घेतले आहे. त्यांचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे त्यांचे विजयी झालेले उमेदवार कायदेशीर भाजपचेच असतील. त्यांना भाजपचा व्हिप पाळावा लागेल. प्रसंगी रिपब्लिकन पक्षाने भाजपपेक्षा वेगळी भूमिका घेतली तरी या आमदारांना मात्र विधानसभेत भाजपच्या भूमिकेनुसारच वागावे लागेल, मतदान करावे लागेल.

रामदास यांनी स्वत:च्या पक्षाचे अस्तित्वच मिटवून टाकले आहे. त्यामुळे आंबेडकरी विचारांच्या या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना उघडपणे भाजपचा जयजयकार करावा लागेल, भाजपचा झेंडा हातात मिरवावा लागेल आणि भाजपच्या कमळ या चिन्हावर शिक्का मारा, असे मतदारांना सांगावे लागेल. भाजप व कायम हिंदू राष्ट्राची भूमिका घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे संबंध सर्वज्ञात आहेत. ‘मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही... ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यावर माझा विश्वास नाही आणि मी कधीही त्यांची पूजा करणार नाही’, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. आठवले व त्यांच्या अनुयायांना निवडणुका जिंकण्यासाठी कमळ हाती घेताना डॉ. आंबेडकर यांच्या या विचारांचा विसर पडला की त्यांना आता त्या विचारांचे देणेघेणे राहिले नाही?

निवडणुका येतात आणि जातात. रिपब्लिकन पक्षांच्या विविध गटांना कधीच निवडणुकांमध्ये प्रचंड यश मिळाले नाही. पण एक विशिष्ट विचार घेऊ न पुढे जाणारा पक्ष म्हणून या गटांची गणना होत असे. मराठवाडा, विदर्भ, नाशिक, कोकण अशा प्रकारे रिपब्लिकन नेत्यांनी पक्षाची शकले करून दाखवली. इतके गट झाले की ते स्वबळावर कधीच निवडून येणार नाही, अशी अवस्था झाली. या गटांचा वापर काँग्रेस, राष्ट्रवादी, जनता पार्टी, जनता दल या सर्वांनी वेळोवेळी करून घेतला. नेत्यांना सत्तास्थाने दिली. त्यावर नेते खूश आणि नेत्यांमार्फंत आपल्याला काही तरी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा असे. तरीही या गटांचे वेगळेपण कायम राहिले. कवाडे, गवई, आंबेडकर, खोब्रागडे, दाणी, गाणार, कांबळे असे असंख्य गट आंबेडकरी जनतेने पाहिले. पण त्यांच्या हाती काहीच आले नाही, तर प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणाचा अप्रत्यक्ष फायदाही भाजपलाच होत आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, असे आवाहन आपल्या बांधवांना केले. रा. स्व. संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातच त्यांनी लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. पण त्यांचे अनुयायी त्यांची संघटित व्हा ही शिकवणही विसरून चालले आहेत आणि संघर्षाऐवजी सत्ताच त्यांना महत्त्वाची झाली आहे. यापेक्षा मायावती चांगल्या. त्यांनी बाबासाहेबांचा विचार सांगून उत्तर प्रदेशातील सत्ता मिळवून दाखवली. त्यांनी भाजपशी अशी जवळीक कधी केली नाही. आता आठवलेंना आंबेडकरी विचारांचे पाईक म्हणावे का, असा प्रश्न त्यांनी काही अनुयायांना तरी पडला असेल.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019